AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राष्ट्रवादीसारखा मित्र असेल तर शत्रूची गरज नाही, निकालापूर्वीच आघाडीत राडा

मतदानानंतर (Maharashtra Assembly election results 2019)  जाहीर झालेल्या एक्झिट पोलमध्ये महाराष्ट्रात पुन्हा युतीचं सरकार येण्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीत (Congress-NCP clashes) तू तू मै मै सुरु झाली आहे.

राष्ट्रवादीसारखा मित्र असेल तर शत्रूची गरज नाही, निकालापूर्वीच आघाडीत राडा
| Updated on: Oct 23, 2019 | 1:26 PM
Share

नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालापूर्वीच (Maharashtra Assembly election results 2019) काँग्रेस-राष्ट्रवादी (Congress-NCP clashes) आघाडीत बिघाडीचं चित्र निर्माण झालं आहे. मतदानानंतर (Maharashtra Assembly election results 2019)  जाहीर झालेल्या एक्झिट पोलमध्ये महाराष्ट्रात पुन्हा युतीचं सरकार येण्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीत (Congress-NCP clashes) तू तू मै मै सुरु झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार मजीद मेमन (Majeed Memon) यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. “काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि त्यांची कन्या प्रियांका गांधी प्रचारापासून दूर राहिल्या. राहुल गांधींनी तुरळक सभा घेतल्या, मात्र त्यामध्ये काँग्रेस नेत्यांचीच वाणवा होती. केवळ राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी निवडणूक प्रचारात प्रचंड मेहनत घेतली. काँग्रेससोबत केवळ मजबुरी म्हणून आघाडी केली” असं मजीद मेमन म्हणाले.

काँग्रेसचं उत्तर

मेमन यांच्या या हल्ल्यानंतर काँग्रेसकडूनही प्रतिहल्ला करण्यात आला. काँग्रेसचे राज्य सरचिटणीस राजन भोसले यांनी राष्ट्रवादीसारखा मित्र असेल, तर शत्रूची गरज नाही, असा घणाघात केला. भोसले म्हणाले, “तुम्हाला शत्रूची गरज नसेल जेव्हा तुमच्यासोबत राष्ट्रवादी असेल”

जर शरद पवार सोडले तर राष्ट्रवादीचे अन्य नेते प्रचारात होते का? असा सवालही त्यांनी राष्ट्रवादीला विचारला. राष्ट्रवादीचे अन्य नेते नसल्याने 80 वर्षीय पवारांना प्रकृती अस्वास्थानंतरही प्रचारात उतरावं लागल्याचं भोसले म्हणाले.

वरिष्ठांकडून सारवा सारव

दरम्यान, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या टीका टिपण्णीनंतर दोन्ही पक्षाच्या वरिष्ठांनी डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न केला. तसंच दोघांची वक्तव्यं खोडून काढली.

या सर्व प्रकारानंतर मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीत निकालानंतर काय होईल याचा अंदाज लावलेलाच बरा. महाराष्ट्रातील 288 जागांसाठी 21 ऑक्टोबरला मतदान झालं तर 24 ऑक्टोबरला निकाल आहे.

Follow Us
वादग्रस्त ऑडिओनंतर आमदार संजय गायकवाडांनी मागितली माफी, माझा हेतू...
वादग्रस्त ऑडिओनंतर आमदार संजय गायकवाडांनी मागितली माफी, माझा हेतू....
भाजपने पुन्हा एकदा पंजाबच्या जनतेला दगा दिला; केजरीवाल यांचा हल्लाबोल
भाजपने पुन्हा एकदा पंजाबच्या जनतेला दगा दिला; केजरीवाल यांचा हल्लाबोल.
मीरा-भाईंदरमध्ये येऊन दाखवावं, सदावर्तेंना अविनाश जाधवांचं आव्हान
मीरा-भाईंदरमध्ये येऊन दाखवावं, सदावर्तेंना अविनाश जाधवांचं आव्हान.
दिल्लीत घडामोडी वाढल्या, आपचे 7 खासदार थेट भाजपा अध्यक्षांच्या भेटीला;
दिल्लीत घडामोडी वाढल्या, आपचे 7 खासदार थेट भाजपा अध्यक्षांच्या भेटीला;.
मोठी बातमी! केजरीवालांना धक्का, राघव चड्ढा यांच्यासोबत 7 खासदारांचा...
मोठी बातमी! केजरीवालांना धक्का, राघव चड्ढा यांच्यासोबत 7 खासदारांचा....
दिल्लीच्या राजकारणात आजवरचा सर्वात मोठा भूकंप, आम आदमी पक्ष फुटला
दिल्लीच्या राजकारणात आजवरचा सर्वात मोठा भूकंप, आम आदमी पक्ष फुटला.
हिंदू मुलींना मुस्लिम मुलंच आवडतात, माझ्या काकांच्या 3 बायका...
हिंदू मुलींना मुस्लिम मुलंच आवडतात, माझ्या काकांच्या 3 बायका....
अटकेच्या दिवशीच 58 लाखाचा व्यवहार! खरात तुरूंगात बसूनही करतोय कारनामे?
अटकेच्या दिवशीच 58 लाखाचा व्यवहार! खरात तुरूंगात बसूनही करतोय कारनामे?.
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता अमित शाहांनी थेट सांगितलं...
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता अमित शाहांनी थेट सांगितलं....
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरण आणखी चिघळलं, दोन पोलिसांवर..
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरण आणखी चिघळलं, दोन पोलिसांवर...