भाजपा नगरसेविका अंजली खेडेकर यांच्या कार्यालयात एका कार्यकर्त्याने महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. त्याची तक्रार आमदार आणि खासदार यांच्याकडे केली म्हणून नगरसेविका आणि सहकाऱ्यांनी मारहाण केल्याचा आरोप समाजसेविकाने केला आहे. या विरोधात महिनाभरापूर्वी तक्रार करूनही गुन्हा दाखल झाला नाही. अखेर गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्याकडे दाद मागितल्यावर बोरीवली पोलिसांनी एफआयआर दाखल करण्यात आली आहे. यावरून आता राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. रूपाली चाकणकर यांनी यासंदर्भात म्हटंले आहे की, दिव्याखाली अंधार असा हा प्रकार आहे आणि संबंधितांवर कारवाई ही झाली पाहीजे.