AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मदरशाच्या नावाखाली बिहारच्या मुलांची महाराष्ट्रात तस्करी, कोण आहे या प्रकरणामध्ये ? पोलिसांच्या हाती काय लागलं?

मनमाड रेल्वे स्थानक आणि भुसावळ रेल्वे स्थानकातून बालकांची सुटका केल्यानंतर राज्यात एकच खळबळ माजली होती. याप्रकरणी आता भुसावळ पोलीस पुढील तपास करत आहेत.

मदरशाच्या नावाखाली बिहारच्या मुलांची महाराष्ट्रात तस्करी, कोण आहे या प्रकरणामध्ये ? पोलिसांच्या हाती काय लागलं?
भुसावळ रेल्वे पोलीस बिहारमधील पालकांची भेट घेणार
| Updated on: Jun 02, 2023 | 10:55 AM
Share

जळगाव : मुलांच्या तस्करीच्या खळबळजनक घटनेप्रकरणी आज भुसावळ रेल्वे पोलीस बिहारमधील पूर्णिया जिल्ह्यात पालकांच्या भेटीला जाणार आहेत. मानवी तस्करीच्या संशयावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, लोहमार्ग पोलीस या दिशेने तपास करण्यासाठी बिहारला जाणार आहेत. दानापूर पुणे एक्स्प्रेसमधून भुसावळ येथे 29 तसंच मनमाड रेल्वे स्टेशनवर 30 अल्पवयीन बालकांची सुटका पोलिसांकडून करण्यात आली होती. पोलिसांनी या मुलांची चौकशी केली असता, आम्हाला मदरशात नेत असल्याची माहिती दिली आहे. याप्रकरणी भुसावळ येथे 1 तर मनमाड येथून 4 मौलवींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाची बाल हक्क आयोगाने देखील दखल घेतली आहे.

मदरसाच्या नावाखाली तस्करी केली जात असल्याचा संशय

ऑपरेशन आहट अंतर्गत रेल्वे सुरक्षा बल आणि लोहमार्ग पोलीस यांनी संयुक्तपणे केलेल्या कारवाईत मनमाड रेल्वे स्थानकात 30 मे रोजी प्रवासी गाडीतून 8 ते 15 वयोगटातील 30 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. त्यांच्या 4 संशयित व्यक्तींना अटक करत त्यांच्याविरोधात मानवी तस्करीअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरु आहे. याच तपासाचा भाग म्हणून भुसावळ रेल्वे पोलीस बिहारला जाऊन मुलांच्या पालकांची भेट घेणार आहेत.

गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी केली होती कारवाई

गाडी नंबर 01040 दानापूर-पुणे एक्सप्रेसमध्ये मदरशाच्या नावाखाली पूर्णिया जिल्ह्यातून सांगलीत त्यांची तस्करी होत असल्याच्या माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे भुसावळ रेल्वे स्थानकातून गाडी सुटल्यानंतर मनमाड स्थानकापर्यंत कसून तपासणी केली असता गाडीतील वेगवेगळ्या बोगीतून एका तस्करासह 8 ते 15 वयोगटातील 30 मुलांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले.

वैद्यकीय तपासणीनंतर या मुलांना चाइल्ड हेल्प डेस्कच्या एनजीओमार्फत नाशिक बालसुधार गृहात रवानगी करण्यात आली. तर भुसावळ रेल्वे स्थानकातूनही अशाच पद्धतीने 29 बालकांना ताब्यात घेण्यात आले. एकूण 59 मुलांना ताब्यात घेण्यात आले असून, मनमाड आणि भुसावळ येथे भादंवी 577 / 23 अन्वये 370 तस्करांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.

मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...
काँग्रेससोबत वंचित आल्यानं वर्षा गायकवाड नाराज? युतीवर केलं मोठं विधान
काँग्रेससोबत वंचित आल्यानं वर्षा गायकवाड नाराज? युतीवर केलं मोठं विधान.