AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM Kisan: या शेतकऱ्यांना २००० ऐवजी मिळत आहेत ७०००, सरकारने दिली मोठी भेट

पीएम किसान योजने अंतर्गत अल्पभूधारक शेतकरी आणि गरीब शेतकऱ्यांना मदत म्हणून वर्षांतून तीन वेळा दोन हजार रुपये असे मिळून एकून ६००० हजार रुपये मिळत आहेत.

PM Kisan: या शेतकऱ्यांना २००० ऐवजी मिळत आहेत ७०००, सरकारने दिली मोठी भेट
pm kisan yojana
| Updated on: Aug 03, 2025 | 9:38 PM
Share

पंतप्रधान किसान सन्मान निधी ( PM Kisan ) २० वा हप्ता देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात पोहचली आहे. यंदा केंद्र सरकारने सुमारे २०,५०० कोटी रुपये देशभरातील ९.७ कोटी शेतकऱ्यांना प्रत्येकी २००० हजार रुपयांच्या हप्त्यात खात्यात जमा केली आहे. परंतू एक राज्य असे आहे जेथे शेतकऱ्यांच्या खात्यात केवळ २००० रुपये नाहीत तर ७००० रक्कम स्ट्रान्सफर झाली आहे.

आंध्रात शेतकऱ्यांना डबल बोनस

आंध्रातील शेतकऱ्यांसाठी हा दिवस खास आहे. आंध्रप्रदेशातील राज्य सरकारने केंद्राच्या पीएम किसान योजने सोबत स्वत:ची योजना जोडली आहे. तिचे नाव अन्नदाता सुखीभव पीएम किसान योजना. या अंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक २०,००० रुपये देण्याचे वचन दिले आहे. या अंतर्गत पहिला हप्त्याच्या रुपात शेतकऱ्यांना ५००० रुपये राज्य सरकारतर्फे तर २००० रुपये केंद्र सरकारमार्फत मिळाले आहेत. या प्रकारे आंध्रप्रदेशात ४६,८५,८३८ शेतकऱ्यांच्या खात्यात ७ हजार रुपये पोहचले आहेत.

मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी वचन पूर्ण केले

आंध्रचे मुख्यमंत्री एन.चंद्राबाबू नायडू यांनी या योजनेची घोषणा निवडणूक जाहीरनाम्यात केली होती. सत्तेत आल्यानंतर या योजनेस लागू करण्यात आले आहे. शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्यासाठी ही योजना गरजेची असल्याचे त्यांनी म्हटले आहे. हे पाऊल शेतकऱ्यांना आत्मनिर्भर आणि सबल करेल असेही त्यांनी म्हटले आहे.

तुमच्या खात्यात जर पैसे आले नसतील काय करावे ?

जर तुम्ही पीएम किसानचे लाभार्थी आहात आणि आता पर्यंत तुमच्या खात्यात २००० रुपये आले नाही तर काही बाबी तपासा

तुमचा PM Kisan रजिस्ट्रेशन नंबर वा आधार नंबर घेऊन pmkisan.gov.in वेबसाईट वर लॉग इन करा

तेथे Beneficiary Status सेक्शनमध्ये जाऊन स्थिती तपासा

जर काही त्रुटी असेल तर स्थानिक कृषी अधिकारी वा CSC केंद्रावर संपर्क करा

आंध्र सरकारची शेतकऱ्यांना डबल भेट

केंद्र आणि आंध्र सरकार दोघांनी शेतकऱ्यांना एकत्र हप्ते देण्याचा रोडमॅप तयार केला आहे. केंद्र सरकार जेथे दर चार महीन्यास २००० रुपये देत आहे तर, दुसरीकडे आंध्र प्रदेश सरकार देखील काही महिने आपल्या वाटचे ५००० रुपये देणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वर्षभरात २० हजार रोख रक्कम मिळणार आहे.

Follow Us
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात दिलासा
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे जरांगे पाटलांना...
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनोज जरांगे पाटील यांना आवाहन
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता