AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Murder Case : लष्करातील जवान हत्येच्या आरोपातून 27 वर्षांनी निर्दोष, मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल

आरोपी जवानाच्या पत्नीचा मृत्यू 'हत्या' होता असे मानणे कठीण आहे. सरकारी पक्षाचा यासंदर्भातील दावा स्वीकारला जाऊ शकत नाही, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने निकाल देताना नोंदवले आणि जवानाला हत्येच्या आरोपातून निर्दोष सोडले.

Mumbai Murder Case : लष्करातील जवान हत्येच्या आरोपातून 27 वर्षांनी निर्दोष, मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल
'स्किन टू स्किन टच'चा निकाल देणाऱ्या न्यायमूर्तींचा राजीनामा मंजूर
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Updated on: Feb 18, 2022 | 10:14 PM
Share

मुंबई : लष्करामध्ये कार्यरत असताना दारुच्या नशेत पत्नीची हत्या करणार्‍या जवाना (Soldier)ला मुंबई उच्च न्यायालया (Mumbai High Court)ने 27 वर्षांनी निर्दोष ठरवले आहे. हत्या झाल्याचा दावा करण्यात आलेल्या महिलेच्या शरीरावर तिला पतीकडून मारहाण झाल्याच्या कुठल्याही खुणा नाहीत ही वस्तुस्थिती विचारात घेत उच्च न्यायालयाने हा निकाल दिला. आरोपी लष्करी जवानाने सत्र न्यायालयाच्या आदेशाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली होती. उच्च न्यायालयाने त्याच्या अपिलाची गंभीर दखल घेतली आणि त्याला दोषमुक्त ठरवत मोठा दिलासा दिला. न्यायमूर्ती प्रसन्न वराळे व न्यायमूर्ती एन. आर. बोरकर यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला आहे. (Army soldier acquitted of murder charge, Mumbai High Court verdict)

सत्र न्यायालयाने सुनावली होती जन्मठेपेची शिक्षा

या प्रकरणातील आरोपी लष्करी जवानाला सत्र न्यायालयाने 1998 मध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. पत्नीची गळा आवळून हत्या केल्याच्या आरोपावरून सत्र न्यायालयाने जवानाला दोषी ठरवले होते. घटना घडली त्यावेळी आरोपी जवान पाटणा येथील दानापूर येथे भारतीय लष्करात तैनात होता. हत्येच्या आरोपासह पत्नीचा छळ केल्याप्रकरणीही सत्र न्यायालयाने जवानाला दोषी ठरवून एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. त्या आदेशाला लष्करी जवानाने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावर द्विसदस्यीय खंडपीठाने सुनावणी केली.

महिलेची हत्या झाल्याचा दावा स्वीकारता येणार नाही : उच्च न्यायालय

आरोपी जवानाच्या पत्नीचा मृत्यू ‘हत्या’ होता असे मानणे कठीण आहे. सरकारी पक्षाचा यासंदर्भातील दावा स्वीकारला जाऊ शकत नाही, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने निकाल देताना नोंदवले आणि जवानाला हत्येच्या आरोपातून निर्दोष सोडले. महिलेच्या शरीरावर तिला मारहाण झाल्याच्या कुठेही खुणा नसल्याचे बचाव पक्षाने न्यायालयाला सांगितले, तर आरोपीने दारुच्या नशेत पत्नीचा गळा आवळल्याचा दावा सरकारी पक्षाने केला होता. उभय पक्षांचे युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर उच्च न्यायालयाने निकाल दिला आहे.

जुलै 1995 मध्ये घडली होती घटना

जुलै 1995 मध्ये आरोपी जवानाने दारुच्या नशेत त्याची पत्नी मोनिका हिचा गळा आवळून खून केल्याचा आरोप सरकारी पक्षाने केला होता. मृत महिलेचे कुटुंबीय रुग्णालयात गेले तेव्हा त्यांना महिलेच्या नाका-तोंडातून फेस येत असल्याचे आढळून आले होते. या प्रकरणी जवानाविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुढे 1998 मध्ये जवानाला सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. (Army soldier acquitted of murder charge, Mumbai High Court verdict)

इतर बातम्या

Hijab : हिजाब परिधान करणे इस्लामची धार्मिक प्रथा नाही; कर्नाटक सरकारने हायकोर्टात मांडली ही बाजू

Kalyan : धावत्या एक्सप्रेसमध्ये मुलीवर लैगिंक अत्याचार करणाऱ्या नराधमाला ‘तिने’ 12 तास पकडून ठेवले

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या