AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पत्नी दररोज कुणाशी तरी फोनवर बोलायची, पतीला राग अनावर झाला अन्…

पुष्पा ही सतत कुणाशी तरी फोनवर बोलायची. ही बाब कुलवंतला खटकत असल्याने गेल्या दोन महिन्यांपासून त्यांच्यात भांडण होत होते.

पत्नी दररोज कुणाशी तरी फोनवर बोलायची, पतीला राग अनावर झाला अन्...
वीजेचा शॉक लागून मायलेकाचा दुर्दैवी मृत्यूImage Credit source: TV9
| Updated on: Oct 05, 2022 | 6:14 PM
Share

लखनौ : मोबाईलचा अति वापर किती घातक आहे हे अनेक वेळा पाहिलं असेल. पती-पत्नीच्या नात्यातही दुरावा निर्माण करण्यास मोबाईल कारणीभूत ठरत आहे. अशीच एक घटना उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) उघडकीस आली आहे. पत्नी सतत मोबाईलवर बोलत असल्याने (Constantly talking on the mobile phone) रागाच्या भरात पतीने टोकाचे पाऊल उचलले आहे. पती-पत्नीच्या या वादात (Husband-Wife Dispute) मुलं मात्र पोरकी झाली आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. कुलवंत सिंह आणि पुष्पा सिंह अशी पती-पत्नीची नावे आहेत.

काय आहे प्रकरण ?

सिंह कुटुंबीय मूळचे बिहारचे रहिवासी आहेत. कामानिमित्त ते उत्तर प्रदेशातील लखनौ येथे राहत होते. पुष्पा ही सतत कुणाशी तरी फोनवर बोलायची. ही बाब कुलवंतला खटकत असल्याने गेल्या दोन महिन्यांपासून त्यांच्यात भांडण होत होते.

बुधवारी सकाळी कुलवंतचे दोन्ही मुलगे कोचिंग क्लासला गेले होते. दुपारी 12 वाजता जेव्हा मुलं कोचिंग क्लासवरुन घरी आली, तेव्हा समोरील दृश्य पाहून त्यांना धक्का बसला. मुलांना आई-वडिल दोघेही मृतावस्थेत आढळले.

मुलांचा आरडाओरडा ऐकून शेजारी आले

कुलवंत सिंह याने पत्नीची हत्या केल्यानंतर स्वतःही आत्महत्या केली. मृतदेह पाहून मुलांनी आरडाओरडा केल्याने शेजारी गोळा झाले. याबाबत शेजाऱ्यांनी तात्काळ स्थानिक पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले.

घटनास्थळावरुन कोणतीही सुसाईड नोट मिळाली नाही. मुलांनी दिलेल्या माहितीनुसार, आई-वडिलांमध्ये गेल्या दोन महिल्यांपासून वाद सुरु होते. आई फोनवर सतत बोलायची म्हणून आई-वडिलांमध्ये भांडण होत होते, असे मुलांनी सांगितले.

पुष्पा कोणीशी फोनवर वारंवार बोलायची याबाबत पोलीस तपास करत आहेत.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.