AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पिकनिकहून घरी परतत असताना अचानक गाडीचा टायर फुटला, स्त्री रोग तज्ज्ञाचा जागीच मृत्यू

सध्या दिवाळीची सुट्टी असल्याने डॉ. पियुष बरलोटा यांचे कुटुंब आणि त्यांच्या मित्राचे कुटुंब मिळून दोन वाहनातून हैदराबादला सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गेले होते.

पिकनिकहून घरी परतत असताना अचानक गाडीचा टायर फुटला, स्त्री रोग तज्ज्ञाचा जागीच मृत्यू
स्त्री रोग तज्ज्ञाचा अपघाती मृत्यू Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Nov 01, 2022 | 9:32 PM
Share

यवतमाळ : पिकनिक एन्जॉय करुन हैदराबादहून यवतमाळला घरी परतत असताना गाडीचा टायर फुटल्याने झालेल्या भीषण अपघातात स्त्री रोग तज्ज्ञाचा मृत्यू झाला आहे. तर डॉक्टर पतीसह तीन जण जखमी झाले आहेत. डॉ. सुरेखा बरलोटा असे मयत महिला डॉक्टरचे नाव आहे. निर्मल ते हैदराबाद मार्गावरील टोल नाक्यापासून 12 किमी अंतरावर ही दुर्घटना घडली. जखमींना निर्मल येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

हैदराबादला पिकनिकसाठी गेले होते

सध्या दिवाळीची सुट्टी असल्याने डॉ. पियुष बरलोटा यांचे कुटुंब आणि त्यांच्या मित्राचे कुटुंब मिळून दोन वाहनातून हैदराबादला सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गेले होते. पिकनिक करुन यवतमाळकडे परतत असतानाच आज निर्मल हैदराबाद मार्गावर डॉ. बरलोटा यांच्या गाडीचे टायर फुटले आणि भीषण अपघात घडला.

अपघातात डॉ. सुरेखा बरलोटा यांचा जागीच मृत्यू

या अपघातात डॉ. सुरेखा बरलोटा यांचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी उपस्थित लोकांनी तात्काळ धाव घेत अन्य जखमींना गाडीतून बाहेर काढले आणि रुग्णालयात नेले. तर डॉ. पियुष बरलोटा यांची मुलगी आणि अन्य दोन जणींना गंभीर दुखापत झाली आहे. अन्य लोकांना किरकोळ दुखापत झाली.

निर्मल येथील शासकीय रुग्णालयात मृतक डॉ. सुरेखा पियुश बरलोटा यांच्या पार्थीवाचे शवविच्छेदन करण्यात आले. रात्री उशिरा सुरेखा यांचे पार्थिव यवतमाळात पोहोचण्याची शक्यता आहे.

कोल्हापूरमध्ये दोन ट्रकची समोरासमोर धडक

पुणे-बंगलोर महामार्गावर दोन ट्रकची समोरासमोर धडक झाल्याची घटना आज घडली आहे. या अपघातात एक जण ठार तर तीन जण गंभीर जखमी झाले. कोल्हापूर जवळील उचगाव परिसरात हा अपघात झाला. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

Follow Us
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी.
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले.
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने.
WITT 2026 समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले; 'जग संघर्षात, पण..
WITT 2026 समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले; 'जग संघर्षात, पण...
जागतिक उलथापालथीच्या काळात मोदींच्या नेतृत्वात भारताची प्रगती....
जागतिक उलथापालथीच्या काळात मोदींच्या नेतृत्वात भारताची प्रगती.....
राऊत यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल पंतप्रधान मोदींबाबत मोठी भविष्यवाणी
राऊत यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल पंतप्रधान मोदींबाबत मोठी भविष्यवाणी.
शिवनिका ट्रस्ट प्रकरणी SIT स्थापन; ट्रस्टींवरही येणार तपासाचा फेरा
शिवनिका ट्रस्ट प्रकरणी SIT स्थापन; ट्रस्टींवरही येणार तपासाचा फेरा.
इराण-अमेरिका युद्धाचा भारतावर काय परिणाम?मोदींनी लोकसभेत सगळं सांगितलं
इराण-अमेरिका युद्धाचा भारतावर काय परिणाम?मोदींनी लोकसभेत सगळं सांगितलं.
भोंदूबाबा खरातने सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरलं... मोठा कारनामा समोर
भोंदूबाबा खरातने सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरलं... मोठा कारनामा समोर.
आताच सोनं खरेदी करा बरं... गेल्या 40 वर्षात झालं नव्हतं एवढं स्वस्त...
आताच सोनं खरेदी करा बरं... गेल्या 40 वर्षात झालं नव्हतं एवढं स्वस्त....