AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अख्ख्या कुटुंबानंच विष प्राशन करून संपवलं आयुष्य, शहरातून हादरवणारी घटना समोर

धक्कादायक घटना समोर आली आहे, एकाच कुटुंबातील चार जणांनी विष प्राशन करून आपलं आयुष्य संपवलं आहे, घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

अख्ख्या कुटुंबानंच विष प्राशन करून संपवलं आयुष्य, शहरातून हादरवणारी घटना समोर
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 26, 2025 | 5:33 PM
Share

मध्य प्रदेशमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, एकाच कुटुंबातील चार जणांनी आत्महत्या केली आहे. या प्रकरणानं खळबळ उडाली आहे. ही घटना सागर जिल्ह्यातल्या टीहर गावात घडली आहे. कुटुंबातील चारही व्यक्तींचा मृत्यू हा विष प्राशन केल्यामुळे झाला आहे. ही घटना खुरई पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या क्षेत्रामध्ये घडली आहे. घटनेबाबत माहिती मिळताच पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी चौघांचेही मृतदेह ताब्यात घेतले असून, हे मृतदेह पोस्टमार्टसाठी पाठवण्यात आले आहेत. पोस्टमार्टम अहवालानंतरच या घटनेबाबत अधिक माहिती मिळू शकेल असं पोलिसांनी म्हटलं आहे.

पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू आहे. मृतांमध्ये एक व्यक्ती, त्याची आई आणि दोन मुलांचा समावेश आहे, ही घटना शुक्रवारी रात्री उशिरा घडल्याचं सांगितलं जातं आहे. हे कुटुंब टीहर गावापासून थोड्या दूर असलेल्या शेतामध्ये वास्तव्याला होतं. मनोहर सिंह लोधी असं या आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार मनोहर सिंह लोधी यांची पत्नी काही दिवसांपूर्वीच आपल्या माहेरी गेली आहे. त्यानंतर ही घटना घडली आहे, मनोहर सिंह लोधी, त्यांची आई फूलरानी लोधी, त्यांची मुलगी शिवानी लोधी वय 18 व मुलगा अनिकेत लोधी वय 16 यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. यातील मनोहर यांचा मुलगा अनिकेत आणि त्यांची आई यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता, तर मनोहर यांचा रुग्णालयात नेत असताना वाटेतच मृत्यू झाला. मुलीला गंभीर स्थितीमध्ये रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं, मात्र उपचारादरम्यान तिचाही मृत्यू झाला.

आत्महत्येचं कारण अस्पष्ट 

मनोहर सिंह लोधी यांच्या भावाने दिलेल्या माहितीनुसार लोधी यांचं कुटुंब हे शेतात वास्तव्याला होता, त्यांची बायको काही दिवसांपूर्वीच आपल्या माहेरी गेली होती, त्यानंतर ही घटना घडली आहे. मात्र त्यांनी आत्महत्या का केली? याच कारण अजूनह स्पष्ट झालेलं नाहीये, घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.