AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Manoj Jarange : …तुम्ही त्यावेळी झोपेत होते, मनोज जरांगे यांनी घेतला राज ठाकरे यांचा तिखट समाचार

Manoj Jarange Attack on Raj Thackeray : मनोज जरांगे पाटील यांनी राज ठाकरे यांच्यावर जोरदार पलटवार केला. लातूर येथून राज ठाकरे यांनी आज प्रचाराचा नारळ फोडला. त्यांनी अनेक ज्वलंत विषयाला हात घातला. त्याचवेळी त्यांनी मराठा आरक्षणाची दिशा आणि भविष्यावर मनोज जरांगे यांचे नाव घेत थेट भाष्य केले.

Manoj Jarange : ...तुम्ही त्यावेळी झोपेत होते, मनोज जरांगे यांनी घेतला राज ठाकरे यांचा तिखट समाचार
मनोज जरांगे पाटील, मनसे नेते राज ठाकरे
| Updated on: Nov 06, 2024 | 4:07 PM
Share

लोकसभा निवडणुकीच्या काळात राज ठाकरे आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यात बिनसलं होतं. मराठा आंदोलकांनी राज ठाकरे यांना अडवू नये, कुणालाही महत्त्व देऊ नये असे आवाहन त्यावेळी केले होते. आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लातूर येथून विधानसभा प्रचाराचा नारळ फोडला. त्यावेळी त्यांनी मराठा आरक्षण का मिळाले नाही याती मीमांसा केली. त्याचवेळी मनोज जरांगे यांचे नाव घेऊन मोठं भाष्य सुद्धा केलं. त्यावर जरांगे पाटील यांनी लागलीच पलटवार केला. बीड जिल्ह्यातील गेवराई येथे त्यांनी राज ठाकरे यांच्यावर तिखट प्रतिक्रिया दिली.

त्यावेळी तुम्ही झोपेत होते…

राज ठाकरे यांच्यावर जरांगे पाटील त्यांनी पलटवार केला. आरक्षण कसे देणार माझ्या सामाजाला माहीत आहे, ते तुम्हाला नाही कळणार. आरक्षण काय आणि लढा टिकवणे काय असते तुम्हाला काय माहीत तुम्हाला अस्तित्व कसे संपवायचे हे तुम्हाला माहित आहे, आणि अस्तित्व कसे टिकवायचे हे माहीत आहे, अशी टीका त्यांनी राज ठाकरे यांच्यावर केली. यावेळी त्यांनी त्या भानगडीत पडू नये, त्यांना मानणारा वर्ग आमचा(मराठा )आहे. मी प्रामाणिक सांगतो त्यांनी या भानगडीत पडू नये. मराठा समाजाचा रोष अंगावर घेऊ नये, अशी माझी त्यांना सूचना आहे. आरक्षण कसे मिळत, ते मी दिले आहे, ते तुम्हाला माहीत नाही, तुम्ही त्या वेळी झोपेत होते, असा खरमरीत टोला जरांगे पाटील यांनी राज यांना लगावला.

समाजाला आरक्षण मिळणारच

आता पुढेही आरक्षण मिळणार आणि बिना सत्तेचे आरक्षण मिळते, असे जरांगे यांनी ठणकावले. माझा समाज मला संकटात आणायचा नव्हता. लढायचे की नाही लढायचे हे मी आणि माझा समाज बघेल. माझ्या समाजाला काय आवश्यक आहे ते मी करणार आहे. माझा समाज मला मोठा करायचा कसा ते मला बघायचे. मी समाजाचे अस्तित्व खल्लास होऊ देणार नाही. मला समाजात दुफळी होऊ द्यायची नव्हती, आणि ती होऊ दिली नाही. पक्ष काढून त्यांच्या सारखा, माझ्या समाजाला मला तात्पुरता आनंद द्यायचा नव्हता, तात्पुरते समाधान मला त्यांना द्यायचे नव्हते. असे स्पष्ट करत त्यांनी आमची काळजी करू नये असे जरांगे म्हणाले. आता फडणवीस यांनी त्यांच्याकडे ठेका दिला आहे का? अशी घणाघाती टीका सुद्धा जरांगे पाटील यांनी केली.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.