AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माझा मर्डर झालाय; मेघालयमध्ये हत्या झालेल्या इंदौरच्या राजाच्या भावाला पडले भयानक स्वप्न, घराबाहेरील बॅनर पाहून तर बसेल धक्का

इंदौर येथील ट्रान्सपोर्ट व्यावसायिक राजा रघुवंशी यांची मेघालयमध्ये हत्या झाली आहे. तर त्यांची पत्नी बेपत्ता आहे. आता या प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे.

माझा मर्डर झालाय; मेघालयमध्ये हत्या झालेल्या इंदौरच्या राजाच्या भावाला पडले भयानक स्वप्न, घराबाहेरील बॅनर पाहून तर बसेल धक्का
Raja SuryavanshiImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Jun 08, 2025 | 6:10 PM
Share

मध्य प्रदेशमधील इंदौर येथील ट्रान्सपोर्ट व्यावसायिक राजा रघुवंशी यांच्या मेघालयातील हत्येचा आणि त्यांच्या पत्नी सोनमच्या 14 दिवसांपासून बेपत्ता असण्याच्या प्रकरणात दररोज नवनवे खुलासे होत आहेत. राजा यांचा मृतदेह मेघालयातील सोहरा (चेरापूंजी) येथील एका खोल दरीत सापडला, परंतु सोनमचा कोणताही सुगावा लागलेला नाही. कुटुंबीयांचा दावा आहे की, राजा त्यांचा भाऊ विपिन याच्या स्वप्नात आला आणि आपल्या हत्येची माहिती देऊन सीबीआय चौकशीची मागणी करत होता.

कुटुंबाची मागणी आणि पोलिसांचा तपास

इंदौरमधील पीडित कुटुंबाने घराबाहेर एक बॅनर लावला आहे, ज्यावर लिहिले आहे, “राजाची आत्मा सांगत आहे- मी मेलो नाही, मला मारले गेले आहे. सीबीआय चौकशी व्हावी.” विपिनने सांगितले, “राजा माझ्या स्वप्नात आला आणि म्हणाला की त्याचा खून झाला आहे. आम्हाला सीबीआय चौकशी हवी आहे.” दरम्यान, शिलाँग पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले आहे. परंतु बेपत्ता सोनम आणि या खुनाच्या रहस्यामागील सत्य अद्याप समोर आलेले नाही.

वाचा: बहिणीनेच केलं भावाच्या मृत्यूचं भांडवल, एकीकडे न्याय मागते तर दुसरीकडे मसाज आणि ब्रँडसोबत कोलॅबरेशन

नेमकं काय घडलं?

इंदौरच्या सहकार नगर येथील रहिवासी राजा रघुवंशी (वय 29) आणि सोनम यांचा विवाह 11 मे 2025 रोजी थाटामाटात झाला होता. दोन्ही कुटुंबांच्या संमतीने झालेल्या या विवाहानंतर, 20 मे रोजी हे नवविवाहित जोडपे हनीमूनसाठी इंदौरहून गुवाहाटीला रवाना झाले. इंदौरहून बेंगलोरमार्गे ते गुवाहाटीला पोहोचले, जिथे त्यांनी कामाख्या मंदिरात दर्शन घेतले. 22 मे रोजी ते गुवाहाटीहून शिलाँगला पोहोचले. परंतु शिलाँगला पोहोचल्यानंतर 48 तासांच्या आत, 23 मे रोजी दोघेही रहस्यमयरित्या बेपत्ता झाले.

शेवटचे बोलणे काय झाले

23 मे रोजी दुपारी 1:43 वाजता सोनमने तिच्या सासू उमा रघुवंशी यांच्याशी शेवटचे फोनवर बोलणे केले. या रेकॉर्ड केलेल्या कॉलमध्ये सोनमने सांगितले की, ते जंगलात ट्रेकिंग करत आहेत, जिथे एक धबधबा आहे. ती म्हणाली, “आम्ही खूप उंच डोंगरावर चढून आलो आहोत, मी खूप थकले आहे. मी राजाला नको म्हटलं होतं, पण तो ऐकला नाही. फक्त कॉफी प्यायले आहे.” दुपारी 2 वाजल्यानंतर सोनम आणि राजा दोघांचेही फोन बंद झाले. कुटुंबाला वाटले की नेटवर्कचा अडथळा असेल, परंतु 24 आणि 25 मे पर्यंत कोणताही संपर्क न झाल्याने चिंता वाढली.

एका दुसऱ्या ऑडिओमध्ये राजा आपल्या आईशी बोलताना म्हणतो, “आम्ही वर पोहोचलो आहोत, फळं खात आहोत. इथे इंटरनेट नाही.” हे त्यांचे शेवटचे बोलणे झाले होते. 26 मे रोजी राजा आणि सोनमचे भाऊ विपिन व गोविंद शिलाँगला पोहोचले. ईस्ट सोहरा पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास केल्यावर राजाचा मृतदेह खोल दरीत सापडला. तर सोनम गेल्या 14 दिवसांपासून बेपत्ता आहे.

Follow Us
नाशिक धर्मांतर प्रकरणात मोठी घडामोड! धर्मांतर, हिजाब ट्रेनिंग.....
नाशिक धर्मांतर प्रकरणात मोठी घडामोड! धर्मांतर, हिजाब ट्रेनिंग......
अखेर ठरलं! हा नेता होणार पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री
अखेर ठरलं! हा नेता होणार पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री.
तामिळनाडूत राजकीय खळबळ! थलपती विजय सरकार स्थापनेच्या उंबरठ्यावर?
तामिळनाडूत राजकीय खळबळ! थलपती विजय सरकार स्थापनेच्या उंबरठ्यावर?.
मी पालकमंत्र्यांना काडीमात्र भाव देत नाही, पालकमंत्री पोलीस आहेत का?
मी पालकमंत्र्यांना काडीमात्र भाव देत नाही, पालकमंत्री पोलीस आहेत का?.
TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान गरोदर?
TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान गरोदर?.
निदा खान प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट... एमआयएमचा नगरसेवक सहआरोपी
निदा खान प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट... एमआयएमचा नगरसेवक सहआरोपी.
नाशिक TCS प्रकरणातील मास्टरमाईंडला बेड्या; 42 दिवस पोलिसांना गुंगारा..
नाशिक TCS प्रकरणातील मास्टरमाईंडला बेड्या; 42 दिवस पोलिसांना गुंगारा...
जय पवारांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट....
जय पवारांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट.....
बदलापूरनंतर गोवंडीत संतापजनक घटना; शाळेतील शिपायाकडून 6 वर्षीय....
बदलापूरनंतर गोवंडीत संतापजनक घटना; शाळेतील शिपायाकडून 6 वर्षीय.....
दहावीच्या निकालात कोकण विभाग पुन्हा अव्वल; राज्याचा निकाल 92.09 टक्के
दहावीच्या निकालात कोकण विभाग पुन्हा अव्वल; राज्याचा निकाल 92.09 टक्के.