AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Beed : गोगलगायीचा प्रादुर्भाव कमी आता वन्यप्राण्यांच्या विळख्यात खरिपातील पिके, शेतकऱ्यांना मिळते का भरपाई? वाचा सविस्तर

एकट्या बीड जिल्ह्यामध्ये गोगलगायीच्या प्रादुर्भामुळे तब्बल 3 हजार 600 हेक्टरावरील सोयाबीनचे नुकसान झाले. त्याअनुशंगाने कृषी विभागानेही अहवाल सादर केला आहे. पिकांची उगवण होताच शंकू गोगलगायीने सोयाबीन फस्त करण्याचा घाट घातला होता. बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील शेकतरी तब्बल महिनाभर त्रस्त होते. आता गोगलयीचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी वन्यप्राण्यांचा वावर वाढला आहे.

Beed : गोगलगायीचा प्रादुर्भाव कमी आता वन्यप्राण्यांच्या विळख्यात खरिपातील पिके, शेतकऱ्यांना मिळते का भरपाई? वाचा सविस्तर
खरिपातील सोयाबीनला आता वन्य प्राण्यांचा धोका निर्माण झाला आहे.Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Aug 08, 2022 | 4:40 PM
Share

बीड : यंदा पेरणीपासूनच (Kharif Season) खरीप हंगामावर वेगवेगळे संकट घोंगावत आहे. पेरणी होताच राज्यात पावसाने अशी काय हजेरी लावली की खरिपातील सर्वच पिके ही पाण्यात आहेत. हे कमी म्हणून की काय पिकांची उगवण होताच मराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद जिल्ह्यातील सोयबीनवर (Outbreak of snails) गोगलगायीचा प्रादुर्भाव वाढला होता. सोयाबीन पिकाची पाने गोगलगायी ह्या फस्त करीत होत्या तर आता पिकांची वाढ झाल्यानंतर (Danger of wild animals) वन्य प्राण्यांचा धोका वाढला आहे. शेत शिवरात हरिण, रानडुकरांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे सततचा पाऊस आणि वन्यप्राण्यांच्या कचाट्यातून पिकांची सुटका होणार तरी कशी असा सवाल आता शेतकऱ्यांना पडलेला आहे.

मदतीबाबत काय आहे भूमिका?

निसर्गाचा लहरीपणाबरोबरच पिकांना वन्यप्राण्यांचाही धोका वाढत आहे. खरीप आणि रब्बी हंगामातही या समस्या निर्माण होत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान लक्षात घेता केंद्र सरकारने राज्यांना वेगवेगळ्या सूचना केल्या आहेत. यामाध्यमातून वन्यप्राण्यांकडून जरी पिकाचे नुकसान झाले तरी त्याची भरपाई ही मिळणार आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. ही योजना 2016 मध्ये सुरु करण्यात आली होती. आता येथून पुढे राज्य सरकारे वन्य प्राण्यांमुळे होणारे पिकांचे नुकसान देखील विचारात घेऊ शकतात.

गोगलगायीने 3 हजार 600 हेक्टरावरील पिकांचे नुकसान

एकट्या बीड जिल्ह्यामध्ये गोगलगायीच्या प्रादुर्भामुळे तब्बल 3 हजार 600 हेक्टरावरील सोयाबीनचे नुकसान झाले. त्याअनुशंगाने कृषी विभागानेही अहवाल सादर केला आहे. पिकांची उगवण होताच शंकू गोगलगायीने सोयाबीन फस्त करण्याचा घाट घातला होता. बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील शेकतरी तब्बल महिनाभर त्रस्त होते. आता गोगलयीचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी वन्यप्राण्यांचा वावर वाढला आहे. आता हरिण आणि रानडुकरांकडून पिकांचे नुकसान होत आहे. त्यामुळे भरपाईची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

