AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सलग पाच दिवस बँका बंद, नवरात्रीत ATM मध्ये पैशांचा तुटवडा?

लवकरच आता नवरात्री येत आहे. त्यानंतर लगेच दिवाळी आहे. दिवाळी म्हटली की, लोक मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी घराबाहेर पडतात. पण या दरम्यान सलग पाच दिवस बँका बंद (Bank Employees Strike) असणार आहेत.

सलग पाच दिवस बँका बंद, नवरात्रीत ATM मध्ये पैशांचा तुटवडा?
| Edited By: | Updated on: Sep 23, 2019 | 9:33 AM
Share

मुंबई : लवकरच नवरात्रीला सुरुवात होणार आहे. त्यानंतर अवघ्या काही दिवसांवर दिवाळी येऊन ठेपली आहे. दिवाळी म्हटली की, लोक मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी घराबाहेर पडतात. पण या दरम्यान सलग पाच दिवस बँका बंद (Bank Employees Strike) असणार आहेत. त्यामुळे खरेदी करताना तुम्हाला पैशांची (Money) कमतरता भासू शकते. कारण या महिन्याचा शेवटी सलग पाच दिवस बँका बंद (Bank Employees Strike) आहेत. त्यामुळे पुढील तीन दिवसात तुम्ही बँकेतून पैसे काढून घेऊ शकता.

या महिन्याच्या शेवटी सलग पाच दिवस बँका बंद आहेत. त्यामुळे त्यापूर्वीच तुम्ही पैसे काढू शकता. जेणेकरुन खरेदीसाठी तुम्हाला अडचणी येणार नाहीत. 26 आणि 27 सप्टेंबर रोजी बँक कर्मचारी संपावर जात आहेत. 10 सरकारी बँकांचे विलनीकरण करणार असल्याने कर्मचारी संप पुकारत आहेत. त्यानंतर 28 सप्टेंबरला महिन्याचा चौथा शनिवार आहे आणि 29 रविवार असल्यामुळे बँक बद राहतील.

सलग 26 ते 29 सप्टेंबर पर्यंत बँका बंद राहिल्यानंतर 30 सप्टेंबरला सुरु होतील. पण या दिवशी महिना अखेर असल्यामुळे बँका व्यवहार करणार नाहीत. सलग पाच दिवस बँका बंद राहिल्याने सामान्य जनतेसह व्यापाऱ्यांनाही याचा त्रास सहन करावा लागण्याची शक्यता आहे.

पाच दिवस सलग बँका बंद राहणार असल्याने त्याचा परिणाम एटीएमवरही पडू शकतो. एटीएममध्ये पैसे नसल्याने पैशांची कमतरता होऊ शकते. कारण एटीएममध्ये दोन दिवसाचे पैसे ठेवू शकतो. संप आणि बँक बंद असल्यामुळे 5 दिवस एटीएममध्ये पैसे टाकले जाणार नाही.

चेक क्लिअर होण्यासाठी वेळ लागणार

जर तुम्ही संप आणि बँका बंद असलेल्या वेळेत बँकेत चेक क्लिअर करण्यासाठी दिलात, तर तो क्लिअर होण्यासाठी आठवडा लागू शकतो. महिन्याच्या शेवटच्या दिवसात बँका बंद असल्यामुळे चेक क्लिअर होण्याची शक्यता कमी आहे. कारण बँका 30 ला जरी सुरु झाल्या, तर 2 ऑक्टोबर रोजी पुन्हा गांधी जयंती आहे. त्यामुळे बँका बंद असतील. तुमचा चेक गांधी जयंतीनंतरच क्लिअर होऊ शकेल.

दरम्यान, सरकारकडून 10 बँकांचे विलिनीकरण करुन चार बँका तयार करण्याची शक्यता आहे. याचा विरोध म्हणून कर्मचारी संघटनेनी संप पुकारला आहे. यामध्ये ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कन्फेडरेशन, ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसीएशन, इंडियन नॅशनल बँक ऑफिसर्स आणि नॅशनल बँक ऑफिसर्स या संघटनांचा समावेश आहे.

झेडपी निवडणुकांवर टांगती तलवार; 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलांडून....
झेडपी निवडणुकांवर टांगती तलवार; 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलांडून.....
कांदा-मका दरघसरणीविरोधात चांदवडमध्ये शेतकऱ्यांचे आमरण उपोषण
कांदा-मका दरघसरणीविरोधात चांदवडमध्ये शेतकऱ्यांचे आमरण उपोषण.
पैश्यातून सत्ता आणि सत्तेतून पैसा ही एकमेव भाजपची भूमिका
पैश्यातून सत्ता आणि सत्तेतून पैसा ही एकमेव भाजपची भूमिका.
सांगलीमध्ये शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी भव्य मोर्चा
सांगलीमध्ये शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी भव्य मोर्चा.
माझा जवळचा मित्र गमावला; अजितदादांच्या आठवणींना उजाळा देताना....
माझा जवळचा मित्र गमावला; अजितदादांच्या आठवणींना उजाळा देताना.....
उद्धव ठाकरेंनी अजितदादांच्या निधनावर व्यक्त केला शोक, म्हणाले...
उद्धव ठाकरेंनी अजितदादांच्या निधनावर व्यक्त केला शोक, म्हणाले....
तर दादा त्यांना झापायचे; एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
तर दादा त्यांना झापायचे; एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?.
अजित पवारांच्या विमान अपघातावर मोठी शंका; आव्हाडांनी ब्लॅक बॉक्सवर...
अजित पवारांच्या विमान अपघातावर मोठी शंका; आव्हाडांनी ब्लॅक बॉक्सवर....
मला कुणी विचारलंच नाही, तर मी का बोलू! जितेंद्र आव्हाड स्पष्टच बोलले
मला कुणी विचारलंच नाही, तर मी का बोलू! जितेंद्र आव्हाड स्पष्टच बोलले.
पहाटेचा शपथविधी, अजितदादा का नाराज व्हायचे? फडणवीसांनी सांगितला किस्सा
पहाटेचा शपथविधी, अजितदादा का नाराज व्हायचे? फडणवीसांनी सांगितला किस्सा.