AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सेंद्रीय शेतीतून बंपर उत्पादन, शेतकरी काढतो चांगल्या गुणवत्तेचा भाजीपाला पण, कसा?

विशेष म्हणजे सेंद्रीय पद्धतीने शेती करण्यासाठी सरकार प्रोत्साहन देत आहे. सेंद्रीय पद्धतीने शेती करून चांगले उत्पादन घेणारे बरेच शेतकरी आहेत.

सेंद्रीय शेतीतून बंपर उत्पादन, शेतकरी काढतो चांगल्या गुणवत्तेचा भाजीपाला पण, कसा?
| Updated on: Jul 10, 2023 | 3:06 PM
Share

नवी दिल्ली : बहुतेक शेतकरी रासायनिक खताचा वापर करतात. त्यामुळे जास्त उत्पादन मिळते, असा काही शेतकऱ्यांचा समज आहे. सेंद्रीय पद्धतीने शेती केल्यासही चांगले उत्पन्न होऊ शकते. त्यासाठी शेणखताचा वापर करावा लागेल. चांगल्या आरोग्यासाठी लोकं सेंद्रीय शेतीकडे वळत आहे. सेंद्रीय पद्धतीने घेतलेल्या फळ, भाजीपाल्याला चांगली मागणी आहे. विशेष म्हणजे सेंद्रीय पद्धतीने शेती करण्यासाठी सरकार प्रोत्साहन देत आहे. सेंद्रीय पद्धतीने शेती करून चांगले उत्पादन घेणारे बरेच शेतकरी आहेत.

गायीच्या शेण आणि गोमुत्राचा वापर

असेच एक शेतकरी आहेत शिवकुमार. ते उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथील रहिवासी आहेत. शिवकुमार गेल्या काही वर्षांपासून गिनौरा नंगली येथे सेंद्रीय पद्धतीने भाजीपाल्याची लागवड करतात. गाईचे शेण आणि गोमुत्राचा वापर करतात. भाजीपाला विक्रीसोबतच गावातील लोकांना मोफत भाजीपाला देतात.

रासायनिक कीटकनाशकाचा वापर नाही

शिवकुमार यांनी लवकीची शेती केली. ते शेणखत आणि गोमुत्राचा खत म्हणून वापर करतात. रासायनिक कीटकनाशकांचा वापर करत नाहीत. त्यामुळे त्यांचा भाजीपाला लवकर खराब होत नाही. शिवाय टेस्टही चांगली लागते.

बीज अंकुरल्यानंतर शिंपडतात गोमुत्र

शिवकुमार सांगतात की, गायीचे शेण आणि गोमुत्राचा खत म्हणून वापर केल्यास उत्पादनात वाढ होते. सेंद्रीय शेतीची मागणी जास्त आहे. सेंद्रीय पद्धतीने शेती केल्यास खर्च कमी होते. कोणतेही रोपं लावण्यापूर्व शेणखत आणि गोमुत्राचा वापर केला जातो. त्यानंतर रोपटे लावतात. बीज अंकुरीत झाल्यानंतर दोन-तीन दिवसांनी गोमुत्र शिंपडलं जातं. यामुळे रोपावर कीटकाचा परिणाम होत नाही.

गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल...
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास.
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ.
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर.
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.