AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकरी 25 किलो बियाणे अन् 8 क्विंटलचे उत्पादन, रब्बी हंगामात नवा शेतकऱ्यांसमोर ‘नवा’ पर्याय

यंदाच्या प्रतिकूल परस्थितीमध्येही शेतकऱ्यांचा कल अधिकच्या उत्पन्नाकडेच राहिलेला आहे. खरिपात झालेले नुकसान, रब्बी हंगामाच्या सुरवातील अवकाळीचा फटका असे असतानाही पीक पध्दतीमध्ये सर्वाधिक बदल यंदा झाला आहे. विशेषत: मराठवाड्यात पारंपरिक शेतीलाच महत्व दिले जाते त्या भागातील 8 जिल्ह्यामध्ये मुख्य पीक असलेल्या ज्वारी पिकाला बाजूला सारत शेतकऱ्यांनी राजम्याचा पर्याय निवडलेला आहे.

एकरी 25 किलो बियाणे अन् 8 क्विंटलचे उत्पादन, रब्बी हंगामात नवा शेतकऱ्यांसमोर 'नवा' पर्याय
राजमा पीक
राजेंद्र खराडे
राजेंद्र खराडे | Updated on: Feb 11, 2022 | 2:39 PM
Share

उस्मानाबाद : यंदाच्या प्रतिकूल परस्थितीमध्येही शेतकऱ्यांचा कल अधिकच्या उत्पन्नाकडेच राहिलेला आहे. खरिपात झालेले नुकसान, रब्बी हंगामाच्या सुरवातील (Untimely Rain) अवकाळीचा फटका असे असतानाही पीक पध्दतीमध्ये सर्वाधिक बदल यंदा झाला आहे. विशेषत: मराठवाड्यात पारंपरिक शेतीलाच महत्व दिले जाते त्या भागातील 8 जिल्ह्यामध्ये (Main Crop) मुख्य पीक असलेल्या ज्वारी पिकाला बाजूला सारत शेतकऱ्यांनी (Rajma Crop) राजम्याचा पर्याय निवडलेला आहे. राजमा हे उत्तर भारतामध्ये घेतले जाणारे पीक आहे. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात घेवडा म्हणून हे परिचित आहे. आता मराठवाड्यातही या रब्बी हंगामापासून याचे क्षेत्र वाढले आहे. एकरात 25 किलो बियाणे आणि सरासरी 8 क्विंटलचे उत्पादन शिवाय बाजारपेठेत मागणी असल्याने शेतकरी या पिकाकडे लक्ष केंद्रित करीत आहेत. रब्बी हंगामातील नगदी पीक म्हणून राजम्याची ओळख होत आहे.

उपलब्ध पाण्याचा योग्य वापर

दरवर्षी रब्बी हंगामात पाण्याची टंचाई असते. यंदा मात्र, सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झाला असून त्याचा उपयोग आता रब्बी हंगामातील पिकांसाठी होत आहे. पाण्याचा अपव्यय होऊ नये म्हणून ठिबक सिंचनाचा वापर वाढला आहे. त्यामुळे क्षेत्रही वाढले असून पिकांना योग्य प्रमाणात पाण्याचा पुरवठा होत आहे. मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये यंदा राजम्याचे क्षेत्र वाढलेले आहे. खरिपात झालेले नुकसान या पीक पध्दतीमध्ये झालेल्या बदलातून भरुन निघेल असा विश्वास शेतकऱ्यांना आहे.

एकरी 8 क्विंटल उताऱ्याची अपेक्षा

ज्या उद्देशाने शेतकऱ्यांनी पीक पध्दतीमध्ये बदल केला आहे तो उद्देश आता साध्य होताना दिसत आहे. सध्याचे वातावरण रब्बी हंगामातील पिकांसाठी पोषक आहे. राजमा या पिकाचा नवा पर्याय असला तरी याकरिता एकरी 25 किलो बियाणे लागले आहे. त्यानुसार एकरी 8 क्विटल उत्पादनाची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. शिवाय बाजारपेठेत राजमा ला प्रति क्विंटल 6 हजराचा दर आहे. त्यामुळे पारंपरिक पिकांमधून जे उत्पन्न घटत होते ते भरुन काढण्यासाठी शेतकऱ्यांनी हा नवा प्रयोग केला आहे. गतवर्षी केवळ हा प्रयोग होता पण उत्पन्नाच्या दृष्टीकोनातून प्रयत्न केले जात असल्याचे भूम येथील शेतकरी भाऊराव गायकवाड यांनी सांगितले आहे.

