AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

High Court : कैद्याला 14 दिवसांपेक्षा जास्त काळ एकांतात ठेवता येत नाही, मुंबई उच्च न्यायालयाने अंडा सेलमधून केली दोषीची सुटका

रुबीनाने वकील रुपेश जैस्वाल यांच्यामार्फत दाखल केलेल्या याचिकेत महाराष्ट्र कारागृह कायदा, 1894 नुसार कैद्यांना एकांतात ठेवण्याची वैधानिक अनुज्ञेय मुदत केवळ 14 दिवस असल्याचे निदर्शनास आणून दिले.

High Court : कैद्याला 14 दिवसांपेक्षा जास्त काळ एकांतात ठेवता येत नाही, मुंबई उच्च न्यायालयाने अंडा सेलमधून केली दोषीची सुटका
कैद्याला 14 दिवसांपेक्षा जास्त काळ एकांतात ठेवता येत नाही
| Edited By: | Updated on: Jan 31, 2022 | 12:15 AM
Share

मुंबई : दोन वर्षांहून अधिक काळ औरंगाबाद कारागृहात कथितपणे एकांतवासात ठेवण्यात आलेल्या इम्रान उर्फ मेहेदी नासिर शेख या आरोपीची मानसिक स्थिती तपासण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालया(Mumbai High Court)च्या औरंगाबाद खंडपीठाने तुरुंग प्रशासनातील अधिकार्‍यांना दिले आहेत. शेखची पत्नी रुबीना शेख हिने आपल्या पतीला सुमारे दोन वर्षे चार महिने अंडा सेल(Anda Cell)मध्ये (एकांत कारावास) ठेवण्यात आल्याचा आरोप करीत उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तिच्या याचिकेची गंभीर दखल घेत न्यायालयाने अशा प्रकारे दोन वर्षांहून अधिक काळ कुठल्याही आरोपीला एकांतवासात ठेवण्याचा प्रकार फारच धक्कादायक असल्याचे महत्त्वपूर्ण मत नोंदवले. मुळात आरोपीला 14 दिवसांपेक्षा अधिक काळ अंडा सेल अर्थात एकांतवासात ठेवता येते. 1984 च्या महाराष्ट्र तुरुंग कायद्यात तशी तरतूद आहे, असेही न्यायालयाने यावेळी नमूद केले. (Prisoner cannot be kept in solitary confinement for more than 14 days, Mumbai High Court)

नेमके प्रकरण काय आहे?

रुबीनाने वकील रुपेश जैस्वाल यांच्यामार्फत दाखल केलेल्या याचिकेत महाराष्ट्र कारागृह कायदा, 1894 नुसार कैद्यांना एकांतात ठेवण्याची वैधानिक अनुज्ञेय मुदत केवळ 14 दिवस असल्याचे निदर्शनास आणून दिले. रुबीनाने सांगितले की तिने आणि तिच्या पतीने कारागृह अधीक्षकांना पत्र लिहून विनंती केली होती की त्याला इतर कैद्यांसह नियमित सेलमध्ये स्थानांतरित करावे. तथापि, त्यांच्या अर्जांवर तुरुंग प्रशासनाकडून कोणताही प्रतिसाद देण्यात आला नाही. त्यानंतर रुबिनाने 5 जानेवारी 2022 रोजी औरंगाबाद खंडपीठाच्या कायदेशीर सहाय्य सेवांना पत्र लिहिले. यानंतर उच्च न्यायालयाच्या विधी सेवा उपसमितीने या खटल्यात रुबिनाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी जयस्वाल यांची वकील म्हणून नियुक्ती केली आणि सध्याची याचिका दाखल करण्यात आली होती.

पेण पोलिसांच्या ताब्यातून हाफ मर्डरचा आरोपी पसार

हाफ मर्डरच्या गुन्ह्यात अटक असलेल्या आरोपीने पेण पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पलायन केल्याची घटना घडली आहे. यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वडखळ पोलीस ठाण्यात हाफ मर्डरचा गुन्हा दाखल असलेला आरोपी पेण पोलीस ठाण्यात अटकेत होता. टॉयलेटला जाण्याच्या बहाण्याने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून जाण्यात तो यशस्वी ठरला आहे. बिरू गणेश महतो (19) असे पळून गेलेल्या आरोपीचे नाव असून तो मूळचा बोकारो झारखंड येथील रहिवासी आहे. तो पाबल कार्ली येथे एका पोकलन मशिनवर मदतनीस म्हणून कामाला होता. येथे पोकलन मशिनवर चालक असलेला राजेंद्र यादव हा आरोपी बिरू महतो याला पोकलन मशिन ऑपरेट करताना तसेच जेवण बनविण्यावरुन काही ना काही कारण काढून त्रास देत होता. या गोष्टीचा राग मनात धरुन आरोपी बिरू गणेश महतो याने राजेंद्र यादव याच्या दोन्ही हाताच्या पंजांवर, डोक्यावर, कपाळावर व चेहऱ्यावर लोखंडी कोयत्याने वार करून त्यास गंभीर दुखापत करून ठार मारण्याचा प्रयत्न केला होता.

इतर बातम्या

‘माझ्या नादी लागाल, तर करीन 302’ म्हणणारी अखेर अटकेत! सोशल मीडियावरची गुंडगिरी भोवली

‘लग्नाच्या जोड्या स्वर्गात नाही, तर नरकात जुळतात!’ मुंबई उच्च न्यायालयानं असं नेमकं का म्हटलं?

मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.