AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Agricultural : सोयाबीनचा चढता आलेख कायम, दरात सुधारणा होऊनही केळी उत्पादकांचा जीव कात्रीत ? शेतीमालाच्या दराचा लेखाजोखा

जून महिन्याच्या सुरवातीपर्यंत सोयाबीनच्या दरात कायम घसरण राहिलेली होती. केंद्र सरकारने सोयापेंडची केलेली आयात आणि बाजारपेठेत घटलेली मागणी यामुळे 7 हजार रुपये क्विंटलवर गेलेले सोयाबीन थेट 6 हजार 300 येऊन ठेपले होते. त्यामुळे साठवणूक करुनही पदरी निराशाच अशीच अवस्था शेतकऱ्यांची झाली होती. मात्र, प्रक्रिया उद्योजकांकडून होत असलेली मागणी आणि लांबलेला पाऊस यामुळे मागणीत वाढ झाल्याने गेल्या 5 दिवसांमध्ये सोयाबीनच्या दरात 400 रुपयांची वाढ झाली आहे.

Agricultural : सोयाबीनचा चढता आलेख कायम, दरात सुधारणा होऊनही केळी उत्पादकांचा जीव कात्रीत ? शेतीमालाच्या दराचा लेखाजोखा
सोयाबीनच्या दरात घट झाली आहे तर शेतीमालाची आवकही घटलेलीच आहे.Image Credit source: TV9 Marathi
राजेंद्र खराडे
राजेंद्र खराडे | Updated on: Jun 11, 2022 | 1:49 PM
Share

लातूर : गेल्या काही दिवासांपासून (Agricultural Good) शेतीमालाच्या दरात कमालीची घट पाहवयास मिळाली आहे. आवक मोठ्या प्रमाणात असताना (Central Government) केंद्र सरकारची धोरणे आणि अचानक बंद झालेली हरभरा खरेदी केंद्रे याचा परिणाम सोयाबीन आणि हरभरा पिकांवर झालेला आहे. दुसरीकडे केळीच्या दरात सुधारणा होत असताना वादळी वाऱ्यामुळे (Banana Garden) केळी बागा आडव्या होत आहेत. मराठवाड्यासह विदर्भात पावसामुळे केळी बागांचे मोठे नुकसान झाले असून आता केळीची मागणी होते की नाही अशी स्थिती आहे. एकंदरीत बदलत्या वातावरणाचा परिणाम उत्पादनावर आणि बाजारपेठेतील शेतीमालाच्या दरावरही झाला आहे.

सोयाबीनच्या दरात सुधारणा कायम ?

जून महिन्याच्या सुरवातीपर्यंत सोयाबीनच्या दरात कायम घसरण राहिलेली होती. केंद्र सरकारने सोयापेंडची केलेली आयात आणि बाजारपेठेत घटलेली मागणी यामुळे 7 हजार रुपये क्विंटलवर गेलेले सोयाबीन थेट 6 हजार 300 येऊन ठेपले होते. त्यामुळे साठवणूक करुनही पदरी निराशाच अशीच अवस्था शेतकऱ्यांची झाली होती. मात्र, प्रक्रिया उद्योजकांकडून होत असलेली मागणी आणि लांबलेला पाऊस यामुळे मागणीत वाढ झाल्याने गेल्या 5 दिवसांमध्ये सोयाबीनच्या दरात 400 रुपयांची वाढ झाली आहे. शिवाय आता शेतकऱ्यांकडे उन्हाळी सोयाबीनही आहे. मात्र, वाढीव दर मिळाल्याशिवाय विक्री न करण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे.

वादळी वाऱ्यामुळे केळी उत्पादकांचे नुकसान

शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा होती पाऊस बरोबर वादळी वारेही घेऊन आल्याने सर्वाधिक नुकसान झाले आहे ते केळी उत्पादकांचे. आता केळी तोडणीला आली आहे. शिवाय 2 हजार 200 रुपये क्विंटल असा दरही आहे. हंगामातील विक्रमी दर असताना दुसरीकडे तोडणीला आलेल्या केळी बागा ह्या वादळी वाऱ्यामुळे आडव्या झाल्या आहेत. त्यामुळे केळी उत्पादकांचा तोंडचा घास हिसकावला जात आहे. नाशिकसह मराठवाड्यातील शेतकरी तोडणीला आलेली केळी पदरात पाडून घेण्यासाठी प्रयत्न करीत आहे.

इतर शेतीमालाच्या दराचे काय ?

लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जिल्ह्यासह मराठवाड्यातून शेतीमालाची आवक होते. विशेष करुन येथील प्रक्रिया उद्योगामुळे सोयाबीन विशेष महत्व आहे.सध्या तुरीला 6 हजार 240, हरभरा 4 हजार 700, सोयाबीन 6 हजार 900, मूग 5 हजार 600 रु क्विंटल, उडीद 6 हजार 250 असे दर आहेत. शेतीमालाच्या दरात घसरण होत असताना आता सोयाबीन आणि तुरीच्या दरात वाढ होत असल्याने दिलासा मिळत आहे.

Follow Us
तुळजाभवानी मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार तीन दिवस राहणार बंद
तुळजाभवानी मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार तीन दिवस बंद
मोठी बातमी! एअर इंडियाच्या वैमानिकांना ड्रग टेस्ट अनिवार्य
एअर इंडियाच्या वैमानिकांना ड्रग टेस्ट अनिवार्य: गांजा सेवनानंतर कठोर निर्णय
रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ
रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ: परिवहन विभागाचा निर्णय
आजच्या महाराष्ट्र बातम्या: शिवसेना सुनावणी, राजकीय घडामोडी
महाराष्ट्रातील ताज्या बातम्या: राजकीय घडामोडी, हवामान अंदाज आणि महत्त्वाचे निर्णय
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या लांबच्या नातलगाने टप्प्यात केला कार्यक्रम, नाशिक कुंभमेळ्यात कसा झाला घोटाळा?
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं का म्हणाले? टर्निंग पॉइंट ठरणारा मुद्दा काय?
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर... अखेर कपिल सिब्बल यांची कोर्टाकडे मोठी मागणी
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
Manoj Jarange Video | भर मंचावरून मनोज जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीरावरून, चेहऱ्यावरून...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
Sukhbir Singh Badal | पंजाबच्या माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण काय? याआधीही... मोठी अपडेट समोर
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?