भाजीपाल्याची आवक घटली दर वाढले, बाजारावर नियंत्रण नसल्याने किरकोळ विक्रेत्यांची चांदी

शेती व्यवसयाशी निगडीत सर्वच बाबींवर अवकाळी पावसाचा परिणाम झालेला आहे. एकीकडे शेतात उभ्या असलेल्या पिकांवर किड, रोगराई वाढत आहे तर दुसरीकडे काढणी झालेल्या भाजीपाल्यावरही परिणाम होत आहे. अवकाळी पावसामुळे मुंबई बाजारपेठेत भाजीपाल्याची आवक कमी झाली असून दर हे वाढलेले आहेत.

भाजीपाल्याची आवक घटली दर वाढले, बाजारावर नियंत्रण नसल्याने किरकोळ विक्रेत्यांची चांदी
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Nov 24, 2021 | 4:15 PM

मुंबई : शेती व्यवसयाशी निगडीत सर्वच बाबींवर अवकाळी पावसाचा परिणाम झालेला आहे. एकीकडे शेतात उभ्या असलेल्या पिकांवर किड, रोगराई वाढत आहे तर दुसरीकडे काढणी झालेल्या भाजीपाल्यावरही परिणाम होत आहे. अवकाळी पावसामुळे ( Mumbai vegetable market) मुंबई बाजारपेठेत भाजीपाल्याची आवक कमी झाली असून दर हे वाढलेले आहेत. याचा थेट फायदा हा शेतकऱ्यांना नाही तर किरकोळ विक्रेत्यांनाच होत आहे. दराबाबत कुणाचेच नियंत्रण नसल्यामुळे किरकोळ विक्रेत्ये जे ठरवतील तोच दर ग्राह्य मानला जात आहे. त्यामुळे ग्राहकांना अधिकचे पैसे तर मोजावे लागत आहेत पण दुर्देव म्हणजे हे उत्पाकदाकांच्याही पदरी पडत नाहीत.

मालाची आवक घटली की दर वाढणार हे बाजारपेठेचे सुत्रच आहे. पण त्यामुळे शेतकऱ्यांना तरी फायदा होणे अपेक्षित असते मात्र, येथील बाजारपेठेत किरकोळ विक्रेतेच अधिकचा लाभ घेत आहेत. मुंबई एपीएमसी भाजीपला मार्केटमध्ये आज 580 गाड्याची आवक झाली असून टोमॅटो 50 रुपये तर वाटाणा 100 रुपये किलो विकला जात असून इतर भाज्यांच्या दरात वाढ झाली आहे.

भाजीपाल्याची आवक घटली

मध्यंतरीच्या अतिवृष्टीमुळे शेतीपिकासह भाजीपाल्याचेही नुकसान झाले होते. तेव्हा झालेल्या नुकसानीचा परिणा आता बाजारपेठेत जाणवत आहे. कारण टोमॅटो, वटाणा याची मागणी होत असतानाही त्या तुलनेत पुरवठा होत नाही. त्यामुळे दरात वाढ होत आहे. मात्र, दर वाढीचा मलिदा हा मध्यस्तीच घेत आहेत. शेतकऱ्यांकडून तर नियमित भावातच भाजीपाल्याची खरेदी केली जात आहे. मात्र, बाजारपेठेत आवक कमी झाल्याचे भासवत अधिकच्या दराने भाजीपाल्याची विक्री केली जात आहे.

पावसामुळेही घटली आवक

सध्या अवकाळी पावसाने उसंत घेतली असली तरी मध्यंतरीच्या वातावरणातील बदलाचा आणि पावसाचा परिणाम हा भाजीपाल्याच्या आवकवर पर्यायाने दरावरही झालेला आहे. मुंबई बाजारपेठेत पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर येथून भाजीपाल्याची आवक होते. पावसानं हजेरी लावल्याने पश्चिम महाराष्ट्रातून बाजारपेठेत येणाऱ्या मालाची आवक घटली आहे. त्यात प्रामुख्याने वाटाणा आणि टोमॅटोचा समावेश आहे. त्यामुळे दरात वाढ झाली आहे. मुंबई बाजार समितीमधील आजचे बाजारभाव शिमला 20, भेंडी 6, फ्लावर 12, टोमॅटो 50, वाटाणा 100, मिरची 20, कोबी 12 वांगी 10, कारली 16 रुपये प्रतिकिलो तर कोथिंबीर १५ आणि मेथी ८ रुपये जुडी होती.

इंधन दरवाढीचाही परिणाम

इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्च हा वाढला आहे. त्यामुळेही भाजीपाला महागल्याचे व्यापारी सांगत आहेत. पण किरकोळ विक्रेतेच भाजीपाल्याचा दर ठरवत आहेत. यावर कुणाचाच अंकूश राहिलेला नाही. त्यामुळे दरवाढीचा फायदा शेतकऱ्यांना नव्हे तर शेतकरी आणि ग्राहक यांच्यामध्ये असलेल्या मध्यस्तीलातच होत आहे. शेतकऱ्यांकडून मालाची खरेदी केल्यानंतर त्यामध्ये दुप्पट, तीप्पट वाढ करुन ग्राहकांना भाजीपाला विकला जात आहे.

संबंधित बातम्या :

सोयाबीनबाबत शेतकऱ्यांनाच शेतकऱ्यांचा सल्ला, दर वाढीमागचे गणितही कळाले

Weather: काय आहे ‘सी बँड डॉपलर रडार’? आसमानी संकट झेलणाऱ्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांना काय होणार फायदा ?

ऐतिहासिक वादग्रस्त कृषी कायदे अखेर रद्द, कॅबिनेट बैठकीत मंजूरी, 29 नोव्हेंबरला विधेयक सादर होणार

Non Stop LIVE Update
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात.
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल.
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य.
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात.
मग घाबरता कशाला? अजितदादांच्या 2019 च्या वक्तव्यावर शिवतारेंचं उत्तर
मग घाबरता कशाला? अजितदादांच्या 2019 च्या वक्तव्यावर शिवतारेंचं उत्तर.
लोकसभा लढवणार की नाही? शिवतारेंनी शिंदेंच्या भेटीनंतर केलं स्पष्ट
लोकसभा लढवणार की नाही? शिवतारेंनी शिंदेंच्या भेटीनंतर केलं स्पष्ट.
एवढी मोठी हस्ती, जीवाला धोका;कडूंनी उडवली राणांच्या वक्तव्याची खिल्ली
एवढी मोठी हस्ती, जीवाला धोका;कडूंनी उडवली राणांच्या वक्तव्याची खिल्ली.
टाईमपास,फुलस्टॉप, केहना क्या चाहते हो; गांधींच्या सभेवर सामंतांची टीका
टाईमपास,फुलस्टॉप, केहना क्या चाहते हो; गांधींच्या सभेवर सामंतांची टीका.
शरद पवार गटाकडून कोण लढणार लोकसभा? संभाव्य उमेदवारांची यादी tv9 कडे
शरद पवार गटाकडून कोण लढणार लोकसभा? संभाव्य उमेदवारांची यादी tv9 कडे.
भाजपला स्वतःची पोरं नाही, ते दुसऱ्यांच्या... राऊतांचा भाजपवर निशाणा
भाजपला स्वतःची पोरं नाही, ते दुसऱ्यांच्या... राऊतांचा भाजपवर निशाणा.