जोखीम पत्करुन शेतकऱ्यांनी केले धाडस

उन्हाळी हंगामात सोयाबीनचाही पेरा वाढला आहे याला पर्याय म्हणून राजमा पिकाचेही उत्पादनही शेतकऱ्यांनी घेतल्याचे कृषितज्ञ रामेश्वर चांडक यांनी सांगितले आहे. हे जोखीमाचे पीक असले तरी यातून उत्पन्न अधिकचे मिळते म्हणून शेतकऱ्यांनी हे धाडस केले आहे. हंगामाच्या सुरवातीला निसर्गाच्या लहरीपणाचा शेतकऱ्यांना सामना करावा लागला असला तरी पिके बहरात आहेत. शिवाय सध्या राजमाला प्रति क्विंटल 9 हजाराचा दर आहे. भविष्यात आवक वाढली तरी 7 हजार रुपये दर कायम राहिल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

संबंधित बातम्या :

Rabi Season: पहिला मान हरभऱ्याचा, बाजारपेठेतील दरामुळे शेतकऱ्यांची मात्र निरशाच, काय आहेत अपेक्षा?

सर्वकाही उत्पादनासाठीच नाही, अधिकची फळधारणाही होऊ शकते धोक्याची, काय आहे कृषितज्ञांचा सल्ला?

Photo : डोळ्यांदेखतच स्वप्नांचा चुराडा, तोडणी सुरु असतानाच 30 एकरातील ऊस जळून खाक

Follow Us
मोठी बातमी! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीला? श्रीकांत शिंदे
मोठी बातमी! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीला? श्रीकांत शिंदेंसह ओमराजेदेखील... राजकारणातील हालचाली वाढल्या
आजपासून लागू झाले 11 नियम! बँक, ITR, HSRP...अपडेट्स एका क्लिकमध्ये
New Rules | आजपासून लागू झाले 11 मोठे नियम! बँक, ITR, पासपोर्ट, HSRP ते LPG... सर्व अपडेट्स एका क्लिकमध्ये
सचिन अहिरांबाबत मोठी अपडेट समोर; शिंदेंच्या शिवसेनेतून उपसभापती पदाचा
सचिन अहिरांबाबत मोठी अपडेट समोर; शिंदेंच्या शिवसेनेतून उपसभापती पदाचा अर्ज दाखल करताच, सरकारने थेट....
सर्व काही दिलं... तरी पक्ष सोडला! अहिरांवर राऊतांचा संताप
Sanjay Raut Full Press | सर्व काही दिलं... तरी पक्ष सोडला! विश्वासाला तडा देणाऱ्यांना जनता ओळखते; अहिरांवर राऊतांचा संताप
महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना दिलासा! इराण-अमेरिकेतील
महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना दिलासा! इराण-अमेरिकेतील कराराचा भारतीयांना थेट फायदा; आता पेट्रोल...
“मी आधीच चार खून केलेत, पुढचा नंबर...” मुंबई लोकलमध्ये सनकी व्यक्तीचा
“मी आधीच चार खून केलेत, पुढचा नंबर...” मुंबई लोकलमध्ये सनकी व्यक्तीचा धिंगाणा; मद्यधुंद अवस्थेत... पुढे भयंकर घडलं?
शरद पवारांचे झाले नाहीत, आमचे काय होणार?; राऊतांचा अहिरांवर घणाघात
Sanjay Raut | शरद पवारांचे झाले नाहीत, आमचे काय होणार?; राजकीय प्रवास कलंकित, राऊतांचा सचिन अहिरांवर घणाघात
नाशिक भक्तिरसात न्हालं; संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं जल्लोषात
Nashik | हरी मुखे म्हणा! नाशिक भक्तिरसात न्हालं; संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं जल्लोषात स्वागत
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी उपसभापती पदाचा अर्ज दाखल केल्यानंतर संजय
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी उपसभापती पदाचा अर्ज दाखल केल्यानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; थेट म्हणाले...
मुंबईत मुसळधार पावसाची दमदार हजेरी; मरीन ड्राईव्हवर उसळल्या प्रचंड....
Marine Drive Rain Updates | मुंबईत मुसळधार पावसाची दमदार हजेरी; मरीन ड्राईव्हवर उसळल्या प्रचंड लाटा, पर्यटकांची गर्दी वाढली