AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लग्नाला दोन महिने झाले तरी पत्नी सासरी येईना, अखेर हताश पतीने उचललं हे टोकाचं पाऊल

लग्न थाटामाटात पार पडले. लग्नानंतरच्या सर्व विधी झाल्या. पण नववधूची माहेरचे लोक पाठवणीच करत नव्हते. अखेर नवरदेव हताश झाला.

लग्नाला दोन महिने झाले तरी पत्नी सासरी येईना, अखेर हताश पतीने उचललं हे टोकाचं पाऊल
लग्नमंडपात वीजेचा शॉक लागून महिलेचा मृत्यू
| Updated on: Jun 14, 2023 | 5:17 PM
Share

आरा : बिहारमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका तरुणाचे दोन महिन्यांपूर्वी लग्न झाले. लग्नानंतर माहेरचे रीतीरिवाज पार पाडण्यासाठी मुलगी वधू माहेरीच राहत होती. लग्नाला दोन महिने झाले तरी सासरवाडीतले लोक मुलीची पाठवणी करत नव्हते. अखेर तरुण हताश झाला आणि त्याने आपले जीवन संपवले. कृष्ण कुमार असे मयत तरुणाचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच पुढील कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.

लग्नानंतरचे रीतीरिवाज पार पाडण्यासाठी पत्नी राहत होती

कृष्ण कुमारचा 14 एप्रिल रोजी एकवारी गावातील रीमा कुमारीसोबत विवाह झाला होता. विवाहानंतर माहेरचे काही रीतीरिवाज पार पाडण्यासाठी मुलगी काही दिवस माहेरी राहिल अशी बोलणीच लग्नाआधी झाली होती. त्यानुसार सासरच्यांनी वधूला तिच्या माहेरी ठेवले. यानंतर मयत तरुण मुंबईत भाजीचा धंदा करत असल्याने सर्वजण मुंबईला परतले. मात्र रीतीरिवाजाच्या नावाखाली दोन महिने झाले तरी नवरी सासरी परतली नाही. यामुळे कृष्ण कुमार गावी गेला.

पत्नी घरी येत नसल्याने नैराश्येतून टोकाचे पाऊल

कृष्ण कुमार 4 जूनला पत्नीला आणण्यासाठी गावी गेला. त्यानंतर त्याने वडिलांना आपण सासरवाडीत पत्नीला आणण्यासाठी जात असल्याचे सांगितले. त्यानंतर थेट त्याच्या मृत्यूचीच बातमी आली. कृष्ण कुमारने आत्महत्या करण्यापूर्वी बहिणीला फोन करुन माहिती दिली. बहिणीने त्याच्या सासरवाडीत याबाबत माहिती दिली. सासरवाडीतल्या लोकांनी तात्काळ कृष्ण कुमारच्या घरी धाव घेतली, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.

पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेश शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला असून, पोलील पुढील तपास करत आहेत. पत्नी सासरी नांदायला येत नव्हती. यामुळे तणावातून त्याने हे पाऊल उचलल्याचे कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले.

Follow Us
अशोक खरातच्या मुलीच्या लग्न पत्रिकेत सत्ताधारी- विरोधकांची नावं
अशोक खरातच्या मुलीच्या लग्न पत्रिकेत सत्ताधारी- विरोधकांची नावं.
मोठं संकट? वैजापूरमध्ये संध्याकाळी अचानक विमानाच्या घिरट्या...
मोठं संकट? वैजापूरमध्ये संध्याकाळी अचानक विमानाच्या घिरट्या....
अशोक खरात प्रकरणात नवी नावं समोर; संजय राऊतांची प्रतिक्रिया चर्चेत
अशोक खरात प्रकरणात नवी नावं समोर; संजय राऊतांची प्रतिक्रिया चर्चेत.
इराण-अमेरिका तणावावरून राऊतांचा ट्रम्पवर निशाणा; भाजपवरही जोरदार टीका
इराण-अमेरिका तणावावरून राऊतांचा ट्रम्पवर निशाणा; भाजपवरही जोरदार टीका.
भोंदूबाबा खरातला आमदार करायचं होतं? तृप्ती देसाईंचा खळबळजनक दावा काय?
भोंदूबाबा खरातला आमदार करायचं होतं? तृप्ती देसाईंचा खळबळजनक दावा काय?.
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!.
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!.
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं.
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच.