AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रेड सिग्नलला सुद्धा गाडीचे इंजिन चालू ठेवता? ‘हे’ नुकसान एकदा वाचा त्यानंतर ताबोडतोब कराल गाडी बंद

रस्त्यावरील रेड सिग्नलला वाहन चालू ठेवण्याची छोटीशी चूक तुमच्या खिशावरच नाही तर पर्यावरणावरही वाईट परिणाम करू शकते. रेड सिग्नलला एक ते दोन मिनिटे थांबल्यावर अनेकजण वाहनाचे इंजिन चालू ठेवतात, त्यामुळे अनेकांचे नुकसान होऊ शकते. हे परिणाम काय आहेत हे आज आम्ही तुम्हाला सांगतो? परिणाम जाणून घेतल्यानंतर तुम्ही अशा चुका करणे थांबवाल हे नक्की.

रेड सिग्नलला सुद्धा गाडीचे इंजिन चालू ठेवता? 'हे' नुकसान एकदा वाचा त्यानंतर ताबोडतोब कराल गाडी बंद
| Edited By: | Updated on: Feb 16, 2025 | 4:06 PM
Share

वाढत्या प्रदूषणाने पर्यावरणावर ताण पडू लागला आहे. त्याचबरोबर अनेक कंपन्यांनी पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या दृष्टीने इलेक्ट्रिक वाहन देखील भारतीय बाजारपेठेत लाँच केलेली आहे. त्याचबरोबर सरकार प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी ‘रेड लाईट ऑन-कार ऑफ’ आणि ‘ऑड-इव्हन’ सारख्या मोहिमाही चालवत आहे. सरकारची ही मोहीम तुमचा पाठिंबा मिळाला तरच यशस्वी होईल, पण तरीही लोकं रेड सिग्नलवर त्यांच्या कार, बाईक आणि स्कूटरचे इंजिन बंद करत नाहीत. लोकांच्या या छोट्या चुकीमुळे इंजिन चालू राहते आणि यामुळे प्रदूषण तर वाढतेच पण इतर अनेक प्रकारचे नुकसान देखील होते ज्याचा परिणाम खिशावरही होऊ शकतो. चला तर मग जाणून घेऊयात रेड सिग्नलवर गाड्या चालू ठेवल्याने कोणते वाईट परिणाम तुमच्या गादीवर आणि खिश्यावर होतो.

रेड सिग्नलवर इंजिन चालू ठेवण्याचे परिणाम

रेड सिग्नल लागताच काही लोकं त्यांची गाडी गियरमध्ये टाकून सिग्नल ग्रीन होईपर्यंत थांबवून ठेवतात, ज्यामुळे त्यांना क्लच दाबून ठेवावा लागतो. कारण क्लच गिअरमधून सुटताच गाडी जागेवरच थांबते. त्यामुळे विनाकारण क्लच सतत दाबून ठेवल्याने क्लच प्लेटवरही वाईट परिणाम होतो, ज्यामुळे क्लच प्लेट खराब होण्याची शक्यता वाढते.

तसेच क्लच सतत दाबून ठेवल्याने इंधनाचा अपव्यय किंवा क्लच प्लेट निकामी होऊ शकतात. त्यामुळे तुमच्या खिश्यावर मोठी कात्री बसू शकते, एवढेच नाही तर इंधनाचा वापर वाढल्याने मायलेजवरही परिणाम होऊ शकतो. ट्रॅफिक लाईनमध्ये इंजिन चालू ठेवण्याचा सर्वात मोठा तोटा म्हणजे तुमचे वाहन इंधन जळत राहते, ज्यामुळे इंधनाचा संपूर्ण अपव्यय होतो. दुसरा तोटा म्हणजे इंजिन चालू असेल तर वाहनातून निघणाऱ्या धुरातील घातक वायू प्रदूषणात वाढ करतात.

रेड सिग्नलला इंजिन बंद करण्याचा फायदा?

जेव्हा रेड सिग्नल असेल तेव्हा इंजिन बंद करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे इंधनाची म्हणजेच पैशाची बचत होईल. केवळ पैशांची बचत करूनच नाही तर या छोट्याशा गोष्टींद्वारे तुम्ही पर्यावरण सुरक्षित ठेवण्यातही हातभार लावू शकता.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.