AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MLA Ravi Rana : महाबीजचे खच्चीकरण करुन खासगी कंपन्यांना वाव देण्यात ठाकरे सरकारची धन्यता, बियाणे पुरवठ्यातही राजकारण

सध्या राज्यभर खरीप हंगामाची लगबग सुरु झाली आहे. काही भागामध्ये पावसाने हजेरी लावल्याने खत- बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांनी सुरवातही केली आहे. असे असताना अमरावती जिल्ह्याला मागणीच्या तुलनेत नगण्य पुरवठा झाला आहे. त्यामुळे राज्य सरकारचा उद्देश हा शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याचा आहे की कमी करण्याचा असा प्रश्न उपस्थित होत आहे.

MLA Ravi Rana : महाबीजचे खच्चीकरण करुन खासगी कंपन्यांना वाव देण्यात ठाकरे सरकारची धन्यता, बियाणे पुरवठ्यातही राजकारण
आ. रवी राणा Image Credit source: tv9
राजेंद्र खराडे
राजेंद्र खराडे | Updated on: Jun 02, 2022 | 5:00 PM
Share

अमरावती :  (Mahabeej Seed) महाबीजच्या माध्यमातून राज्यभरातील शेतकऱ्यांना बियाणांचा पुरवठा केला जातो. मात्र, याच (Seed Company) बियाणे कंपनीचे खच्चीकरण करुन इतर खासगी कंपन्यांना वाव देण्याचा घाट (State Government) ठाकरे सरकारकडून केला जात असल्याचा आरोप आ. रवी राणा यांनी केला आहे. इतर खासगी कंपन्याना वाव देण्यामागे अर्थार्जानाचा उद्देश असून स्वार्थापुढे महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांच्या हिताचा देखील विचार करीत नाही. आता खरीप हंगाम तोंडावर असताना मागणीपेक्षा कमी बियाणांचा पुरवठा करुन शेतकऱ्यांची अडचण केली जात असल्याचा घणाघात आ. रवी राणा यांनी ठाकरे सरकरावर केला आहे. बियाणांच्या किमंतीमध्ये वाढ तर झालीच आहे पण बियाणे पुरवठ्यावरुन देखील राजकारण केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

अमरावतीसाठी केवळ अडीच हजार टन बियाणे

सध्या राज्यभर खरीप हंगामाची लगबग सुरु झाली आहे. काही भागामध्ये पावसाने हजेरी लावल्याने खत- बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांनी सुरवातही केली आहे. असे असताना अमरावती जिल्ह्याला मागणीच्या तुलनेत नगण्य पुरवठा झाला आहे. त्यामुळे राज्य सरकारचा उद्देश हा शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याचा आहे की कमी करण्याचा असा प्रश्न उपस्थित होत आहे. यंदाच्या वर्षासाठी केवळ 2 हजार 500 टन बियाणांचा पुरवठा झाला आहे. भाजपा सत्तेत असताना मात्र, 50 ते 60 हजार क्विंटल बियाणांचा पुरवठा केला जात असल्याचे आ.रवी राणा यांनी सांगितले.

महाविकास आघाडी सरकारकडून शेतकऱ्यांवर अन्याय

महाबीजकडून शेतकऱ्यांना अनुदानाच्या स्वरुपात बियाणे उपलब्ध होते.त्यामुळे शेतकऱ्यांना अधिकचा पैसा खर्च करावा लागत नाही. मात्र, या कंपनीचे खच्चीकरण करुन इतर खासगी कंपन्यांना वाव देण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अधिकच्या रकमेने बियाणे खरेदी करण्याची नामुष्की ओढावली आहे. त्यामुळे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे नसून अन्यायकारक असल्याचा घणाघातही आ. रवी राणा यांनी केला आहे. जिल्ह्यात झालेल्या बियाणांच्या पुरवठ्यावरुन ते बोलत होते.

बियाणांच्या किंमतीमध्ये वाढ

निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात घट झाली आहे. असे असताना शेतकऱ्यांना दिलासा देणे गरजेचे असते. मात्र, महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. शेतकरी अडचणीत असतानाच बियाणांच्या किंमतीमध्ये चार पटीने वाढ केली आहे. त्यामुळे पेरणी करणेही अवघड झाले असून शेतकऱ्यांबद्दलही या सरकारच्या मनात सहानभुती राहिली नसल्याचा आरोप आ. राणा यांनी केला आहे.

Follow Us
बारामतीत सुनेत्रा पवारांचा रात्री उशिरापर्यंत जनता दरबार
Sunetra Pawar | बारामतीत सुनेत्रा पवारांचा रात्री उशिरापर्यंत जनता दरबार
मुंबईत नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त विशेष नियोजन, गणेश मंडळांना..
मुंबईत PM नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त विशेष नियोजन, गणेश मंडळांना आवाहन
ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहतील जोरदार वारे, पुढील 3 तास
Weather Update : पुढील 3 तास महत्त्वाचे, ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहतील जोरदार वारे
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, थेट..
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, गाडी थेट...
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या...
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या गंभीर आरोपांमागे...
मुंबईत संततधार; विमानतळ परिसरात साचलं पाणी
Mumbai Rain Updates | मुंबईत संततधार; विमानतळ परिसरासह इतर भागांत साचलं पाणी
ब्रिक्स परिषदेदरम्यान भारत आणि चीनमध्ये झाले 7 महत्त्वाचे करार
India And China Agreement | ब्रिक्स परिषदेदरम्यान भारत आणि चीनमध्ये झाले 7 महत्त्वाचे करार
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा