AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : नाशिक दुर्घटनेसारखी पुनरावृत्ती अगदी थोडक्यात कल्याणमध्ये टळली! कशी? वाचा

बसमधील गॅस गळतीमुळे सीएनजी सिलिंडर फुटण्याची भीती होती, पण इतक्यात...

Video : नाशिक दुर्घटनेसारखी पुनरावृत्ती अगदी थोडक्यात कल्याणमध्ये टळली! कशी? वाचा
थोडक्यात अनर्थ टळला..Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Oct 24, 2022 | 2:55 PM
Share

कल्याण : कल्याणमध्ये गुरुदेव हॉटेलसमोर (Gurudev Hotel) बसमध्ये गॅसगळती (Kalyan News) झाल्याची घटना उघडकीस आली आहे. भर रस्त्यामध्ये चालत्या बसमध्ये अचानक एक आवाज झाला. त्यानंतर चालकाला संशय आल्याने त्याने बस एका बाजूला थांबवली. यावेळी बसमधून गॅस गळती (Bus Gas Leak in Kalyan) होत असल्याचं लक्षात आल्यानं चालकाने प्रसंगावधान राखलं. बसमधील प्रवाशांना लगेचच खाली उतरवून बस रिकामी केली. त्यामुळे थोडक्यात मोठा अनर्थ टळला.

यानंतर अग्निशमन दलाला याबाबत कळवण्यात आली. अग्निशमन दलाकडून या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली. त्यांनी तातडीने बसच्या दिशेने धाव घेतली आणि बसमधील गॅस सिलिंडरवर पाणी फवारुन परिस्थिती आटोक्यात आणली.

यावेळी सगळ्यांच्याच काळजाचा ठोका चुकला होता. थोडक्यात मोठा अनर्थ टळल्यानं प्रवाशांसह सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. चालकाने वेळीच प्रसंगावधान राखल्यामुळे प्रवाशांनीही चालकाचे आभार मानलेत.

पाहा व्हिडीओ :

सुदैवानं यावेळी मोठी दुर्घटना टळली. नाशिकमध्ये झालेल्या बस दुर्घटनेप्रमाणेच कल्याणमध्ये गॅस गळतीमुळे बस पेटण्याची भीती व्यक्त केली जात होती. मात्र वेळीच सतर्कता बाळगल्यानं थोडक्यात निभावलं.

नाशिकमध्ये खासगी बस आणि कंटेनरमध्ये धडक होऊन भीषण अपधात झाला होता. नुकत्याच झालेल्या या भीषण अपघातात 12 जणांचा होरपळून मृत्यू झालेला. यवतमाळच्या पुसदहून मुंबईला जाणाऱ्या बसच्या डिझेल टँक फुटून आग भडकली होती. या आगीत बस जळून खाक झालेली.

या घटनेनंतर बसमध्ये आग लागण्याच्या अनेक घटनाही समोर आल्या होत्या. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात होती. खासगी बसमध्ये आग लागण्याच्या घटना वारंवार समोर यत असतानाच आता कल्याणमध्ये एका प्रवासी मधून गॅस गळती होत असल्याचं समोर आल्यानं खळबळ उडाली होती.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.