AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

1 लाख रुपये किलोनं विकली जाणारी भाजी पिकवणारा शेतकरी! कुठे होतं उत्पादन? वाचा सविस्तर

हॉप-शूट्स (hop-shoots) या भाजीचा दर तब्बल 1 लाख रुपये किलो आहे. (bihar aurangabad hopshoots crop)

1 लाख रुपये किलोनं विकली जाणारी भाजी पिकवणारा शेतकरी! कुठे होतं उत्पादन? वाचा सविस्तर
बिहारमध्ये hop-shoots भाजीची शेती केली जाते.
| Updated on: Mar 31, 2021 | 10:23 PM
Share

पटणा : तुम्ही जास्तीत जास्त किती महागडी भाजी पाहिली असेल?, हा प्रश्न तुम्हाला कोड्यात टाकणारा वाटू शकतो. कारण बाजारात भाज्यांचे भाव थोडेजरी वाढले, तरी आपण ओरडतो. कारण आपल्याकडे असलेल्या भाज्यांचा दर फार तर फार 100 रुपये किलोच्या आसपास असतो. मात्र, अशी एक भाजी आहे जिचा दर तब्बल 1 लाख रुपये किलो आहे. (worlds most costliest vegetable crop Hopshoots cultivated in Bihar Aurangabad district by farmer Amresh Singh)

या भाजीचं नाव आहे हॉप-शूट्स (hop-shoots). या भाजीचा उपयोग यापूर्वी औषध तयार करण्यासाठी व्हायचा. मात्र आता हॉप-शूट्सचा वापर भाजी म्हणूनसुद्धा होतो आहे. असं म्हटलं जातं की, या भाजीचा उपयोग शरीरातील कॅन्सरस सेल्स मारण्यासाठी होतो. त्यासाठी ही भाजी चांगल्या प्रकारे काम करते. हॉप-शूट्सच्या याच गुणधर्मामुळे ही भाजी जगातील सर्वात महागडी असून त्याची किंमत तब्बल 1 लाख रुपये किलोच्या आसपास आहे.

बिहारच्या औरंगाबादेत होतेय शेती

बरं हॉप-शूट्स या भाजीची चर्चा नेमकी आताच का होतेय हा प्रश्न अनेकांना पडला असेल. तर, हॉप-शूट्स चर्चेत येण्याचं कारण म्हणजे जगातील सर्वात महागडी भाजी चक्क भारतात पिकवली जातेय. बिहार राज्यातील औरंगाबाद जिल्ह्यातील अमरेश सिंह नावाचा शेतकरी या भाजीची शेती करतोय. मिळालेल्या माहितीनुसार हॉप शूट्स या भाजीच्या फुलाला ‘हॉप कोन्स’ म्हणतात. या फुलाचा उपयोग बियर तयार करण्यासाठी केला जातो. तर या हॉप-शूट्सच्या फांद्यांचा उपयोग भाजी तयार करण्यासाठी केला जातो.

थेट आएएस अधिकाऱ्याने घेतली दखल

दरम्यान, शेतकऱ्याच्या या शेतीची दखल थेट आयएएस अधिकारी सुप्रिया साहू यांनी घेतली आहे. याच कारणामुळे हॉप-शूट्सच्या शेतीची चर्चा संपूर्ण भारतभर होतेय. त्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार हॉप-शूट्स ही जगातील सर्वात महागडी भाजी असून औरंगाबाद जिल्ह्यातील अमेरश सिंह हे या भाजीची शेती करतात. अशा प्रकारची शेती करणारे भारतातील ते पहिलेच शेतकरी आहेत. सुप्रिया साहू यांनी सांगितल्याप्रमाणे अशा प्रकारची शेती ही भारतीय शेतकऱ्यांसाठी गेमचेंजर ठरू शकते.

इतर बातम्या :

प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा 52 लाख शेतकऱ्यांना फायदा, केंद्र सरकारकडून ‘या’ वर्षाची आकडेवारी जाहीर

प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा 52 लाख शेतकऱ्यांना फायदा, केंद्र सरकारकडून ‘या’ वर्षाची आकडेवारी जाहीर

मार्केटिंग ऑफिसरची नोकरी सोडून शेतकरी बनला, आज लाखो रुपये कमावतो

(worlds most costliest vegetable crop Hopshoots cultivated in Bihar Aurangabad district by farmer Amresh Singh)

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली