Agricultural : सोयाबीनचा चढता आलेख कायम, दरात सुधारणा होऊनही केळी उत्पादकांचा जीव कात्रीत ? शेतीमालाच्या दराचा लेखाजोखा

जून महिन्याच्या सुरवातीपर्यंत सोयाबीनच्या दरात कायम घसरण राहिलेली होती. केंद्र सरकारने सोयापेंडची केलेली आयात आणि बाजारपेठेत घटलेली मागणी यामुळे 7 हजार रुपये क्विंटलवर गेलेले सोयाबीन थेट 6 हजार 300 येऊन ठेपले होते. त्यामुळे साठवणूक करुनही पदरी निराशाच अशीच अवस्था शेतकऱ्यांची झाली होती. मात्र, प्रक्रिया उद्योजकांकडून होत असलेली मागणी आणि लांबलेला पाऊस यामुळे मागणीत वाढ झाल्याने गेल्या 5 दिवसांमध्ये सोयाबीनच्या दरात 400 रुपयांची वाढ झाली आहे.

Agricultural : सोयाबीनचा चढता आलेख कायम, दरात सुधारणा होऊनही केळी उत्पादकांचा जीव कात्रीत ? शेतीमालाच्या दराचा लेखाजोखा
सोयाबीनच्या दरात घट झाली आहे तर शेतीमालाची आवकही घटलेलीच आहे.Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jun 11, 2022 | 1:49 PM

लातूर : गेल्या काही दिवासांपासून (Agricultural Good) शेतीमालाच्या दरात कमालीची घट पाहवयास मिळाली आहे. आवक मोठ्या प्रमाणात असताना (Central Government) केंद्र सरकारची धोरणे आणि अचानक बंद झालेली हरभरा खरेदी केंद्रे याचा परिणाम सोयाबीन आणि हरभरा पिकांवर झालेला आहे. दुसरीकडे केळीच्या दरात सुधारणा होत असताना वादळी वाऱ्यामुळे (Banana Garden) केळी बागा आडव्या होत आहेत. मराठवाड्यासह विदर्भात पावसामुळे केळी बागांचे मोठे नुकसान झाले असून आता केळीची मागणी होते की नाही अशी स्थिती आहे. एकंदरीत बदलत्या वातावरणाचा परिणाम उत्पादनावर आणि बाजारपेठेतील शेतीमालाच्या दरावरही झाला आहे.

सोयाबीनच्या दरात सुधारणा कायम ?

जून महिन्याच्या सुरवातीपर्यंत सोयाबीनच्या दरात कायम घसरण राहिलेली होती. केंद्र सरकारने सोयापेंडची केलेली आयात आणि बाजारपेठेत घटलेली मागणी यामुळे 7 हजार रुपये क्विंटलवर गेलेले सोयाबीन थेट 6 हजार 300 येऊन ठेपले होते. त्यामुळे साठवणूक करुनही पदरी निराशाच अशीच अवस्था शेतकऱ्यांची झाली होती. मात्र, प्रक्रिया उद्योजकांकडून होत असलेली मागणी आणि लांबलेला पाऊस यामुळे मागणीत वाढ झाल्याने गेल्या 5 दिवसांमध्ये सोयाबीनच्या दरात 400 रुपयांची वाढ झाली आहे. शिवाय आता शेतकऱ्यांकडे उन्हाळी सोयाबीनही आहे. मात्र, वाढीव दर मिळाल्याशिवाय विक्री न करण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे.

वादळी वाऱ्यामुळे केळी उत्पादकांचे नुकसान

शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा होती पाऊस बरोबर वादळी वारेही घेऊन आल्याने सर्वाधिक नुकसान झाले आहे ते केळी उत्पादकांचे. आता केळी तोडणीला आली आहे. शिवाय 2 हजार 200 रुपये क्विंटल असा दरही आहे. हंगामातील विक्रमी दर असताना दुसरीकडे तोडणीला आलेल्या केळी बागा ह्या वादळी वाऱ्यामुळे आडव्या झाल्या आहेत. त्यामुळे केळी उत्पादकांचा तोंडचा घास हिसकावला जात आहे. नाशिकसह मराठवाड्यातील शेतकरी तोडणीला आलेली केळी पदरात पाडून घेण्यासाठी प्रयत्न करीत आहे.

हे सुद्धा वाचा

इतर शेतीमालाच्या दराचे काय ?

लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जिल्ह्यासह मराठवाड्यातून शेतीमालाची आवक होते. विशेष करुन येथील प्रक्रिया उद्योगामुळे सोयाबीन विशेष महत्व आहे.सध्या तुरीला 6 हजार 240, हरभरा 4 हजार 700, सोयाबीन 6 हजार 900, मूग 5 हजार 600 रु क्विंटल, उडीद 6 हजार 250 असे दर आहेत. शेतीमालाच्या दरात घसरण होत असताना आता सोयाबीन आणि तुरीच्या दरात वाढ होत असल्याने दिलासा मिळत आहे.

Non Stop LIVE Update
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.