AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

TCS Krithivasanm : देवा, यालाच म्हणतात नशीब! TCS च्या नवीन सीईओची प्रेरणादायी कहाणी, वाचा के. कीर्तिवासन यांचा प्रवास

TCS Krithivasan : देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टाटा कन्सल्टेंसी सर्व्हिसेसचे (TCS) सीईओ राजेश गोपीनाथन यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या जागी आता के. कीर्तिवासन हे कंपनीची जबाबदारी सांभाळणार आहे.

TCS Krithivasanm : देवा, यालाच म्हणतात नशीब! TCS च्या नवीन सीईओची प्रेरणादायी कहाणी, वाचा के. कीर्तिवासन यांचा प्रवास
| Updated on: Mar 19, 2023 | 10:15 AM
Share

नवी दिल्ली : टाटा समूहाची (TATA Group) आयटी कंपनी टाटा कन्सल्टेंसी सर्व्हिसेस (TCS) देशातील दुसरी सर्वात मोठी मूल्यांकन असलेली कंपनी आहे. आता या कंपनीची कमान नवीन हातात जाणार आहे. टीसीएसचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक राजेश गोपीनाथन (Rajesh Gopinathan) यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर संचालक मंडळाची बैठक झाली. त्यांनी के. कीर्तिवासन (K. Krithivasan) यांना कंपनीचे नवीन सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून निवड केली आहे. कंपनीला, संचालक मंडळाला कीर्तिवासन हे नाव नवीन नाही. ते टीसीएसमध्ये अनेक वर्षांपासून काम करत आहेत. या कंपनीच्या सर्व बारीकसारीक बाबींविषयी त्यांना माहिती आहे. टीसीएसच्या BFSI सेगमेंटमध्ये त्यांचा हातखंड आहे. त्यांनी करिअरची सुरुवातच टीसीएसमधून केली आहे.

गोपीनाथन गेल्या 20 वर्षांहून अधिक काळ टीसीएससोबत आहेत. टीसीएसच्या बोर्डाने गोपीनाथन यांचा राजीनामा स्वीकारला आहे. गोपीनाथन 15 सप्टेंबरपर्यंत त्यांच्या पदावर राहतील. गोपीनाथन यांनी 22 वर्षांच्या प्रदीर्घ प्रवासानंतर टीसीएसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. राजेश हे सर्वाधिक वेतन स्वीकारणाऱ्या सीईओंपैकी एक आहेत. त्यांनी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून 6 वर्षे काम केले. हा प्रवास अत्यंत रोमांचक असल्याचे गोपीनाथन यांनी सांगितले. एन.चंद्रशेखरन यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव अतिशय आनंददायी असल्याचे त्यांनी सांगितले.

के. कृतिवासन 1989 मध्ये टीसीएसमध्ये सहभागी झाले होते. त्यांनी टीसीएसमध्ये करिअरच्या सुरुवातीला डिलिव्हरी, सेल्स आणि इतर अनेक व्यवस्थापकयी जबाबदाऱ्या संभाळल्या. टीसीएसमध्ये त्यांच्या कार्याकाळात त्यांनी अनेक मोठ्या जबाबदाऱ्या पूर्ण केल्या. ते यापूर्वी टीसीएस बँकिंग आणि आर्थिक सेवा, या विभागाचाचे जागतिक प्रमख होते. ग्लोबल टेक्नॉलॉजी सेक्टरमध्ये कीर्तिवासन हे गेल्या 34 वर्षांपासून काम करत आहेत. त्यांनी मद्रास (चेन्नई) विश्वविद्यालयात 34 वर्षे काम केले आहे. मद्रास विश्वविद्यालयातून त्यांनी मॅकेनिकल इंजिनिअरिंगची पदवी मिळवली आहे. आयआयटी कानपूर येथून औद्योगिक आणि व्यवस्थापकीय अभियांत्रिकी या विषयात पदव्युत्तर पदवी संपादित केली आहे.

TCS च्या BFSI सेगमेंटमध्ये त्यांनी कंपनीला मोठी कमाई करुन दिली. त्यांनी टीसीएसमध्ये डिलिव्हरी, कस्टमर रिलेशनशीप मॅनेजमेंट, प्रोग्राम मॅनेजमेंट आणि सेल्स विभागाची जबाबदारी सांभाळली. त्यांचे संपूर्ण करिअर टीसीएसमध्ये गेले आहे. कीर्तिवासन यांचा TCS च्या कमाईत 35-40% योगदान आहे. गोपीनाथन हे 2001 पासून कंपनीसोबत काम करत होते. त्यानंतर त्यांनी राजीनामा दिला. येत्या सप्टेंबरपर्यंत ते टीसीएसमध्ये कार्यरत राहतील.

मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.