AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kisan Andolan | शेतकऱ्यांनी केली दमकोंडी! व्यापाराला मोठा फटका, महागाई भडकणार?

Kisan Andolan | देशाची राजधानी दिल्लीची शेतकऱ्यांनी कोंडी केली. पण त्याचा परिणाम देशभर दिसून येत आहे. नोएडा, ग्रेटर नोएडासह इतर परिसरात शेतकरी आंदोलनाचा परिणाम दिसून येत आहे. रस्ते जाम झाल्याने देशभरात माल पोहचविणारे ट्रक अडकले आहेत. व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.

Kisan Andolan | शेतकऱ्यांनी केली दमकोंडी! व्यापाराला मोठा फटका, महागाई भडकणार?
| Updated on: Feb 21, 2024 | 2:22 PM
Share

नवी दिल्ली | 21 February 2024 : शेतकरी आंदोलनाचा परिणाम व्यापारावर पण दिसून येत आहे. शेतकऱ्यांनी दिल्लीसह परिसरात चक्का जाम केला आहे. परिणामी माल वाहतूक ठप्प झाली आहे. विविध भागात माल घेऊन जाणारे ट्रक सध्या दिल्ली परिसरात चक्का जाममध्ये अडकून पडले आहेत. देशातील व्यापाऱ्यांची शिखर संस्था कनफेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सच्या आकड्यानुसार, शेतकरी आंदोलनामुले आतापार्यंत 300 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. सर्वाधिक फटका राजधानी दिल्लीला बसला आहे. तर देशातील इतर शहरांवर पण त्याचा परिणाम दिसून येत आहे.

5 लाख व्यापारी चिंतेत

दिल्लीतून अनेक राज्यात मालाचा पुरवठा करण्यात येतो. पंजाब, हरियाणातून अन्नधान्याचा दिल्ली आणि आजूबाजूच्या राज्यांना पुरवठा होतो. दूधासह इतर भाजीपाला पुरवण्यात येतो. त्या सर्वांवर या आंदोलनाचा परिणाम दिसून येत आहे. या आंदोलनामुळे 5 लाख व्यापारी चिंतेत सापडले आहे. शेतकरी आंदोलनामुळे या व्यापाऱ्यांनी दिल्ली दौर रद्द केला आहे. अंबाला शहरातील कपडा मार्केट ठप्प झाले आहे.

महागाई वाढली

रस्ते बंद झाल्याने व्यापारावर त्याचा सर्वाधिक परिणाम झाला आहे. त्याचा परिणाम लॉजिस्टिकवर पण होत आहे. ट्रक या चक्का जाममध्ये अडकल्याने मालाचा पुरवठा ठप्प झाला आहे. तर नाशवंत वस्तूंचे ट्रक तर कधीचेच मागे फिरले आहेत. पण उत्तर भारतातून दक्षिण आणि पूर्व-पश्चिम भागातील राज्यांना पुरवठा होणाऱ्या वस्तूंवर पण आंदोलनाचा परिणाम दिसून आला आहे. मागणी आणि पुरवठ्याचे गणित व्यस्त झाले आहे. काही वस्तूंच्या किंमती महागल्या आहेत. जर हे आंदोलन लवकर संपले नाही तर देशभरात महागाई भडकण्याची चिन्ह आहेत.

आंदोलन कशासाठी

शेतकरी किमान हमीभाव कायद्यासाठी अडून बसले आहेत. त्यांना किमान हमीभाव हवा आहे. यापूर्वी शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते. त्यावेळी तीन शेतकरी कायदे रद्द करण्यात आले होते. तसेच एमएसपीबाबत योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आले होते. शेतकऱ्यांची हमीभावाची मागणी मान्य केली तर पहिल्याच टप्प्यात सरकारच्या तिजोरीवर मोठा बोजा पडेल. सरकार सध्या 24 पिकांवर एमएसपी निश्चित करते.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.