AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

FPO : पंतप्रधान मोदींनीच सांगितले शेतकरी उत्पादक कंपनीचे 5 बलस्थाने, वाचा सविस्तर

शेतकरी उत्पादक कंपन्यामुळे शेती व्यवसयाचे स्वरुप हे बदलत आहे. समूह शेतीमुळे शेतकऱ्यांचा सर्वांगिण विकास होत असून पीक लागवडीपासून ते बाजारपेठपर्यंत सर्वकाही या कंपन्यांच्या माध्यमातून होत आहे. पीएम किसान सन्मान निधीचा 10 हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करीत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी उत्पादक कंपन्यांचे महत्व तर पटवून सांगितले

FPO : पंतप्रधान मोदींनीच सांगितले शेतकरी उत्पादक कंपनीचे 5 बलस्थाने, वाचा सविस्तर
पंतप्रधान नरेंद्र मोदी
| Edited By: | Updated on: Jan 01, 2022 | 2:34 PM
Share

मुंबई : देशात (FPO) शेतकरी उत्पादक कंपन्यांचे जाळे दिवसेंदिवस वाढत आहेत. शेतकऱ्यांची एकजूट काय असते हे यामधून समोर येत आहे. यामुळेच नववर्षाचे मुहूर्त साधत शेतकरी उत्पादक कंपन्याना प्रोत्साहन देण्यासाठी 1 लाख 24 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर 14 कोटी रुपये वर्ग करण्यात आले आहेत. शेतकरी उत्पादक कंपन्यामुळे शेती व्यवसयाचे स्वरुप हे बदलत आहे. समूह (Farmiong) शेतीमुळे शेतकऱ्यांचा सर्वांगिण विकास होत असून पीक लागवडीपासून ते बाजारपेठपर्यंत सर्वकाही या कंपन्यांच्या माध्यमातून होत आहे. पीएम किसान सन्मान निधीचा 10 हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करीत असताना (PM) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी उत्पादक कंपन्यांचे महत्व तर पटवून सांगितलेच पण या कंपन्यांची 5 बलस्थाने काय आहेत याचीही माहिती दिली.

शेतकरी उत्पादक कंपन्यांचे हे आहेत 5 फायदे

एकट्याने शेतामध्ये परीश्रम करणे आणि समूहाच्या माध्यमातून नियोजनातून शेती करणे यामध्ये मोठा फरक आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे संगठन कायम राहते यामुळे शेतीमालाचे मूल्य ठरवता येते हा पहिला आणि सर्वात महत्वाचा फायदा आहे. तर शेतकरी कंपन्यामुळे मोठ्या स्तरावर व्यापार करणे सहज शक्य होते. प्रत्येक शेतकऱ्याला हे शक्य नाही म्हणून जेवढा मोठा व्यापार तेवढाच अधिकचा फायदा कंपनीच्या माध्यमातून होणार आहे.

तिसरी मोठी बाजू म्हणजे इनोवेशन, शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये अनेक शेतकऱ्यांच्या कल्पना मांडता येतात. यामधून सर्वाच्या हीताचा योग्य निर्णय घेणे सहज शक्य होते. यामधून कमी धोका होतो. शेतकरी कंपन्यांचा चौथा मोठा फायदा म्हणजे रिस्क घेण्याची तयारी. एकटा शेतकरी दे धाडस करु शकत नाही ते समूह शेतीमध्ये शक्य आहे. त्यामुळे उत्पादनात वाढ होते. नवी धोरणे स्विकारताना कोणत्या अडचणी येणार नाहीत

तर पाचवा फायदा हा बाजारभावाचा होत आहे. शेतकरी कंपनी शेतीमालाचे दर ठरवते तेच दर बाजारपेठेत आहेत. याचा सर्वाधिक फायदा होत आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यास बाजारपेठेची गणिते मांडणे तसे कठीण पण उत्पादक कंपन्यामध्ये शक्य आहे. त्यामुळे बदलत्या बाजारपेठेचा देखील फायदा होतो. ही 5 बलस्थाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलेली आहेत.

शेतकरी उत्पादक कंपनीच म्हणजेच बाजारपेठ

शेतकरी उत्पादक कंपनीच एक प्रकारची बाजारपेठ आहे. यामधील सदस्यांनीच शेतीमालाचे बाजारभाव ठरवले तर शेतकऱ्यांनाच अधिकचा फायदा होणार आहे. कोणी मध्यस्तीच शेतकरी आणि बाजारपेठेत राहणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनातही वाढ होणार आहे. त्यामुळेच शेतकरी उत्पादक कंपन्याच निर्माण करण्यावर सरकारचा भर असल्याचे पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केले आहे.

संबंधित बातम्या :

एरंडोल बाजार समितीच्या एका निर्णय अन् शेतकऱ्यांच्या दोन शेती पिकांचा फायदा, वाचा सविसतर

नववर्षाची सुरवात शेतकरी हीताच्या निर्णयाने : पीएम किसानचा हप्ता जारी, अन् शेतकरी उत्पादक कंपन्यांना 14 हजार कोटी

Rabi Season | अवकाळीनंतर आता ढगाळ वातावरणाचा धोका, काय आहे उपाययोजना ?

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.