AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतकऱ्यांची द्वीधा मनस्थिती, सोयाबीनची विक्री की साठवणूक, हंगामाच्या अंतिम टप्प्यात काय आहे बाजारपेठेतले चित्र?

आतापर्यंत सोयाबीनची विक्री की साठवणूक याबाबत शेतकऱ्यांचा निर्णय हा ठाम होता. पण गेल्या काही दिवसांपासून (Soybean Rate) सोयाबीन दरातील चढ-उतारामुळे नेमकी काय करावे याबाबत शेतकरी संभ्रमात आहे. कारण बाजारपेठेतले दर वाढले की टप्प्याटप्प्याने विक्री आणि दरात घट झाली की, पुन्हा साठवणूक हे ठरलेले गणित होते.

शेतकऱ्यांची द्वीधा मनस्थिती, सोयाबीनची विक्री की साठवणूक, हंगामाच्या अंतिम टप्प्यात काय आहे बाजारपेठेतले चित्र?
संग्रहीत छायाचित्र
| Updated on: Jan 21, 2022 | 1:47 PM
Share

लातूर : आतापर्यंत सोयाबीनची विक्री की साठवणूक याबाबत शेतकऱ्यांचा निर्णय हा ठाम होता. पण गेल्या काही दिवसांपासून (Soybean Rate) सोयाबीन दरातील चढ-उतारामुळे नेमकी काय करावे याबाबत शेतकरी संभ्रमात आहे. कारण बाजारपेठेतले दर वाढले की टप्प्याटप्प्याने विक्री आणि दरात घट झाली की, पुन्हा साठवणूक हे ठरलेले गणित होते. पण हंगामाच्या अंतिम टप्प्यात आता दरात होणारे बदल आणि भविष्यात पुन्हा (Summer Season) उन्हाळी सोयाबीनची आवक यामुळे दर काय राहतील याबाबत संभ्रमता निर्माण होत आहे. त्यामुळेच सध्या दरात घसरण झाली असली तरी आवक मात्र टिकून आहे. आतापर्यंत दर घसरले की लागलीच त्याचा आवकवर परिणाम होत होता पण गेल्या आठ दिवसांपासून 6 हजार 200 रुपयांवर सोयाबीन स्थिरावले असताना (Latur Market) लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 25 हजार पोत्यांची आवक ही सुरुच आहे.

शेतकऱ्यांच्या मनात नेमकी काय भीती?

आतापर्यंत सोयाबीनचे दर टिकून ठेवण्यामध्ये शेतकऱ्यांची महत्वाची भूमिका राहिलेली आहे. बाजारपेठेचे गणित त्यांच्या लक्षात आले होते. उत्पादनात अतिरिक्त पावसामुळे घट ही झालीच होती. त्यामुळे हंगामात केव्हा ना केव्हा वाढीव दर मिळतील ही अपेक्षा शेतकऱ्यांना होतीच. त्यामुळे घटलेले दर असताना शेतकऱ्यांनी केव्हाच विक्री केली नाही. शिवाय सरासरीचा दर असतानाही एकदम आवक न वाढवता टप्प्याटप्प्याने सोयाबीनची विक्री केली होती. त्यामुळेच दिवाळीपर्यंत 4 हजार 800 रुपयांवर असलेले सोयाबीन दिवाळीनंतर थेट 6 हजार 600 येऊन ठेपले होते. आता पुन्हा त्यामध्ये घसरण झाली असून गेल्या 15 दिवसांपासून 6 हजार 200 वर स्थिरावले आहे. पण भविष्यात उन्हाळी हंगामातील सोयाबानची आवक सुरु होईल आणि त्याचा दरावर परिणाम होणार यामुळे साठवणूक केलेले सोयाबीन विक्रीवर शेतकऱ्यांचा भर आहे.

काय आहे तज्ञांचा सल्ला ?

सध्या हंगाम अंतिम टप्प्यात आहे. हंगामाच्या सुरवातीपासून सोयाबीनच्या दरात चढ-उतार राहिलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी घेतलेला सावध पवित्रा हा महत्वाचा ठरलेला आहे. मात्र, सध्या बाजारपेठेत बदल होत आहे. सोयापेंडच्या दरात घट झाली आहे. शिवाय आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत उठाव नाही. असे असले तरी शेतकऱ्यांनी अधिकच्या दराची अपेक्षा न करता सध्याही टप्प्याटप्प्याने विक्री करणेच फायद्याचे राहणार आहे. सध्या दर जरी सामान्य असले तरी पूर्णच सोयाबीनची साठवणूक करु नये असा सल्ला व्यापारी अशोक अग्रवाल यांनी दिला आहे.

संबंधित बातम्या :

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी: घोटाळेबाजांना आळा घालण्यासाठी पीएम किसान योजनेत काय झाला बदल?

Nashik : तुम्हीही शेतकऱ्यांचीच मुलं, द्राक्ष उत्पादकांची बाजू समजून घ्या..! बागायतदार संघाचा निर्णय टिकणार का मोडीत निघणार..!

सांगलीच्या हळद-बेदाण्याला भौगोलिक मानांकन, अधिकृत वापरकर्तासाठी काय आहे प्रक्रिया? वाचा सविस्तर

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...