शिवसेना नेते परिवहन मंत्री अॅड. अनिल परब (Anil Parab) यांनी पोलिसांना सूचना दिल्या असतील तर त्यात गैर ते काय? कारण ते रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी ते पोलिसांना सूचना करु शकतात, असं स्पष्टीकरण शिवसेना नेते खासदार विनायक राऊत यांनी दिलं आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या अटकेसाठी शिवसेना नेते परिवहन मंत्री अॅड. अनिल परब यांनी पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोप काल भाजपने केला. भाजपच्या आरोपांना आज विनायक राऊत यांनी उत्तर दिलं.