AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कारच्या समोरच्या भागाला का असते जाळी? हे आहे यामागचे कारण

कारच्या मागील बाजूस फक्त बंपर दिलेले असते आणि डिझाइन सुधारण्यासाठी स्किड प्लेट्स दिल्या असतात. मग तुम्ही कधी विचार केला आहे का की कारला फ्रंट ग्रिलच का दिले जातात?

कारच्या समोरच्या भागाला का असते जाळी? हे आहे यामागचे कारण
कारImage Credit source: Social Media
| Updated on: Sep 06, 2023 | 8:04 PM
Share

मुंबई : कारला पुढील बाजूस बंपर आणि लोखंडी जाळी ज्याला आपण ग्रिल म्हणतो (Car Front Grill) ते दोन्ही असतात परंतु मागील बाजूस ग्रिल दिलेली नसते. कारच्या मागील बाजूस फक्त बंपर दिलेले असते आणि डिझाइन सुधारण्यासाठी स्किड प्लेट्स दिल्या असतात. मग तुम्ही कधी विचार केला आहे का की कारला फ्रंट ग्रिलच का दिले जातात आणि फक्त बंपर का दिले जात नाहीत? यामागे अनेक कारणे आहेत, त्यापैकी दोन मोठी कारणे आहेत. फार कमी लोकांना याबद्दल माहिती आहे. चला जाणून घेऊया.

ग्रिल देण्याची दोन महत्त्वाची कारणे

1.  कारमध्ये ग्रिल हा महत्त्वाचा भाग आहे कारण ते कारचे इंजिन थंड ठेवण्यास मदत करते. ग्रिलमध्ये लहान छिद्रं असतात, ज्याद्वारे बाहेरील हवा इंजिनपर्यंत पोहोचते. ही हवा इंजिनला जास्त गरम होण्यापासून रोखते आणि थंड ठेवण्यास मदत करते. तथापि, इंजिन थंड ठेवण्यासाठी कारमध्ये इतर उपाय देखील केले जातात, परंतु हे देखील त्यापैकी एक आहे. इंजिन योग्य तापमानात राहिल्यास ते चांगले कार्य करते.

2. ग्रिलमुळे कारचे फ्रंट डिझाईन चांगले बनवण्यास मदत होते. कारच्या पुढील भागाला नवीन आणि फ्रेश लुक देण्यासाठी ग्रिलचा वापर केला जातो. हे कार कंपन्यांना त्यांच्या कार इतरांच्या कारपेक्षा वेगळे करण्यात मदत करते. तुमच्या लक्षात आले असेल की साधारणपणे प्रत्येक कार कंपनीच्या गाड्यांमध्ये मिळणाऱ्या ग्रिलचे डिझाइन वेगळे असतात. कार कंपन्याही वेळोवेळी ग्रिल बदलत असतात.

ग्रिलच्या जागी बंपर दिले तर काय होईल?

गाड्यांमध्ये ग्रिल देण्याऐवजी बंपर वरपर्यंत वाढवले तर त्याचे अनेक नुकसान होऊ शकतात. सर्वात मोठा तोटा म्हणजे याचा परिणाम इंजिनच्या कूलिंगवर होईल. बंपर बंद असते आणि हवा इंजिनपर्यंत पोहोचण्यासाठी त्यातून जाणार नाही, ज्यामुळे इंजिनच्या थंड होण्यावर परिणाम होईल कारण हवेची योग्य मात्रा इंजिनपर्यंत पोहोचणार नाही. इंजिन थंड ठेवण्याचा हा नैसर्गिक उपाय आहे.

Follow Us
'सुनेत्रा पवारांना चाकणकरांकडून धोका असल्याची तक्रार' मुख्यमंत्री म्हण
'सुनेत्रा पवारांना चाकणकरांकडून धोका असल्याची तक्रार' मुख्यमंत्री म्हण.
हेलिकॉप्टरचा अपघात टळला, घटनेनंतर भुजबळांची प्रतिक्रिया समोर
हेलिकॉप्टरचा अपघात टळला, घटनेनंतर भुजबळांची प्रतिक्रिया समोर.
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; शिजूका नॉडी नावाने असंख्य कॉल्स
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; शिजूका नॉडी नावाने असंख्य कॉल्स.
'वारकरी संप्रदायात 60 % लोकांच्या...' शरद पवारांच्या भाष्यावरुन राजकीय
'वारकरी संप्रदायात 60 % लोकांच्या...' शरद पवारांच्या भाष्यावरुन राजकीय.
सुनेत्रा पवारांच्या जीवाला धोका? बीडमधील पत्रामुळे खळबळ
सुनेत्रा पवारांच्या जीवाला धोका? बीडमधील पत्रामुळे खळबळ.
ऑपरेशन टायगर चर्चेनंतर, सावंत-ठाकरे यांची मातोश्रीवर महत्त्वपूर्ण बैठक
ऑपरेशन टायगर चर्चेनंतर, सावंत-ठाकरे यांची मातोश्रीवर महत्त्वपूर्ण बैठक.
राज्यातील तीन जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भूकंपाने दहशत
राज्यातील तीन जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भूकंपाने दहशत.
खरात मुस्लिम असता तर त्याची.... बड्या नेत्याच्या वक्तव्याने खळबळ
खरात मुस्लिम असता तर त्याची.... बड्या नेत्याच्या वक्तव्याने खळबळ.
खरात प्रकरणामुळे देशात महाराष्ट्राची चेष्टा झालीये-सुळेंचा तीव्र संताप
खरात प्रकरणामुळे देशात महाराष्ट्राची चेष्टा झालीये-सुळेंचा तीव्र संताप.
अजित पवार यांचा फोन सापडला ब्लॅक बॉक्स का नाही सापडणार?
अजित पवार यांचा फोन सापडला ब्लॅक बॉक्स का नाही सापडणार?.