AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ratan Tata यांनी पोलिसांच्या बाईकच्या टाकीत टाकली साखर.. कारण आहे खास, इतिहासाच्या पानात दडलेली ही स्टोरी तुम्हाला माहिती आहे का?

Ratan Tata Untold Story : रतन टाटा यांना काळाने आपल्यातून हिरावून घेतले. एक आदर्श उद्योजक, शांत, संयमी आणि मृदू व्यक्ती म्हणून ते अधिक लोकप्रिय होते. पण त्यांनी एकदा पोलिसांच्या बाईकच्या पेट्रोल टँकमध्ये साखर टाकली होती. हे वाचून तुम्हाला पण धक्का बसेल. पण त्यांनी का केले असे कृत्य?

Ratan Tata यांनी पोलिसांच्या बाईकच्या टाकीत टाकली साखर.. कारण आहे खास, इतिहासाच्या पानात दडलेली ही स्टोरी तुम्हाला माहिती आहे का?
रतन टाटा
| Updated on: Nov 07, 2024 | 2:13 PM
Share

टाटा समूहाला उभारी देऊन नवीन उंचीवर पोहचवण्याचे काम रतन टाटा यांनी केले. त्यांचा आजही मोठा चाहता वर्ग आहे. काळाने त्यांना आपल्यातून हिरावून घेतले. 9 ऑक्टोबर 2024 रोजी त्यांचे निधन झाले. त्या काळातही त्यांनी चाहत्यांसाठी संदेश दिला होता. एक आदर्श उद्योजक, शांत, संयमी आणि मृदू व्यक्ती म्हणून ते अधिक लोकप्रिय होते. पण त्यांनी एकदा पोलिसांच्या बाईकच्या पेट्रोल टँकमध्ये साखर टाकली होती. हे वाचून तुम्हाला पण धक्का बसेल. पण त्यांनी हे कृत्य केले होते. त्यामागे मोठे कारण होते. ते वाचलं तर तुम्हाला त्यांची भूमिका नक्की पटेल.

का टाकली पोलिसांच्या बाईकमध्ये साखर?

रतन टाटा (Ratan Tata) हे लहानपणी मुंबईत राहत होते. त्यावेळी भारताच्या स्वातंत्र्य चळवळीने जोर धरलेला होता. रतन टाटा या चळवळीचे साक्षीदार होते. त्यांचे घर बॉम्बे हाऊस हे आझाद मैदानाजवळ होते. तिथून त्यांना आझाद मैदानावरील घडामोडी दिसत. मुंबईत स्वातंत्र्यासाठी काय प्रयत्न सुरू आहेत, हे ते पाहात होते. त्यावेळी होत असलेल्या सभा, रॅली या त्यांनी पाहिल्या होत्या. त्यामुळे आपणही स्वातंत्र्य लढ्यात सहभाग नोंदवावा असे त्यांना वाटे. लहान असल्याने त्यांनी या चळवळीत खारीचा वाटा उचलला. त्यांनी ब्रिटिश सैनिकांच्या पेट्रोल बाईकमधील टाकीत साखर टाकली. हा एक प्रकारे ब्रिटिश सत्तेचा निषेधच होता.

भारतीय स्वातंत्र्य चळवळीला मोलाचे सहकार्य

भारतीय स्वातंत्र्य चळवळीला टाटा कुटुंबाने मोठी मदत केली आहे. महात्मा गांधी आणि त्यांचे राजकीय गुरू गोपाळ कृष्ण गोखले यांच्या चळवळीला आर्थिक मदत दिली आहे. टाटा समूहाने या चळवळीला पूरक व्यवस्था टिकण्यासाठी भरीव आर्थिक मदत केली. फिनिक्स सेटलमेंट, टॉल्स्टॉय फार्म आणि इंडियन ओपिनियन वृत्तपत्र टिकवण्यासाठी टाटा कुटुंबाने 1,25,000 रुपये दिले होते. ही त्याकाळी मोठी रक्कम होती.

जेआरडी टाटा यांनी काँग्रेस पक्षाला स्वातंत्र्य चळवळीत मोठी मदत केली. पण भारत स्वतंत्र झाल्यावर काँग्रेसच्या काही धोरणांना त्यांनी कडाडून विरोध सुद्धा केला. त्यांनी स्वतंत्र पक्षाला पाठिंबा देण्यासाठी पंडित जवाहरलाल नेहरू यांना पत्र सुद्धा पाठवले. भारतीय औद्योगिक चळवळीला चालना देण्यासाठी भारतीय बैठक बसवावी लागेल, असा जेआरडी टाटा यांचा आग्रह होता. ते स्वदेशी चळवळीचे खंदे समर्थक होते. टाटा कुटुंबियांनी स्वातंत्र्य चळवळीतच नाही अनेक सामाजिक उपक्रमात भरभरून योगदान दिले आहे. टाटा ट्रस्टच्या माध्यमातून अजूनही अनेक सामाजिक कार्यात सढळ हाताने मदत करण्यात येते.

Follow Us
महानगर गॅसची २०% कपात; मुंबईतील हॉटेल्स आणि उद्योगांवर परिणाम
महानगर गॅसची २०% कपात; मुंबईतील हॉटेल्स आणि उद्योगांवर परिणाम.
माणसं मारण्यात मजा येते म्हणणाऱ्या राष्ट्राशी करार, राऊतांचा मोदी....
माणसं मारण्यात मजा येते म्हणणाऱ्या राष्ट्राशी करार, राऊतांचा मोदी.....
बारामती, राहुरीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? कधी आहे मतदान?
बारामती, राहुरीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? कधी आहे मतदान?.
निवडणूक आयोगाने जाहीर केली बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीची तारीख
निवडणूक आयोगाने जाहीर केली बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीची तारीख.
पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ विधानसभा निवडणुकीसाठी तारीखा जाहीर
पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ विधानसभा निवडणुकीसाठी तारीखा जाहीर.
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद.
पुणे मेट्रोला नागरिकांचा चांगला प्रतिसाद; प्रवासी संख्या अडीच लाखांवर
पुणे मेट्रोला नागरिकांचा चांगला प्रतिसाद; प्रवासी संख्या अडीच लाखांवर.
पुण्यात आणखी एका वैष्णवीने जीवन संपवलं; सासरच्या जाचाला कंटाळून....
पुण्यात आणखी एका वैष्णवीने जीवन संपवलं; सासरच्या जाचाला कंटाळून.....
बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीवर अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया
बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीवर अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया.
पदवी घ्यावी की नको, कारण मानद पदवी मिळाल्यानंतर फडणवीस असं का म्हणाले?
पदवी घ्यावी की नको, कारण मानद पदवी मिळाल्यानंतर फडणवीस असं का म्हणाले?.