5

खाद्य तेलावरील आयातशुल्क कमी करुनही दर तेजीतच

सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने खाद्य तेलावरील आयाशुल्क (Import duty on edible oil) हे कमी केले होते. त्यामुळे किमान 5 ते 10 रुपयांनी दर कमी होतील असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, बाजारपेठेतले चित्र हे वेगळे आहे. (Increase in food prices) खाद्य तेलाचे दर कमी होण्याएवजी वाढत आहेत.

खाद्य तेलावरील आयातशुल्क कमी करुनही दर तेजीतच
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Sep 27, 2021 | 5:15 PM

मुंबई : सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने खाद्य तेलावरील आयाशुल्क (Import duty on edible oil) हे कमी केले होते. त्यामुळे किमान 5 ते 10 रुपयांनी दर कमी होतील असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, बाजारपेठेतले चित्र हे वेगळे आहे. (Increase in food prices) खाद्य तेलाचे दर कमी होण्याएवजी वाढत आहेत. ऐन सणासुदीमध्ये दर वाढत असल्याने सर्वसामान्य जनतेला महागाईला सामोरे जावे लागणार आहे. सर्वच तेलांच्या दरात 5 ते 10 रुपयांनी वाढ झालेली आहे.

गतवर्षीच्या तुलनेत यंदा देशातील तेलबियाणांचे उत्पादन घटेल असा अंदाजच केंद्रीय कृषी मंत्रालयाने व्यक्त केला होता. त्यामुळे भविष्यात खाद्यतेलाचे दर हे वाढणारच होते. पण याची तीव्र झळ सर्वसामान्य ग्राहकांना बसू नये म्हणून खाद्यतेलावरील आयात शुल्क हे कमी केले होते. कारण गेल्या काही दिवसांपासून तेलाचे दर हे वाढतच असल्याने किमान ऐन सणासुदीत जनतेला सरासरीच्या किमतीने खाद्य तेल दर व्हावेत हा त्यामागचा हेतू होता.

पण दिवाळी, दसरा या सणाच्या तोंडावरच दर हे वाढू लागले आहेत. गेल्या वर्षीही दिवाळी सणामध्येच तेलाचे आणि डाळीचे दर हे वाढले होते. मध्यंतरी 200 किलोवर गेलेले दर कमी होण्यास सुरवात झाली होती पण आता पुन्हा तेलाच्या दरात 5 ते 10 रुपयांनी वाढ होत आहे. पामतेलाचे दर हे 5 रुपयांनी आणि इतर तेलाचे दर हे 4 रुपयांनी कमी होण्याच्या उद्देशाने आयातशुल्क ही कमी कण्यात आली होती.

या खाद्यतेलाच्या दरात झालीय वाढ

दिवाळी, दसरा हे सण काही दिवसावर येऊन ठेपले आहेत. त्यामुळे खाद्य तेलाची खरेदी ही करावीच लागणार आहे. पण सोयाबीन, शेंगदाणा, तीळ, पामतेल आणि सुर्यफूल तेलाच्या दरात वाढ झाली आहे. या सर्वच तेलाच्या दरात 5 ते 10 रुपयांनी वाढ झालेली आहे. शिवाय अणखीन दर वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

सोयाबीनचे दर पडले तरीही खाद्यतेल चढ्या दराने

सोयाबीनच्या दरामध्ये कमालीची घट झाली आहे. हंगामाच्या सुरवातीला 8600 रुपये क्विंटलचा दर हा मिळालेला होता. मात्र, अवघ्या काही दिवसांमध्ये सोयाबीनची आवक वाढताच दर हे निम्म्याने कमी झाले होते. सध्याही सोयाबीनच्या दरात चढ-उतार हा सुरु आहे. सोयाबीनचे दर कमी होऊनही सोयाबीन तेलाचे दर हे वाढतच असल्याने रोष व्यक्त होत आहे. सोयाबीन तेलात 5 रुपयांनी वाढ झालेली आहे. शिवाय केंद्र सरकारने सोयापेंडच्या आयातीला परवानगी दिली असूनही तेलाच्या दरात वाढ ही होत आहे. (Prices rise despite reducing import duty on edible oil, consumer anger)

          जून               सप्टेंबर शेंगदाणा  150          155 सूर्यफूल  140            150 सोयाबीन  130          140 पामतेल  125            130

संबंधित बातम्या :

एकरकमी एफ.आर.पी साठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा अनोखा ‘फंडा’

उभा कापूस आडवा, सोयाबीनला कोंब फुटले ; शेतकऱ्यांचे डोळे सरकारच्या मदतीकडे

यंदा पेरणी दुबार, पंचनामेही दुबार अन् पाऊस सरासरी पार

Non Stop LIVE Update
राज ठाकरेंकडून चिंता व्यक्त; म्हणाले, '... ते वेळीच थांबवलं पाहिजे'
राज ठाकरेंकडून चिंता व्यक्त; म्हणाले, '... ते वेळीच थांबवलं पाहिजे'
वाघनखांच्या मुद्द्यावरुन सुरू असलेल्या वादादरम्यान शरद पवार म्हणाले...
वाघनखांच्या मुद्द्यावरुन सुरू असलेल्या वादादरम्यान शरद पवार म्हणाले...
शिवेंद्रराजेंचं चॅलेंज, म्हणाले, 'शिवरायांची वाघनखं खोटी असतील तर...'
शिवेंद्रराजेंचं चॅलेंज, म्हणाले, 'शिवरायांची वाघनखं खोटी असतील तर...'
'एकनाथ शिंदे हे वाघ', असे म्हणत शहाजीबापू पाटील यांनी कुणाला डिवचलं?
'एकनाथ शिंदे हे वाघ', असे म्हणत शहाजीबापू पाटील यांनी कुणाला डिवचलं?
वाघनखं आणूनही दिल्लीची गुलामीच करणार, कुणाची शिंदे सरकारवर टीका?
वाघनखं आणूनही दिल्लीची गुलामीच करणार, कुणाची शिंदे सरकारवर टीका?
वंदेभारतची सुसाट सफाई, अवघ्या १४ मिनिटांत पूर्ण ट्रेन होणार चकाचक
वंदेभारतची सुसाट सफाई, अवघ्या १४ मिनिटांत पूर्ण ट्रेन होणार चकाचक
कोकणातील गणेश भक्तांसाठी खुला करण्यात आलेला कशेडी बोगदा बंद, काय कारण?
कोकणातील गणेश भक्तांसाठी खुला करण्यात आलेला कशेडी बोगदा बंद, काय कारण?
'मला आदू बाळ म्हटलं याचा अभिमान कारण...', आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर
'मला आदू बाळ म्हटलं याचा अभिमान कारण...', आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर
फडणवीस यांचा आदित्य ठाकरेंना टोला; म्हणाले, 'मी बालबुद्धीला उत्तर...'
फडणवीस यांचा आदित्य ठाकरेंना टोला; म्हणाले, 'मी बालबुद्धीला उत्तर...'
पावसानं बंद असलेल्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पात पर्यटन हंगाम पुन्हा सुरू
पावसानं बंद असलेल्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पात पर्यटन हंगाम पुन्हा सुरू