AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Akola : मराठवाड्यानंतर विदर्भातही केळी बागा आडव्या, पहिल्याच पावसामध्ये बदलले चित्र

केळी हे बारमाहीचे पीक असले तरी बदलत्या वातावरणामुळे यंदा केळीचे दर घसरलेले आहेत. इतर फळांच्या उत्पादनाचा परिणाम केळीच्या दरावर झालेला आहे. अपेक्षित दर न मिळाल्याने अनेक शेतकऱ्यांनी केळीच्या बागा मोडल्या पण उर्वरीत क्षेत्रातील बागा आता वादळी वाऱ्यामुळे आडव्या झाल्या आहेत.

Akola : मराठवाड्यानंतर विदर्भातही केळी बागा आडव्या, पहिल्याच पावसामध्ये बदलले चित्र
वादळी वाऱ्यासह अकोला जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे केळी बागांचे मोठे नुकसान झाले आहे.Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Jun 11, 2022 | 11:04 AM
Share

अकोला :  (Kharif Season) खरीप हंगामातील पेरणीचा श्रीगणेशा कऱण्यासाठी शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा होती. उशीरा का होईना पावसाने हजेरी लावली असली तरी पावसाबरोबर सोसाट्याच्या वाऱ्याने मोठे नुकसान होत आहे. गतआठवड्यात मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यात तोडणीला आलेल्या (Banana garden) केळी बागा आडव्या झाल्या होत्या तर आता अकोला जिल्ह्यात केळी बागाचे नुकसान झाले आहे. (Akola) जिल्ह्यातील तेल्हारा, अकोट तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामध्ये जवळपास 100 ते 150 हेक्टरावरील केळी आडवी झाली आहे. आता काढणी काही दिवसांवर येऊन ठेपली असतानाच झालेले नुकसान न भरुन निघण्यासारखे आहे. पहिल्या पावसाने जिल्ह्यातील चित्र बदलले असले तरी केळी उत्पादकांना नुकसानीच्या झळा सहन कराव्या लागल्या आहेत.

घटत्या दराची चिंता त्यामध्येच न भरुन निघणारे नुकसान

केळी हे बारमाहीचे पीक असले तरी बदलत्या वातावरणामुळे यंदा केळीचे दर घसरलेले आहेत. इतर फळांच्या उत्पादनाचा परिणाम केळीच्या दरावर झालेला आहे. अपेक्षित दर न मिळाल्याने अनेक शेतकऱ्यांनी केळीच्या बागा मोडल्या पण उर्वरीत क्षेत्रातील बागा आता वादळी वाऱ्यामुळे आडव्या झाल्या आहेत. शिवाय केळी तोडणी तोंडावर असतानाच निसर्गाची अवकृपा झाली आणि एका रात्रीतून होत्याचे नव्हते झाले आहे.

नुकसानभरपाईची मागणी

केळी बागांना हंगामाच्या सुरवातीपासूनच फटका बसलेला आहे. यापूर्वी अवकाळी पावसामुळे रोगराईचा प्रादुर्भावामुळे उत्पादनाच घट झाली होती तर काढणीच्या दरम्यान दर घटले. दुसरे हे फळपिक जोपासण्यासाठी शेतकऱ्यांनी एकरी हजारो खर्च केला होता. त्यामुळे आता कुठे अपेक्षित उत्पन्न पदरी पडेल अशी आशा असतानाच शुक्रवारी वादळी वाऱ्यामुळे तेल्हारा, अकोट तालुक्यातील बागा ह्या आडव्या झाल्या आहेत. केळीसकट बागा जमिनदोस्त झाल्याने आता प्रशासनानेच पंचनामे करुन मदत करावी अशी मागणी शेतकरी करीत आहे.दानापुरात तर 100 हेक्टरावरील केळीबागा आडव्या झाल्या आहेत.

पावसामुळे खरिपाचा मार्ग सुखकर

पाऊस हा अवकाळी असो की हंगामातला नुकसान मात्र, फळपिकांचे हे ठरलेलेच आहे. यापूर्वी अवकाळी पावसामुळे आंबा, द्राक्ष या फळपिकांचे नुकसान झाले होते तर आता केळी बागा आडव्या झाल्या आहेत. त्यामुळे फळबागांमधून अधिकचे उत्पादन तर सोडाच पण झालेला खर्चही निघणे मुश्किल झाले आहे. मात्र, पावसाच्या आगमनामुळे खरिपातील रखडलेल्या पेरणी कामांना वेग येणार आहे. खरीपपूर्व मशागतीची कामे तर झाली आहेत अपेक्षित पाऊस झाला की चाढ्यावर मूठ धरायला शेतकरी मोकळा होणार आहे.

Follow Us
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!.
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!.
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं.
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच.
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.