AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM Kisan : कशामुळे सुरु झाली योजना? रक्कम जमा होत असतानाच पंतप्रधान मोदींनी सांगितले कारण!

पीएम किसान सन्मान योजना सुरु करावी अशी मागणी सरकारकडे कुणी केलीच नव्हती. मात्र, देशातील अल्पभुधारक शेतकऱ्यांची परस्थिती पाहूनच हा निर्णय घेण्यात आला होता. आता या योजनेमुळे शेती व्यवसयासाठी आवश्यक पायाभूत बाबी अल्पभुधारक शेतकऱ्यांना घेता येत असल्याचेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले.

PM Kisan : कशामुळे सुरु झाली योजना? रक्कम जमा होत असतानाच पंतप्रधान मोदींनी सांगितले कारण!
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना
| Updated on: Jan 01, 2022 | 3:11 PM
Share

मुंबई : देशभरात 86 टक्के शेतकरी हे अल्पभुधारक आहेत. त्यांना पायाभूत सोईसुविधा मिळाव्यात त्यांचा सर्वांगिण विकास व्हावा हेच केंद्र सरकारचे धोरण आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे हा निर्धारच केंद्र सरकारने केलेला आहे. ( PM Kisan Samman Nidhi Yojana) पीएम किसान सन्मान योजना सुरु करावी अशी मागणी (Central Government) सरकारकडे कुणी केलीच नव्हती. मात्र, देशातील अल्पभुधारक शेतकऱ्यांची परस्थिती पाहूनच हा निर्णय घेण्यात आला होता. आता या योजनेमुळे शेती व्यवसयासाठी आवश्यक पायाभूत बाबी अल्पभुधारक शेतकऱ्यांना घेता येत असल्याचेही (PM Narendra Modi) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले. शनिवारी पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा 10 हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करीत असताना त्यांनी हे सांगितले आहे. देशभरातील 10 कोटी 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर या हप्त्याची रक्कम जमा करण्यात आली आहे.

ही अशी पहिलीच योजना

आतापर्यंत अनेक योजना राबवण्यात आल्या आहेत. पण पीएम किसान सन्मान योजना ही एक अशी योजना आहे की, ज्यामधून थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होत आहेत. ना कोणी मध्यस्ती ना कोणती कपात थेट आर्थिक लाभ मिळवून देणारी ही पहिलीच य़ोजना असल्याचे मोदींनी स्पष्ट केले. आतापर्यंत या योजनेअंतर्गत 1 लाख 80 हजार कोटी रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत शिवाय यामध्ये कोणत्याही प्रकारचा खंड पडलेला नाही हे विशेष. यामुळे शेतकऱ्यांना सरकारप्रती अधिक विश्वास दृढ होत आहे. शेतकऱ्यांच्या हीताच्या अनुशंगाने होत असलेल्या निर्णयाचा थेट फायदा होत असून शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होत आहे.

या धनराशीचा योग्य वापर

ही योजना अल्पभुधारक शेतकरीच केंद्रस्थानी ठेऊन सुरु करण्यात आलेली आहे. त्यामुळे वर्षभराच्या या रकमेतून शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते, अवजारे तसेच शेती मधील इतर कामे करण्यास या निधीचा वापर होत आहे. केंद्र सरकाच्या निधीचा थेट लाभ शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर होत असल्याने याचे मोठे समाधान असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे. या योजनेच्या माध्यमातून अल्पभुधारक शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याचा उद्देश साध्य होत असल्याचेही यावेळी मोदी यांनी सांगितले.

संबंधित बातम्या :

FPO : पंतप्रधान मोदींनीच सांगितले शेतकरी उत्पादक कंपनीचे 5 बलस्थाने, वाचा सविस्तर

एरंडोल बाजार समितीच्या एका निर्णय अन् शेतकऱ्यांच्या दोन शेती पिकांचा फायदा, वाचा सविसतर

नववर्षाची सुरवात शेतकरी हीताच्या निर्णयाने : पीएम किसानचा हप्ता जारी, अन् शेतकरी उत्पादक कंपन्यांना 14 हजार कोटी

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.