आवक उन्हाळी कांद्याची, दर लाल कांद्याला, काय आहे मुख्य बाजारपेठेतील चित्र?

अपेक्षित दराच्या प्रतिक्षेत नाशिक जिल्ह्यासह राज्यात उन्हाळी कांद्याची साठवणूक कांदाचाळीत केली जाते. यंदा खरिपातील कांद्याचे पावसामुळे नुकसान झाले होते. शिवाय कांदा मार्केटमध्ये उशिराने दाखल झाला होता. परिणामी हंगामाच्या सुरवातीला उन्हाळी कांद्यालाही चांगला दर मिळाला होता. मात्र, सध्या खरिपातील लाल कांद्यालाच अधिकची पसंती दिली जात आहे.

आवक उन्हाळी कांद्याची, दर लाल कांद्याला, काय आहे मुख्य बाजारपेठेतील चित्र?
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Nov 28, 2021 | 12:11 PM

नाशिक : अपेक्षित दराच्या प्रतिक्षेत (Nashik) नाशिक जिल्ह्यासह राज्यात उन्हाळी कांद्याची साठवणूक कांदाचाळीत केली जाते. यंदा खरिपातील कांद्याचे पावसामुळे नुकसान झाले होते. शिवाय कांदा मार्केटमध्ये उशिराने दाखल झाला होता. परिणामी हंगामाच्या सुरवातीला उन्हाळी कांद्यालाही चांगला दर मिळाला होता. मात्र, सध्या खरिपातील लाल कांद्यालाच अधिकची पसंती दिली जात आहे. पण मागणीनुसार पुरवठा नसल्याने लाल (Onion Market Price) कांद्याचे दर हे दिवसाकाठी वाढत आहेत. शिवाय कांदाचाळीत साठवलेल्या कांद्याचा आता दर्जाही ढासळलेला आहे. त्यामुळे नाशिकच्या बाजारपेठेत आवक उन्हाळी कांद्याची आणि दर लाल कांद्याला असेच चित्र पाहवयास मिळत आहे.

कांदा खरेदी-विक्रीच्या अनुशंगाने नाशिक ही महत्वाची बाजारपेठ आहे. येथील बाजारपेठेवरच इतर बाजारपेठेतील दर ठरतात. यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे आणि केंद्र सरकारच्या भूमिकेमुळे कांद्याच्या दरात कायम चढ-उतार पाहवयास मिळालेले आहेत. आता दोन्ही हंगामातील कांद्याची आवक सुरु झाली आहे. मात्र, मागणी ही खरीप हंगामातील लाल कांद्यालाच अधिकची आहे.

काय आहेत कांद्याचे दर?

नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत बाजारपेठेत उन्हाळ कांद्याला सरासरी 1900 तर खरीप हंगामाती लाल कांद्याला 2700 रुपये प्रति क्विटंल दर आहे. तर लासलगाव बाजारपेठेत उन्हाळी कांद्याला 1800 तर लाल कांद्याला 2200 चा दर मिळत आहे. चांदवड बाजारपेठेत उन्हाळी कांद्याला 1600 तर खरीप हंगामातील लाल कांद्याला 2200 रुपये दर मिळाला आहे. नांदगाव बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला 1600 तर लाल कांद्याला 1500 रुपये दर मिळाला आहे.

उन्हाळी कांद्याचे दरही घसरले आणि दर्जाही

हंगामात कांद्याला योग्य दर मिळाला नाही तर त्याची कांदाचाळीत साठवणूक केली जाते. विशेषत: नाशिक जिल्ह्यात कांदाचाळ मोठ्या प्रमाणात आहेत. यामध्ये साठवणूक केली जाते आणि अपेक्षित दर मिळाला की त्याची विक्री केली जाते. मात्र, पावसाचा परिणाम साठवलेल्या कांद्यावरही झाला आहे. बाजारात दाखल होणारा कांदा हा खरिपातील लाल कांद्यापेक्षा दर्जाहिन असल्याने लाल कांद्यालाच अधिकची मागणी आहे.

बिजोत्पादनासाठी खरीप कांद्याला मागणी

खरीप हंगामातील लाल कांद्याच्या मागणीत वाढ होत आहे. त्यामुळे दरही चांगलेच वधारले आहेत. या कांद्याचा उपयोग आता बिजोत्पदनासाठी केला जात आहे. यंदा पावसामुळे खरीप हंगामातील सर्वच पिकांचे नुकसान झाले होते. यामध्ये कांद्याचाही सहभाग होता. पण खरिपात झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी पुन्हा शेतकरी तयारीला लागला आहे. लाल कांद्याची खरेदी केवळ आता बिजोत्पदनासाठी केली जात आहे.

संबंधित बातम्या :

E-Pik Pahani : शिल्लक पीकपेरा नोंदणीचे आता काय होणार?

कापसाला नव्हे तर बोंडअळीला पोषक वातावरण, शेतकऱ्यांकडे आता एकच पर्याय

यशोगाथा : उसापेक्षा सोयाबीन बिजोत्पदनात अधिकचा गोडवा, कंधारच्या शेतकऱ्याने करुन दाखविले

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.