AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Crime | मुंबई पोलिसांची सर्वात मोठी कारवाई, तब्बल 17 बांगलादेशींना अटक

देशात घुसखोरी ही एक मोठी समस्या आहे. अनेकजण बांगलादेशातून बेकायदेशीरपणे भारतात येतात आणि काही गैरकृत्यदेखील करतात. मुंबई पोलिसांनी अशाच काही बांगलादेशींच्या विरोधात मोठी कारवाई केलीय. मुंबई पोलिसांनी तब्बल 17 बांगलादेशींना अटक केली आहे.

Mumbai Crime | मुंबई पोलिसांची सर्वात मोठी कारवाई, तब्बल 17 बांगलादेशींना अटक
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Oct 20, 2023 | 6:20 PM
Share

गोविंद ठाकुर, Tv9 मराठी, मुंबई | 20 ऑक्टोबर 2023 : मुंबईच्या बोरीवली पोलिसांनी आज मोठी कारवाई केली आहे. बोरीवली पोलिसांवी तब्बल 17 बांगलादेशींना अटक केली आहे. हे सर्व बांगलादेशी मुंबई आणि मुंबईच्या आसपासच्या परिसरात बेकायदेशीरपणे राहत होते. या सर्वांचा इतर देशांशी संबंध असल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिसांनी सध्या या सर्वांकडून बनावट पासपोर्ट, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि जन्म प्रमाणपत्र जप्त केली आहेत. हे सर्व आरोपी बांगलादेशातून बेकायदेशीरपणे महाराष्ट्रात आले होते. हे सर्व बांगलादेशी भारताची बनावट कागदपत्रे बनवून परदेशात जाण्याचा कट रचत होते.

मुंबई पोलीस झोन 11 चे डीसीपी अजय कुमार बन्सल यांनी या कारवाईबाबत माहिती दिली. “ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे. बोरिवली पोलिसांनी प्रथमच 17 बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे”, असं अजय कुमार बन्सल यांनी सांगितलं.

पोलिसांनी नेमकी कारवाई कशी केली?

काही बांगलादेशी बोरिवलीत फिरत असल्याची माहिती बोरिवली पोलिसांच्या एटीसी अधिकाऱ्यांना मिळाली होती. माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता नालासोपारा आणि विरार परिसरात काही बांगलादेशी लोक असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी नालासोपारा आणि विरारमधून काही बांगलादेशींनाही अटक केली. पोलिसांनी आतापर्यंत एकूण 17 बांगलादेशी नागरिकांना अटक केलीय.

अटकेतील एक जण एजंट?

या बांगलादेशी नागरिकांकडे बनावट आधार कार्ड, पासपोर्ट, पॅन कार्ड, जन्म प्रमाणपत्र आणि इतर अनेक कागदपत्रे असल्याचे पोलिसांना आढळून आलं आहे. पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आलीय. अटकेतील 17 जणांपैकी एक जण हा आरोपी आहे, जो अनेक दिवसांपासून भारतात राहतो आणि तो एजंट म्हणून काम करतो. त्यानेच सर्वांना बोलावलं होतं.

अटकेतील सर्व 17 बांगलादेशी नागरीक हे मुंबईहून कुवेतला जात होते. यापैकी सुमन मोमीन सरदार (वय 31 वर्षे), उमर फारुख मुल्ला (वय 27 वर्ष), सलमान अयुब खान (वय 34 वर्ष) हे तिघेही बोरिवलीला व्हिसा घेण्यासाठी आले होते. याप्रकरणी बोरिवली पोलीस सध्या मुंबई आणि परिसरात किती बांगलादेशी राहतात, बनावट कागदपत्रे कोठे बनवली, या सर्व बाबींचा तपास करत आहेत.

Follow Us
सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा सोहळा
Sindhudurg Vatpurnima Celebration | ऐकावं ते नवलच! सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा अनोखा सोहळा
नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त
Uddhav Thackeray | नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त; उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर घणाघात
ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा समाचार
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा घेतला समाचार
एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार
Chhatrapati Sambhajinagar | एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार; आरोपी 12 तासांत गजाआड
TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
मोठी बातमी! TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी
मोठी बातमी! अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी; कोर्टाचा मोठा निर्णय
फडणवीसांच्या PM शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा
Uddhav Thackeray | फडणवीसांच्या PM पदाच्या शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा; मराठी माणूस पंतप्रधान होत असेल तर....
नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की...
Pune Nasrapur Case | नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की जन्मठेप?; निकाल थोड्याच वेळात...
छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या..
Rohit Pawar | छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारला इशारा
सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच
Sindhudurg | सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच, शेतकरी चिंतेत!