AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM Modi आम्हीच कमी पडलो, कृषी कायदे हे शेतकऱ्यांच्या हिताचेच होते : पंतप्रधान मोदी

गेल्या अनेक दिवसांपासून तीन कृषी कायद्यांना घेऊन राजधानी दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांच्या आंदोलन सुरु आहे. मात्र, सुधारित कृषी कायदे हे शेतकऱ्यांच्याच हीताचे होते. याला काही शेतकरी गटाचा विरोध कायम राहिलेला आहे. त्यामुळे हे आंदोलन अधिक काळ न ठेवता आता कृषी कायद्यातील बदलाचे कायदेच सरकार माघार घेत असल्याची घोषणाच पंतप्रधान मोदी यांनी घोषणा केली.

PM Modi आम्हीच कमी पडलो, कृषी कायदे हे शेतकऱ्यांच्या हिताचेच होते : पंतप्रधान मोदी
Narendra Modi
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Nov 19, 2021 | 9:45 AM
Share

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून तीन कृषी कायद्यांना घेऊन राजधानी दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांच्या आंदोलन सुरु आहे. मात्र, सुधारित कृषी कायदे हे शेतकऱ्यांच्याच हीताचे होते. याला काही शेतकरी गटाचा विरोध कायम राहिलेला आहे. त्यामुळे हे आंदोलन अधिक काळ न ठेवता आता कृषी कायद्यातील बदलाचे कायदेच सरकार माघार घेत असल्याची घोषणाच पंतप्रधान मोदी यांनी घोषणा केली.

देशातील विशेषकरुन लहान- मोठ्या शेतकऱ्यांसाठी हे कृषी कायद्यातील बदल परिणामकारक ठरणार होते. मात्र, याचे महत्व काही शेतकरी गटाच्या लक्षात आले नाहीत. शिवाय याला काही घटकांकडून विरोध राहिलेला आहे. एवढे होत असताना शेतकरी संघटनांच्या बैठका दरम्यान, त्यांनी सुचवलेले बदल करण्यास सरकार तयारही होते. त्यानंतर हा विषय सर्वेच्च न्यायालयातही गेला होता. या सर्व गोष्टी देशातील जनतेसमोर आहेत. मात्र, या सुधारित कायद्यातील धोरणे बाजूला ठेवत सातत्याने विरोध झाला आहे. त्यामुळे सरकारच कुठेतरी कमी पडले आहे. देशावासियांची माफी मागून कृषी कायदे मागे घेत असल्याची घोषणा केली.

अल्पभुधारक शेतकऱ्यांच्या फायद्याचे होते कृषी कायदे

शेतकऱ्यांच्या बारीक-सारीक गोष्टींचा अभ्यास करुन कृषी कायद्यांमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यामुळे शेतीमालाचा दर हा शेतकऱ्यांनाच ठरविता येणार होता. मात्र, सरकारच्या या निर्णयाला कायम विरोध होत असल्याने हे कायदे मागे घेत असल्याची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली आहे. ऐवढेच नाही तर मनोगत व्यक्त करताना त्यांनी देशातील शेतकऱ्यांचीही माफी मागून आंदोलन मागे घेण्याचे अवाहन केले.

महिन्याच्या अखेरीस कायदे रिपील

आम्ही काही सत्य काही शेतकऱ्यांना समजावू शकलो नाही. आज प्रकाशपर्व आहे. यावेळी कोणालाही दोष देण्याची ही वेळ नाही. आम्ही तीन कृषी कायदे मागे घेण्याचा निर्यम घेतला आहे. या महिन्याच्या अखेरीस संसद सत्रात ही कायदे रिपील करण्याची प्रक्रिया पूर्ण करणार असल्याचेही मोदी यांनी यावेळी स्पष्ट केले.

संबंधित बातम्या :

Breaking News: मोदींनी देशाची माफी मागितली, वादग्रस्त तीन कृषी कायदे मागे घेण्याचीही घोषणा

Narendra Modi on Farm Law: केंद्रीय कृषी कायदे रद्द, सर्वात मोठी घोषणा करताना नरेंद्र मोदी काय म्हणाले?

Modi Address to Nation LIVE | पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मोठी घोषणा, वादग्रस्त तीन कृषी कायदे मागे घेणार

Follow Us
शिंदेंच्या सेनेत जाण्याआधीच सचिन अहिरांची पहिली प्रतिक्रिया
Sachin Ahir | मी गेल्याशिवाय कळणार नाही...शिंदेंच्या सेनेत जाण्याआधीच सचिन अहिरांची पहिली प्रतिक्रिया
मोठी बातमी! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीला? श्रीकांत शिंदे
मोठी बातमी! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीला? श्रीकांत शिंदेंसह ओमराजेदेखील... राजकारणातील हालचाली वाढल्या
आजपासून लागू झाले 11 नियम! बँक, ITR, HSRP...अपडेट्स एका क्लिकमध्ये
New Rules | आजपासून लागू झाले 11 मोठे नियम! बँक, ITR, पासपोर्ट, HSRP ते LPG... सर्व अपडेट्स एका क्लिकमध्ये
सचिन अहिरांबाबत मोठी अपडेट समोर; शिंदेंच्या शिवसेनेतून उपसभापती पदाचा
सचिन अहिरांबाबत मोठी अपडेट समोर; शिंदेंच्या शिवसेनेतून उपसभापती पदाचा अर्ज दाखल करताच, सरकारने थेट....
सर्व काही दिलं... तरी पक्ष सोडला! अहिरांवर राऊतांचा संताप
Sanjay Raut Full Press | सर्व काही दिलं... तरी पक्ष सोडला! विश्वासाला तडा देणाऱ्यांना जनता ओळखते; अहिरांवर राऊतांचा संताप
महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना दिलासा! इराण-अमेरिकेतील
महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना दिलासा! इराण-अमेरिकेतील कराराचा भारतीयांना थेट फायदा; आता पेट्रोल...
“मी आधीच चार खून केलेत, पुढचा नंबर...” मुंबई लोकलमध्ये सनकी व्यक्तीचा
“मी आधीच चार खून केलेत, पुढचा नंबर...” मुंबई लोकलमध्ये सनकी व्यक्तीचा धिंगाणा; मद्यधुंद अवस्थेत... पुढे भयंकर घडलं?
शरद पवारांचे झाले नाहीत, आमचे काय होणार?; राऊतांचा अहिरांवर घणाघात
Sanjay Raut | शरद पवारांचे झाले नाहीत, आमचे काय होणार?; राजकीय प्रवास कलंकित, राऊतांचा सचिन अहिरांवर घणाघात
नाशिक भक्तिरसात न्हालं; संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं जल्लोषात
Nashik | हरी मुखे म्हणा! नाशिक भक्तिरसात न्हालं; संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं जल्लोषात स्वागत
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी उपसभापती पदाचा अर्ज दाखल केल्यानंतर संजय
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी उपसभापती पदाचा अर्ज दाखल केल्यानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; थेट म्हणाले...