पुणे जिल्हयातील काही गावांना ऐन पावसाळ्याच्या तोंडावर पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पुण्यातील 59 गावं आणि 302 वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. 66 टँकरद्वारे संबंधित गावांना पाणीपुरवठा सुरू आहे. पाणी वेळेवर उपलब्ध होत नसल्याने पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.