AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पहाटे 3 वाजताच घात झाला…मंदिराजवळच आला मृत्यू, कोळगाव शिवारात भीषण अपघातात चार ठार; एकाच कुटुंबातील…

अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात घारगाव-कोळगाव रोडवरील माऊली मंदिराजवळ पहाटे भीषण अपघात झाला. ट्रक आणि इको कार यांच्यात झालेल्या धडकेत एकाच कुटुंबातील तिघांसह चार जणांचा जागीच मृत्यू झाला. १३ वर्षीय मुलगा गंभीर जखमी असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

पहाटे 3 वाजताच घात झाला...मंदिराजवळच आला मृत्यू, कोळगाव शिवारात भीषण अपघातात चार ठार; एकाच कुटुंबातील...
भीषण कार अपघात
| Updated on: Feb 24, 2026 | 11:36 AM
Share

अहिल्यानगर येथे एक भीषण अपघात घडला आहे. श्रीगोंदा तालुक्यातील घारगाव – कोळगाव रोडवर असलेल्या माऊली मंदिराजवळ वाहानांची भीषण धडक होऊन मोठ्ठा अपघात झाला. यामध्ये 4 जणांचा मृत्यू झाला, त्यापैकी तिघे हे एकाच कुटुंबातील असल्याचे समजते. ट्रक आणि इको कार समोरासमोर येऊन भीषण धडक बसली. ही धडक एवढी जोरदार होती की त्यामध्ये चौघांचा जागीच मृत्यू झाला. तर एक लहान मुलगा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातग्रस्त दोन्ही वाहानांचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. एकाच कुटुंबाती तिघांनी जीव गमावल्यामुळे कुटुंबावर तर दु:खाचा मोठा डोंगर कोसळला.

एकाच कुुटंबातील तिघे गेले, मुलगा वाचला

मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे तीनच्या सुमारास श्रीगोंदा तालुक्यातील घारगाव – कोळगाव रोडवर असलेल्या माऊली मंदिराजवळ दोन वाहनांची धडक झाली. इकोकार आणि ट्रक एकमेकांवर प्रचंड वेगाने आदळले. या अपघातात कारचालकासह आणखी तिघांचा, एकूण 4 नागरिकांचा जागीच मृत्यू झाला. त्यापैकी तिघे जण हे एकाच कुटुंबातील असल्याची माहिती समोर आली आहे . नितीन कोकाटे (कारचालक), गजानन पायघन, ध्रुपता पायघन, वैभव पायघन अशी मृत व्यक्तींची नावं आहेत.

तर याच कारमध्ये करण पायघन हा 13 वर्षांचा मुलगाही होता. अपघाता त्याचा जीव वाचला मात्र त्याला जबर मार लागला आहे. त्याच्यावर नजीकच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात होताच ट्रक ड्रायव्हर मात्र घटनास्थळावरू लागलीच पळाला, तो फरार झाला. अपघाताची माहिती मिळताच बेलवंडी पोलिसा ठाण्यातील अधिकाऱ्यांवी घटनास्थळी धाव घेतली, गावकऱ्यांच्या मदतीने बचावकार्य सुरू करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, पायघन कुटुंबीय हे मूळचे अकोले जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील मळतूर येथील रहिवासी आहेत. मात्र कामानिमित्त ते श्रीगोंदा येथील चिंभळे गावात रहात होते. मंगळवारी पहाटे ते गवाहून चिंभळे येथे परत येत होते, तेव्हाच तीनच्या सुमारासदौंड येथून नगरच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकची माऊली मंदिराजवळ त्यांच्या कारला धडक बसली आणि अपघात झाला. बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार ट्रक ड्रायव्हरचा कसून शोध घेण्यात येत आहे.

कांद्याचे भाव घसरले; उत्पादन खर्चही निघेना! शेतकरी हवालदिल
कांद्याचे भाव घसरले; उत्पादन खर्चही निघेना! शेतकरी हवालदिल.
छप्पर उडालं, संसार उघड्यावर आले! महिलांच्या डोळ्यांतील अश्रू थांबेना
छप्पर उडालं, संसार उघड्यावर आले! महिलांच्या डोळ्यांतील अश्रू थांबेना.
रांचीहून दिल्लीला जाणाऱ्या एअर अँब्युलन्सचा अपघात! 7 जणांचा मृत्यू
रांचीहून दिल्लीला जाणाऱ्या एअर अँब्युलन्सचा अपघात! 7 जणांचा मृत्यू.
भाजपकडे हिंदू-मुस्लिमशिवाय कोणताही विचार नाही, संजय राऊतांचा घणाघात
भाजपकडे हिंदू-मुस्लिमशिवाय कोणताही विचार नाही, संजय राऊतांचा घणाघात.
दुश्मन न करे दोस्त ने वो...! दादांच्या आठवणीनं जयंत पाटील भावूक
दुश्मन न करे दोस्त ने वो...! दादांच्या आठवणीनं जयंत पाटील भावूक.
काळंबेरं झाल्यास सरकार अडचणीत! रोहित पवारांचा पुन्हा इशारा
काळंबेरं झाल्यास सरकार अडचणीत! रोहित पवारांचा पुन्हा इशारा.
शिवरायांच्या पुतळ्यावरुन वाद चिखला गावात संचारबंदी !
शिवरायांच्या पुतळ्यावरुन वाद चिखला गावात संचारबंदी !.
पवार राज्यसभेवर गेल्यास ठाकरेंचा फायदा, काँग्रेसचं नुकसान?
पवार राज्यसभेवर गेल्यास ठाकरेंचा फायदा, काँग्रेसचं नुकसान?.
काहींनी भन्नाट किस्से सांगितले, काही... दादांच्या आठवणींनी सर्वच भावूक
काहींनी भन्नाट किस्से सांगितले, काही... दादांच्या आठवणींनी सर्वच भावूक.
वादळी पावसामुळे लातूरमधील अनेक गावं अंधारात; पिकांचेही नुकसान
वादळी पावसामुळे लातूरमधील अनेक गावं अंधारात; पिकांचेही नुकसान.