AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोहरीचे विक्रमी उत्पादन होऊनही खाद्यतेल महागच, आणखी वाढ होण्याची शक्यता

मोहरीचे विक्रमी उत्पादन होण्याचा अंदाज असूनही खाद्यतेलाच्या किंमती कमी होण्याची आशा या क्षणी नगण्य आहे. (Despite the record production of mustard, edible oil is expensive)

मोहरीचे विक्रमी उत्पादन होऊनही खाद्यतेल महागच, आणखी वाढ होण्याची शक्यता
मोहरीचे विक्रमी उत्पादन होऊनही खाद्यतेल महागच
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Edited By: Anish Bendre | Updated on: Mar 29, 2021 | 11:50 AM
Share

नवी दिल्ली : गेल्या काही महिन्यांत खाद्य तेलाच्या किंमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. मात्र, यावेळी देशात मोहरीचे विक्रमी उत्पादन झाले आहे. असे असूनही, खाद्य तेलाच्या किंमती कमी होण्याची काही आशा नाही. येत्या काळात खाद्यतेलाच्या किंमती अधिक वाढण्याची शक्यता आहे. अलिकडच्या काळात तेलाच्या किंमतीही बर्‍याच दिवसांपासून वाढत आहेत. त्याचा परिणाम खाद्य तेलावरही होतो. दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्य तेलाच्या किंमतींमध्ये या महिन्यात 10 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. देशांतर्गत बाजाराबद्दल बोलायचे झाले तर खाद्यतेलाच्या किंमतींमध्ये आधीच 50 टक्क्यांनी वाढ झाली असून त्याचा परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होत आहे. (Despite the record production of mustard, edible oil is expensive)

मलेशियामध्ये पाम तेलाची किंमत विक्रमी स्तरावर

रॉयटर्सच्या वृत्तानुसार मलेशियाच्या बाजारपेठेत पाम तेलाचे दर विक्रमी पातळीवर पोहोचले आहेत. 2008 नंतर प्रथमच एक टन पाम तेलाची किंमत 969 अमेरिकन डॉलर्सच्या जवळ पोहोचली आहे. मलेशिया पाम तेलाचा एक मोठा उत्पादक आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमतींच्या वाढीचा परिणाम देशांतर्गत बाजारावरही होईल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

भारताकडून 70 टक्के खाद्यतेलाची आयात

मलेशियामध्ये पाम तेलाची किंमत प्रति टन एक हजार डॉलरच्या जवळपास आहे, परंतु इतर बाजारात ते प्रति टन 1040 वरून 1100 डॉलरवर गेले आहे. तर सोयाबीन तेलाची किंमत 1190 वरुन 1270 डॉलर प्रति टन झाली आहे. दोन्ही प्रमुख तेलाच्या वाढत्या किंमतीचा परिणाम लवकरच भारतावरही दिसून येईल. याचे प्रमुख कारण म्हणजे भारत आपले 70 टक्के खाद्यतेल अन्य देशांकडून आयात करतो.

मोहरीच्या उत्पादनाची विक्रमी नोंद

भारतात यावेळी मोहरीचे पीक खूप चांगले आले आहे. अशा परिस्थितीत सरकार विक्रमी उत्पादनाचा अंदाज लावते. तथापि, विक्रमी उत्पादनाचा दरावर परिणाम होत नाही आणि मोहरीची विक्रमी किंमतीवर विक्री होत आहे. राष्ट्रीय कृषी बाजार (ई-नैम) अर्थात ऑनलाईन मार्केटच्या मते 25 मार्च रोजी राजस्थानच्या चाकसू मंडईमध्ये मोहरीचा भाव प्रतिक्विंटल 6,781 रुपये होता. दुसरीकडे, भरतपूर मंडईमध्ये याचा सरासरी दर 5500 रुपये क्विंटल सुरू आहे. शेतकरी सरकारला विक्री करण्याऐवजी थेट व्यापाऱ्यांना मोहरी विकत आहेत कारण त्यांना चांगला भाव मिळत आहे.

सध्या दिलासा मिळण्याची आशा नाही

सोयाबीनच्या किंमती वाढल्यामुळे रिफाइंड करणाऱ्या मिलही मोहरी खरेदी करत आहेत. जर त्यांनी अधिक दराने खरेदी केले तर उत्पादनाची किंमत जोडून त्यांना बाजारात खाद्यतेल महागच मिळेल. याशिवाय आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजीचा परिणाम त्यांच्या किमतींवरही होईल. अशा परिस्थितीत तज्ज्ञ असे म्हणत आहेत की मोहरीचे विक्रमी उत्पादन होण्याचा अंदाज असूनही खाद्यतेलाच्या किंमती कमी होण्याची आशा या क्षणी नगण्य आहे. (Despite the record production of mustard, edible oil is expensive)

इतर बातम्या

Shab-e-Barat 2021 | या वर्षी शब-ए-बारात कधी आहे? नेमकं काय होतं या दिवशी?, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Suez Canal Blockage : सुएझ कालव्यात महाकाय जहाज अडकल्याने जगभरातील व्यापार ठप्प, भारतावर काय परिणाम?

Follow Us
एक-एक टक्का देतो, आधी 40... शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; खळबळ
एक-एक टक्का देतो, आधी 40...  शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; एकच खळबळ
श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुला
Omraje Nimbalkar | श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुलासा, म्हणाले....
ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस
Omraje Nimbalakar | ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस... मोठा गोंधळ
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेम
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेमकं काय म्हणाले?
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच पोलिसांना...
तर नोकरी सोडून राजकारणात या, विश्वास नांगरे पाटलांच्या त्या भाषणानंतर
तर नोकरी सोडून राजकारणात या, IPS विश्वास नांगरे पाटलांच्या त्या भाषणानंतर राज ठाकरेंचा थेट हल्लबोल!
ठाकरेंच्या पक्षात खिंडार पडलं याचं खरं कारण.... बंडखोरीनंतर संजय
ठाकरेंच्या पक्षात खिंडार पडलं याचं खरं कारण.... बंडखोरीनंतर संजय देशमुखांनी थेट हे काय सांगितलं?
ठरलं तर मग! पुढचे 3 वर्षे हाच कार्यक्रम; शिवसेनेत... उद्धव ठाकरेंनी
ठरलं तर मग! पुढचे 3 वर्षे हाच कार्यक्रम; शिवसेनेत... उद्धव ठाकरेंनी सांगितला मास्टर प्लॅन
शिंदेंनी शब्द पाळला! आणखी एका खासदाराला दिलं सर्वात मोठं गिफ्ट? तब्बल
शिंदेंनी शब्द पाळला! आणखी एका खासदाराला दिलं सर्वात मोठं गिफ्ट? तब्बल...
पुन्हा पेपरफुटी! TET परीक्षेचा पेपर फुटला, पुन्हा परिक्षा कधी होणार?
पुन्हा पेपरफुटी! TET परीक्षेचा पेपर फुटला, पुन्हा परिक्षा कधी होणार?