खरिपात सर्वाधिक क्षेत्रावर सोयाबीन

सोयाबीन हे खरीप हंगामातील मुख्य पीक आहे. यंदा राज्यात तब्बल 43 लाख हेक्टरावर सोयाबीनचा पेरा झाला आहे. गतवर्षीच्या तुनलनेत यामध्ये वाढ झाली आहे. गेल्या वर्षी परतीच्या पावसाने सोयाबीनचे नुकसान झाले होते तर यंदा हंगामाच्या सुरवातीपासून पिकांना धोका निर्माण झाला आहे. सुरवातीला अधिकचा पाऊस त्यानंतर गोगलगायीचा प्रादुर्भाव आणि आता वन्यप्राण्यांचा उपद्रव. सततच्या संकटामुळे शेतकरी त्रस्त आहे. यंदा उत्पादनवाढीसाठी शेतकऱ्यांनी एक ना अनेक नवनवीन प्रयोग केले पण पावसाने सर्वकाही पाण्यात घातले आहे.

Follow Us
मोठी अपडेट! मनसे नेते संदीप देशपांडेंचं जैन मुनींना थेट आव्हान; आता
मोठी अपडेट! मनसे नेते संदीप देशपांडेंचं जैन मुनींना थेट आव्हान; आता मुंब्य्रात...
इकडे फडणवीसांचं आमदारांना प्रपोजल, तिकडे ठाकरेंच्या नगराध्यक्षा थेट...
इकडे फडणवीसांचं आमदारांना प्रपोजल, तिकडे ठाकरेंच्या नगराध्यक्षा थेट महाजनांच्या भेटीला; उद्धव ठाकरेंचं टेन्शन वाढलं?
आम्ही चिमटे नाही काढत थेट हल्ला करतो... भर मंचावर संजय राऊतांची सत्ताध
आम्ही चिमटे नाही काढत थेट हल्ला करतो... भर मंचावर संजय राऊतांची सत्ताधाऱ्यांवर बोरची टीका
ये डर अच्छा है! ऑपरेशन टायगरच्या चर्चेत वाघमारेंचा ठाकरे गटाला इशारा
ये डर अच्छा है! ऑपरेशन टायगरच्या चर्चेत ज्योती वाघमारेंचा ठाकरे गटाला थेट इशारा, संजय राऊतांवरही निशाणा
पाणी डोक्यावरून गेलंय... ठाकरे गटाची तातडीने बैठक अन् अंबादास दानवेंचं
पाणी डोक्यावरून गेलंय... ठाकरे गटाची तातडीने बैठक अन् अंबादास दानवेंचं विधान; राजकारणात मोठा भूकंप येणार?
प्रणित मोरे प्रकरण थेट संसदेत? शिंदेंच्या महिला खासदाराचा प्रचंड संताप
आता प्रणित मोरे प्रकरण थेट संसदेत? शिंदेंच्या महिला खासदाराचा प्रचंड संताप; लवकरच...
कर्जमाफीवरून सरकारने अखेर बैठक बोलवली, नेमकं काय घडतंय?
Dattatray Bharne | कर्जमाफीवरून सरकारने अखेर बैठक बोलवली, रोहित पवारांच्या उपोषणामुळे हालचाली वाढल्या, नेमकं काय घडतंय?
24 तासांतच चांदीचा मुकुट पुन्हा चोरला; तुळजाभवानी मंदिरातील धक्कादायक
24 तासांतच चांदीचा मुकुट पुन्हा चोरला; तुळजाभवानी मंदिरातील धक्कादायक CCTV फुटेज समोर!
अर्वाच्च भाषेतील ऑडीओ क्लिप व्हायरल; बड्या अधिकाऱ्यावर मोठी कारवाई,
अर्वाच्च भाषेतील ऑडीओ क्लिप व्हायरल; बड्या अधिकाऱ्यावर मोठी कारवाई,  ठाकरेंच्या नगरसेवकाला... नेमकं प्रकरण काय?
भाजप आमदाराच्या पत्नीच्या गाडीचा भीषण अपघात; डोक्याला अन्....
मोठी बातमी! भाजप आमदाराच्या पत्नीच्या गाडीचा भीषण अपघात; डोक्याला आणि पायाला दुखापत