AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मावस सासऱ्यानेच सुनेचं कुंकू पुसलं…पोलीस तपासात समोर आली धक्कादायक बाब

मयत आणि संशयित आरोपी यांच्यात चांगले संबंध होते, दरम्यान संशयित आरोपी कोरडे हे शेतमाल विक्रीसाठी नाशिकला आले होते.

मावस सासऱ्यानेच सुनेचं कुंकू पुसलं...पोलीस तपासात समोर आली धक्कादायक बाब
सहा दूध उत्पादकांना अटकImage Credit source: Google
| Updated on: Nov 02, 2022 | 10:13 PM
Share

नाशिक : नाशिकच्या पंचवटीतील मेरी वसाहतीत झालेल्या एका हत्येने खळबळ उडाली आहे. दिवाळीला माहेरी गेलेल्या पत्नीला पती बेडरूममध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळून आले होते. लागलीच पत्नीने याबाबत पती संतू वायकुंडे यांना खाजगी दवाखान्यात नेले होते. मात्र त्यांनी जिल्हा रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला दिला होता. त्यात संतू वायकंडे यांचा मृत्यू झाल्याचे सांगत त्यांचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पाठविण्यात आला होता. त्यात संतू वायकंडे यांचा कशाच्या तरी सहाय्याने गळा आवळून हत्या केल्याची बाब समोर आली होती. मयत संतू वायकंडे यांच्या पत्नी लता वायकंडे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पंचवटी पोलीस ठाण्यात रात्री उशिरा खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा पंचवटी पोलीसांनी अवघ्या बारा तासात गुन्ह्याची उकल केली आहे. मयत संतू वायकंडे यांचा खून त्यांच्याच मावस काकाने केल्याचे समोर आले आहे. संशयित आरोपीचे नाव निवृत्ती हरी कोरडे असे असून त्याला पोलीसांनी राहत्या घरातून अटक केली आहे.

मयत असलेले संतू वायकंडे यांना संशयित आरोपी निवृत्ती हरी कोरडे यांनी काही महिन्यांपूर्वी उसने पैसे दिले होते.

मयत आणि संशयित आरोपी यांच्यात चांगले संबंध होते, दरम्यान संशयित आरोपी कोरडे हे शेतमाल विक्रीसाठी नाशिकला आले होते.

रात्री उशीर झाल्याने त्यांनी मेरी परिसरात राहणाऱ्या संतू वायकंडे यांच्या घरी जाण्याचा निर्णय घेत मुक्काम केला होता.

याच दरम्यान मयत संतू आणि संशयित आरोपी निवृत्ती यांनी दारू पार्टी करत जेवण केले, याचवेळी निवृत्ती यांनी उसने पैसे मागितल्याने त्यांच्यात वाद निर्माण झाला होता.

त्यातच निवृत्ती कोरडे यांनी दारूच्या नशेत पहाटेच्या वेळी संतू यांचा मोबाईल चार्जरच्या वायरने झोपेत गळा हत्या केल्याची कबुली आरोपीने पोलिसांना दिली आहे.

एकूणच क्षुल्लक कारणावरून ही हत्या झाल्याने पंचवटी परिसरात खळबळ उडाली असून या खुनाची घटनेची जोरदार चर्चा होऊ लागली आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.