भाजीपाल्याची आवक घटली दर वाढले, बाजारावर नियंत्रण नसल्याने किरकोळ विक्रेत्यांची चांदी

शेती व्यवसयाशी निगडीत सर्वच बाबींवर अवकाळी पावसाचा परिणाम झालेला आहे. एकीकडे शेतात उभ्या असलेल्या पिकांवर किड, रोगराई वाढत आहे तर दुसरीकडे काढणी झालेल्या भाजीपाल्यावरही परिणाम होत आहे. अवकाळी पावसामुळे मुंबई बाजारपेठेत भाजीपाल्याची आवक कमी झाली असून दर हे वाढलेले आहेत.

भाजीपाल्याची आवक घटली दर वाढले, बाजारावर नियंत्रण नसल्याने किरकोळ विक्रेत्यांची चांदी
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Nov 24, 2021 | 4:15 PM

मुंबई : शेती व्यवसयाशी निगडीत सर्वच बाबींवर अवकाळी पावसाचा परिणाम झालेला आहे. एकीकडे शेतात उभ्या असलेल्या पिकांवर किड, रोगराई वाढत आहे तर दुसरीकडे काढणी झालेल्या भाजीपाल्यावरही परिणाम होत आहे. अवकाळी पावसामुळे ( Mumbai vegetable market) मुंबई बाजारपेठेत भाजीपाल्याची आवक कमी झाली असून दर हे वाढलेले आहेत. याचा थेट फायदा हा शेतकऱ्यांना नाही तर किरकोळ विक्रेत्यांनाच होत आहे. दराबाबत कुणाचेच नियंत्रण नसल्यामुळे किरकोळ विक्रेत्ये जे ठरवतील तोच दर ग्राह्य मानला जात आहे. त्यामुळे ग्राहकांना अधिकचे पैसे तर मोजावे लागत आहेत पण दुर्देव म्हणजे हे उत्पाकदाकांच्याही पदरी पडत नाहीत.

मालाची आवक घटली की दर वाढणार हे बाजारपेठेचे सुत्रच आहे. पण त्यामुळे शेतकऱ्यांना तरी फायदा होणे अपेक्षित असते मात्र, येथील बाजारपेठेत किरकोळ विक्रेतेच अधिकचा लाभ घेत आहेत. मुंबई एपीएमसी भाजीपला मार्केटमध्ये आज 580 गाड्याची आवक झाली असून टोमॅटो 50 रुपये तर वाटाणा 100 रुपये किलो विकला जात असून इतर भाज्यांच्या दरात वाढ झाली आहे.

भाजीपाल्याची आवक घटली

मध्यंतरीच्या अतिवृष्टीमुळे शेतीपिकासह भाजीपाल्याचेही नुकसान झाले होते. तेव्हा झालेल्या नुकसानीचा परिणा आता बाजारपेठेत जाणवत आहे. कारण टोमॅटो, वटाणा याची मागणी होत असतानाही त्या तुलनेत पुरवठा होत नाही. त्यामुळे दरात वाढ होत आहे. मात्र, दर वाढीचा मलिदा हा मध्यस्तीच घेत आहेत. शेतकऱ्यांकडून तर नियमित भावातच भाजीपाल्याची खरेदी केली जात आहे. मात्र, बाजारपेठेत आवक कमी झाल्याचे भासवत अधिकच्या दराने भाजीपाल्याची विक्री केली जात आहे.

पावसामुळेही घटली आवक

सध्या अवकाळी पावसाने उसंत घेतली असली तरी मध्यंतरीच्या वातावरणातील बदलाचा आणि पावसाचा परिणाम हा भाजीपाल्याच्या आवकवर पर्यायाने दरावरही झालेला आहे. मुंबई बाजारपेठेत पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर येथून भाजीपाल्याची आवक होते. पावसानं हजेरी लावल्याने पश्चिम महाराष्ट्रातून बाजारपेठेत येणाऱ्या मालाची आवक घटली आहे. त्यात प्रामुख्याने वाटाणा आणि टोमॅटोचा समावेश आहे. त्यामुळे दरात वाढ झाली आहे. मुंबई बाजार समितीमधील आजचे बाजारभाव शिमला 20, भेंडी 6, फ्लावर 12, टोमॅटो 50, वाटाणा 100, मिरची 20, कोबी 12 वांगी 10, कारली 16 रुपये प्रतिकिलो तर कोथिंबीर १५ आणि मेथी ८ रुपये जुडी होती.

इंधन दरवाढीचाही परिणाम

इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्च हा वाढला आहे. त्यामुळेही भाजीपाला महागल्याचे व्यापारी सांगत आहेत. पण किरकोळ विक्रेतेच भाजीपाल्याचा दर ठरवत आहेत. यावर कुणाचाच अंकूश राहिलेला नाही. त्यामुळे दरवाढीचा फायदा शेतकऱ्यांना नव्हे तर शेतकरी आणि ग्राहक यांच्यामध्ये असलेल्या मध्यस्तीलातच होत आहे. शेतकऱ्यांकडून मालाची खरेदी केल्यानंतर त्यामध्ये दुप्पट, तीप्पट वाढ करुन ग्राहकांना भाजीपाला विकला जात आहे.

संबंधित बातम्या :

सोयाबीनबाबत शेतकऱ्यांनाच शेतकऱ्यांचा सल्ला, दर वाढीमागचे गणितही कळाले

Weather: काय आहे ‘सी बँड डॉपलर रडार’? आसमानी संकट झेलणाऱ्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांना काय होणार फायदा ?

ऐतिहासिक वादग्रस्त कृषी कायदे अखेर रद्द, कॅबिनेट बैठकीत मंजूरी, 29 नोव्हेंबरला विधेयक सादर होणार

Non Stop LIVE Update
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?.
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत.
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य.
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल.
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली.
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?.
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ.
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट.
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले....