Crime | बहिणीला पळवून नेण्याची धमकी, फोनवरुन सतत त्रास; अखेर तरुणाने उचलले मोठे पाऊल, नेमकं काय केलं ?

आपल्या बहिणीला पळवून नेण्याचे सतत मेसेज येत असल्यामुळे तणावात येऊन त्याने गळफास घेत स्वत:ला संपवलं आहे. उत्तर प्रदेसमधील गजनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सैथा या गावातील हा प्रकार आहे.

Crime | बहिणीला पळवून नेण्याची धमकी, फोनवरुन सतत त्रास; अखेर तरुणाने उचलले मोठे पाऊल, नेमकं काय केलं ?
पुण्यात येरवडा कारागृहात पोक्सो गुन्ह्यातील कैद्याची गळफास घेऊन आत्महत्या
Follow us
| Updated on: Jan 28, 2022 | 7:30 AM

मुंबई : हत्या, आत्महत्येसारख्या अनेक घटना देशात रोजच घडतात. मात्र यामध्ये काही घटना ऐकून धक्का बसल्याशिवाय राहत नाही. सध्या उत्तर प्रदेशमधील एका तरुणाने आत्महत्या केली आहे. त्याने आत्महत्या (Suicide) करण्यामागचं कारण हादरवून सोडणारं आहे. आपल्या बहिणीला पळवून नेण्याचे सतत मेसेज येत असल्यामुळे तणावात येऊन त्याने गळफास घेत स्वत:ला संपवलं आहे. उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) गजनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सैथा या गावात हा प्रकार घडला. मृत तरुणाच्या गावातीलच काही तरुण त्याच्या बहिणीला पळवून नेण्याचे मेसेज सतत पाठवत असत. त्यासाठी मृत तरुणाला आरोपींनी एका ग्रुपमध्ये सामील केलं होतं. या प्रकरणात पोलिसांनी (Police) गुन्हा दाखल केला असून आरोपींचा सोध सुरु आहे.

नेमकं काय घडलं ?

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार सैथा येथील आरोपी भुल्लन, बिट्टी आणि धुन्नू मृत कुशल दुबे यास सतत घाणेरडे मेसेज पाठवायचे. त्याच्या छोट्या बहिणीला पळवून नेण्याची ते सतत धमकी द्यायचे. सहा महिन्यांपूर्वी कुशलच्या मोठ्या बहिणीला गावातील एका तरुणाने पळवून नेले होते. मात्र कुशलच्या घरच्यांनी पोलिसांत धाव न घेता मुलीचे लग्न दुसरीकडे लावून दिले. याच कारणामुळे आरोपी भुल्लन, बिट्टी आणि धुन्नू कुशल यास सतत त्रास देत असत. तुझ्या छोट्या बहिणीलादेखील आम्ही पळवून घेऊन जाऊ, अशा प्रकारचे मेसेजेस हे आरोपी मृत तरुणाला पाठवत असत. तसा आरोप मृत कुशल याच्या कुटुंबीयांनी केला आहे.

तीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल, तपास सुरु

याच सततच्या मेसेजेसमुळे तणावाखाली येऊन कुशलने गळफास लावत स्वत: आत्महत्या केली. मागील सहा महिन्यांपासून आरोपी कुशला सतत त्रास देत होते. या प्रकरणी अकबरपूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपअधीक्षक अरुण कुमार सिंह यांनी सविस्तर माहिती दिली आहे. गावात 18-20 वर्षाच्या तरुणाने आत्महत्या केल्याचे समजले होते. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला. तसेच मृतदेहाजवळ एक चिठ्ठी सापडलेली आहे. या चिठ्ठीमध्ये आत्महत्येचं कारण सांगण्यात आलं आहे. मृत तरुणाच्या घरच्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार तीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

इतर बातम्या :

धक्कादायक! तरुणाला जबर मारहाण, तोंडाने उचलायला लावले जमीनीवर पडलेले बिस्कीट, पाच जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात

Video: बुलडाण्यात भीषण अपघात, कारच्या धडकेत मुलगा रस्त्यावरुन उडाला, जगण्याशी झूंज

धक्कादायक, जेवणाच्या सुट्टीत नराधमांनी डाव साधला, विद्यार्थीनीवर बलात्कार करून पळ काढला

Non Stop LIVE Update
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी संपली, उद्या काय घडणार?
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी संपली, उद्या काय घडणार?.
रोहित पवार यांचं सोशल मीडिया अकाऊंट बंद? भाजपवर गंभीर आरोप करत म्हणाले
रोहित पवार यांचं सोशल मीडिया अकाऊंट बंद? भाजपवर गंभीर आरोप करत म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात अपशब्द, नंतर अटक; कोण आहेत दत्ता दळवी?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात अपशब्द, नंतर अटक; कोण आहेत दत्ता दळवी?.
MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, परीक्षा पास झाल्यावर मुलाखती आधी...
MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, परीक्षा पास झाल्यावर मुलाखती आधी....
राणे, त्यांची दोन नेपाळी पोरं खुलेआम शिव्या देतात, कुणाची जळजळीत टीका?
राणे, त्यांची दोन नेपाळी पोरं खुलेआम शिव्या देतात, कुणाची जळजळीत टीका?.
ठाकरेंच्या डोक्यावर परिणाम,उपचारांची गरज; जिव्हारी लागणारी टीका कुणाची
ठाकरेंच्या डोक्यावर परिणाम,उपचारांची गरज; जिव्हारी लागणारी टीका कुणाची.
नालायक लोकांना तो शब्द वापरला पाहिजे, ठाकरे अन राऊतांवर कुणाचा पलटवार?
नालायक लोकांना तो शब्द वापरला पाहिजे, ठाकरे अन राऊतांवर कुणाचा पलटवार?.
छगन भुजबळ पदाला चिकटून बसणारे, गरळ ओकणारे मंत्री, कुणी केली जहरी टीका?
छगन भुजबळ पदाला चिकटून बसणारे, गरळ ओकणारे मंत्री, कुणी केली जहरी टीका?.
नाशकात गारपीट आणि अवकाळीनं सारं काही हिरावलं, बळीराजाला अश्रू अनावर
नाशकात गारपीट आणि अवकाळीनं सारं काही हिरावलं, बळीराजाला अश्रू अनावर.
आज आनंद दिघे असते तर त्यांनी चाबकानं फोडल असतं, राऊतांनी कुणाला फटकारल
आज आनंद दिघे असते तर त्यांनी चाबकानं फोडल असतं, राऊतांनी कुणाला फटकारल.