AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Unseasonal Rain : अवकाळी पावसामुळं 702 घरांची पडझड, 4 व्यक्तीचा मृत्यू, 58 जनावरं दगावली

पावसामुळे कांदा, आंबा व भाजीपाला तसेच फळबागांचे नुकसान झाले, तर जनावरांचा चाराही भिजल्याने पुढील काळात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न बिकट होणार असल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे.

Unseasonal Rain : अवकाळी पावसामुळं 702 घरांची पडझड, 4 व्यक्तीचा मृत्यू, 58 जनावरं दगावली
unseasonal rainImage Credit source: tv9marathi
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: May 06, 2023 | 1:41 PM
Share

भंडारा : जिल्ह्यात महिनाभरापासून तसा अवकाळी पावसाचा (unseasonal rain) कहर सुरू आहे. दरम्यान 1 ते 3 मे या तीन दिवसांच्या कालावधीत वादळ व पावसाची तीव्रता अधिक जाणवल्याने प्रशासनाच्या नोंदीनुसार जिल्ह्यात 702 घरांची पडझड झाली. तर लाखनी तालुक्यात 390.2 हेक्टरमध्ये शेतीचे नुकसान झाले आहे. दरम्यान लाखांदूर (lakhandur) तालुक्यालाही या काळात मोठा फटका बसला असून तेथील पीक नुकसानाची आकडेवारी उपलब्ध झालेली नाही. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून अवकाळी पावसाच्या (Agricultural news) संततधारेने पिकांचे मोठे नुकसान झाले. लाखनी व लाखांदूर वादळी पावसाने थैमान घातले. रस्त्यावर झाडे कोसळली, विजेचे खांब कोसळले. घरावरील कौलारू छप्पर उडाले आहे. त्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत.

अनेक गावं अंधारात आहेत, नापिकीची झळा सोसणाऱ्या या पावसाने शेतकरी ‘गार’ झाला आहे. सततच्या नापिकीला तोंड देत थकला आहे. सरकारने सावरण्यासाठी मदत करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. तीन दिवसांत झालेल्या अवकाळी पाऊस, वादळ आणि गारपिटीने उन्हाळी धान, मक्याचे पीक पुर्णपणे उद्ध्वस्त झाले. यंदा उन्हाळ्यात मार्चपासून अधून-मधून पाऊस सुरू आहे. खरीपनंतर रब्बी हंगामातील पिकांचेही नुकसान होत आहे. अवकाळी पावसाचा मुक्काम आता 7 मे पर्यंत लांबणार आहे. विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल, अशी शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे.

अवकाळी पावसाने 4 व्यक्तीचा मृत्यू, तर 58 जनावर दगावली

संपूर्ण राज्यासह बुलढाणा जिल्ह्यात देखील गेल्या दीड-दोन महिन्यापासून विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस होत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या रब्बी पिकासह, फळ बागेचे मोठे नुकसान झाले आहे. मनुष्यहानी व पशु आणि देखील मोठ्या प्रमाणात झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. मार्च ते एप्रिल 2023 या दोन महिन्याच्या कालावधीमध्ये जिल्ह्यात 4 जणांचा नैसर्गिक आपत्तीमुळे मृत्यू झाला आहे. तर 58 विविध जनावरांचा देखील मृत्यू झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. जीवितहानी झालेल्या सर्वच शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून आर्थिक मदत देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन कक्ष, नायब तहसीलदार, संजय बंगाळे यांनी सांगितलं.

अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली

नाशिकच्या सुरगाणा तालुक्यात सुमारे दीड तास अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले. पावसामुळे कांदा, आंबा व भाजीपाला तसेच फळबागांचे नुकसान झाले, तर जनावरांचा चाराही भिजल्याने पुढील काळात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न बिकट होणार असल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे.

पिकवलेल्या हळदीच्या पिकांचे देखील या पावसाने जबर नुकसान झालंय

नांदेडमध्ये गेल्या दहा दिवसापासून सातत्याने पाऊस पडत आहे, वादळी वारे गारपीट आणि पाऊस अश्या तिहेरी संकटामुळे सगळ्याच प्रकारचा भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे. भाजीपाला पिकाच्या उत्पादनातून घरखर्च भागवण्याचे स्वप्न शेतकऱ्यांचे धुळीला मिळाले आहे. त्यासोबतच वर्षभर मेहनत करून पिकवलेल्या हळदीच्या पिकांचे देखील या पावसाने जबर नुकसान झालंय, उकडून वाळायला ठेवलेली हळदीला उन्हाऐवजी पावसाचा सामना करावा लागलाय. त्यातून हळदीच्या पिकांचे देखील मोठे नुकसान झालेय. मात्र आता झालेल्या या नुकसानीचे अद्याप पंचनामे देखील पूर्ण झालेले नाहीत त्यामुळे शेतकरी हतबल बनलाय.

Follow Us
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या लांबच्या नातलगाने टप्प्यात केला कार्यक्रम, नाशिक कुंभमेळ्यात कसा झाला घोटाळा?
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं का म्हणाले? टर्निंग पॉइंट ठरणारा मुद्दा काय?
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर... अखेर कपिल सिब्बल यांची कोर्टाकडे मोठी मागणी
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
Manoj Jarange Video | भर मंचावरून मनोज जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीरावरून, चेहऱ्यावरून...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
Sukhbir Singh Badal | पंजाबच्या माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण काय? याआधीही... मोठी अपडेट समोर
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तिवाद, कोर्टाचं निदर्शन काय?
कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण: कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान