आधी जावायाला अटक नंतर ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानला अटक झाल्यामुळे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक मुंबईच्या एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडेंवर आक्रमक झाले. मालदीव आणि दुबईमधून वानखेडे यांनी वसूल केली, असा आरोप मलिकांनी केला. मात्र, मलिक आता वैयक्तिक पातळीवर उतरुन हल्लाबोल करत आहेत. पण त्यांच्या टीकेला वानखेडे यांनी पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिलं. नवाब मलिक यांनी केलेले आरोप खोटे आहेत. त्या आरोपांचं मी खंडन करतो, असं समीर वानखेडे यांनी स्पष्टीकरण दिलं. तसेच आपल्याला चुकीचे आरोप केले जात असल्याने मलिकांविरोधात कारवाई करणार असल्याचे देखील त्यांनी सांगितलंय. या प्रकरणाची सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !