AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Crime | मुंबई पोलिसांची सर्वात मोठी कारवाई, तब्बल 17 बांगलादेशींना अटक

देशात घुसखोरी ही एक मोठी समस्या आहे. अनेकजण बांगलादेशातून बेकायदेशीरपणे भारतात येतात आणि काही गैरकृत्यदेखील करतात. मुंबई पोलिसांनी अशाच काही बांगलादेशींच्या विरोधात मोठी कारवाई केलीय. मुंबई पोलिसांनी तब्बल 17 बांगलादेशींना अटक केली आहे.

Mumbai Crime | मुंबई पोलिसांची सर्वात मोठी कारवाई, तब्बल 17 बांगलादेशींना अटक
| Updated on: Oct 20, 2023 | 6:20 PM
Share

गोविंद ठाकुर, Tv9 मराठी, मुंबई | 20 ऑक्टोबर 2023 : मुंबईच्या बोरीवली पोलिसांनी आज मोठी कारवाई केली आहे. बोरीवली पोलिसांवी तब्बल 17 बांगलादेशींना अटक केली आहे. हे सर्व बांगलादेशी मुंबई आणि मुंबईच्या आसपासच्या परिसरात बेकायदेशीरपणे राहत होते. या सर्वांचा इतर देशांशी संबंध असल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिसांनी सध्या या सर्वांकडून बनावट पासपोर्ट, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि जन्म प्रमाणपत्र जप्त केली आहेत. हे सर्व आरोपी बांगलादेशातून बेकायदेशीरपणे महाराष्ट्रात आले होते. हे सर्व बांगलादेशी भारताची बनावट कागदपत्रे बनवून परदेशात जाण्याचा कट रचत होते.

मुंबई पोलीस झोन 11 चे डीसीपी अजय कुमार बन्सल यांनी या कारवाईबाबत माहिती दिली. “ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे. बोरिवली पोलिसांनी प्रथमच 17 बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे”, असं अजय कुमार बन्सल यांनी सांगितलं.

पोलिसांनी नेमकी कारवाई कशी केली?

काही बांगलादेशी बोरिवलीत फिरत असल्याची माहिती बोरिवली पोलिसांच्या एटीसी अधिकाऱ्यांना मिळाली होती. माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता नालासोपारा आणि विरार परिसरात काही बांगलादेशी लोक असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी नालासोपारा आणि विरारमधून काही बांगलादेशींनाही अटक केली. पोलिसांनी आतापर्यंत एकूण 17 बांगलादेशी नागरिकांना अटक केलीय.

अटकेतील एक जण एजंट?

या बांगलादेशी नागरिकांकडे बनावट आधार कार्ड, पासपोर्ट, पॅन कार्ड, जन्म प्रमाणपत्र आणि इतर अनेक कागदपत्रे असल्याचे पोलिसांना आढळून आलं आहे. पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आलीय. अटकेतील 17 जणांपैकी एक जण हा आरोपी आहे, जो अनेक दिवसांपासून भारतात राहतो आणि तो एजंट म्हणून काम करतो. त्यानेच सर्वांना बोलावलं होतं.

अटकेतील सर्व 17 बांगलादेशी नागरीक हे मुंबईहून कुवेतला जात होते. यापैकी सुमन मोमीन सरदार (वय 31 वर्षे), उमर फारुख मुल्ला (वय 27 वर्ष), सलमान अयुब खान (वय 34 वर्ष) हे तिघेही बोरिवलीला व्हिसा घेण्यासाठी आले होते. याप्रकरणी बोरिवली पोलीस सध्या मुंबई आणि परिसरात किती बांगलादेशी राहतात, बनावट कागदपत्रे कोठे बनवली, या सर्व बाबींचा तपास करत आहेत.

Follow Us
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर....
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर.....
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह.
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण.
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?.
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.