AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पहाटे 3 वाजताच घात झाला…मंदिराजवळच आला मृत्यू, कोळगाव शिवारात भीषण अपघातात चार ठार; एकाच कुटुंबातील…

अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात घारगाव-कोळगाव रोडवरील माऊली मंदिराजवळ पहाटे भीषण अपघात झाला. ट्रक आणि इको कार यांच्यात झालेल्या धडकेत एकाच कुटुंबातील तिघांसह चार जणांचा जागीच मृत्यू झाला. १३ वर्षीय मुलगा गंभीर जखमी असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

पहाटे 3 वाजताच घात झाला...मंदिराजवळच आला मृत्यू, कोळगाव शिवारात भीषण अपघातात चार ठार; एकाच कुटुंबातील...
भीषण कार अपघात
| Updated on: Feb 24, 2026 | 11:36 AM
Share

अहिल्यानगर येथे एक भीषण अपघात घडला आहे. श्रीगोंदा तालुक्यातील घारगाव – कोळगाव रोडवर असलेल्या माऊली मंदिराजवळ वाहानांची भीषण धडक होऊन मोठ्ठा अपघात झाला. यामध्ये 4 जणांचा मृत्यू झाला, त्यापैकी तिघे हे एकाच कुटुंबातील असल्याचे समजते. ट्रक आणि इको कार समोरासमोर येऊन भीषण धडक बसली. ही धडक एवढी जोरदार होती की त्यामध्ये चौघांचा जागीच मृत्यू झाला. तर एक लहान मुलगा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातग्रस्त दोन्ही वाहानांचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. एकाच कुटुंबाती तिघांनी जीव गमावल्यामुळे कुटुंबावर तर दु:खाचा मोठा डोंगर कोसळला.

एकाच कुुटंबातील तिघे गेले, मुलगा वाचला

मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे तीनच्या सुमारास श्रीगोंदा तालुक्यातील घारगाव – कोळगाव रोडवर असलेल्या माऊली मंदिराजवळ दोन वाहनांची धडक झाली. इकोकार आणि ट्रक एकमेकांवर प्रचंड वेगाने आदळले. या अपघातात कारचालकासह आणखी तिघांचा, एकूण 4 नागरिकांचा जागीच मृत्यू झाला. त्यापैकी तिघे जण हे एकाच कुटुंबातील असल्याची माहिती समोर आली आहे . नितीन कोकाटे (कारचालक), गजानन पायघन, ध्रुपता पायघन, वैभव पायघन अशी मृत व्यक्तींची नावं आहेत.

तर याच कारमध्ये करण पायघन हा 13 वर्षांचा मुलगाही होता. अपघाता त्याचा जीव वाचला मात्र त्याला जबर मार लागला आहे. त्याच्यावर नजीकच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात होताच ट्रक ड्रायव्हर मात्र घटनास्थळावरू लागलीच पळाला, तो फरार झाला. अपघाताची माहिती मिळताच बेलवंडी पोलिसा ठाण्यातील अधिकाऱ्यांवी घटनास्थळी धाव घेतली, गावकऱ्यांच्या मदतीने बचावकार्य सुरू करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, पायघन कुटुंबीय हे मूळचे अकोले जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील मळतूर येथील रहिवासी आहेत. मात्र कामानिमित्त ते श्रीगोंदा येथील चिंभळे गावात रहात होते. मंगळवारी पहाटे ते गवाहून चिंभळे येथे परत येत होते, तेव्हाच तीनच्या सुमारासदौंड येथून नगरच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकची माऊली मंदिराजवळ त्यांच्या कारला धडक बसली आणि अपघात झाला. बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार ट्रक ड्रायव्हरचा कसून शोध घेण्यात येत आहे.

Follow Us
ऑपरेशन टायगर चर्चेनंतर, सावंत-ठाकरे यांची मातोश्रीवर महत्त्वपूर्ण बैठक
ऑपरेशन टायगर चर्चेनंतर, सावंत-ठाकरे यांची मातोश्रीवर महत्त्वपूर्ण बैठक.
राज्यातील तीन जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भूकंपाने दहशत
राज्यातील तीन जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भूकंपाने दहशत.
खरात मुस्लिम असता तर त्याची.... बड्या नेत्याच्या वक्तव्याने खळबळ
खरात मुस्लिम असता तर त्याची.... बड्या नेत्याच्या वक्तव्याने खळबळ.
खरात प्रकरणामुळे देशात महाराष्ट्राची चेष्टा झालीये-सुळेंचा तीव्र संताप
खरात प्रकरणामुळे देशात महाराष्ट्राची चेष्टा झालीये-सुळेंचा तीव्र संताप.
अजित पवार यांचा फोन सापडला ब्लॅक बॉक्स का नाही सापडणार?
अजित पवार यांचा फोन सापडला ब्लॅक बॉक्स का नाही सापडणार?.
बारामती पोटनिवडणुकीत 22 अपक्षांमुळे लढत चुरशीची; सुनेत्रा पवार मैदानात
बारामती पोटनिवडणुकीत 22 अपक्षांमुळे लढत चुरशीची; सुनेत्रा पवार मैदानात.
रिश्ते मायने रखते है म्हणत सुप्रिया सुळेंचा सुनेत्रा पवारांना पाठिंबा
रिश्ते मायने रखते है म्हणत सुप्रिया सुळेंचा सुनेत्रा पवारांना पाठिंबा.
करुणा मुंडेंची बारामती पोटनिवडणुकीतून माघार नाहीच, म्हणाल्या, जनतेने..
करुणा मुंडेंची बारामती पोटनिवडणुकीतून माघार नाहीच, म्हणाल्या, जनतेने...
रुपाली चाकणकरांच्या बहिणीला पोलिसांची नोटीस, नेमकं कारण काय?
रुपाली चाकणकरांच्या बहिणीला पोलिसांची नोटीस, नेमकं कारण काय?.
करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या विकासाला गती मिळणार
करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या विकासाला गती मिळणार.