AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दारु न दिल्याने शिवीगाळ, वाट अडवत लाथा-बुक्क्यांनी मारहाण, उपचारादरम्यान तरुणाचा अंत, मध्यरात्रीचा भयानक थरार

दारु न दिल्याने दोघांनी एका तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना कल्याण पश्चिमेतील अहिल्याबाई चौकात घडली होती. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाला.

दारु न दिल्याने शिवीगाळ, वाट अडवत लाथा-बुक्क्यांनी मारहाण, उपचारादरम्यान तरुणाचा अंत, मध्यरात्रीचा भयानक थरार
दारु न दिल्याने शिवीगाळ, वाट अडवत लाथा-बुक्क्यांनी मारहाण, उपचारादरम्यान तरुणाचा अंत, मध्यरात्रीचा भयानक थरार
Reporter Amjad Khan
Reporter Amjad Khan | Edited By: Chetan Patil | Updated on: Sep 17, 2021 | 6:53 PM
Share

कल्याण (ठाणे) : कल्याण पश्चिमेत एक भयानक घटना समोर आली आहे. दोन नराधमांनी एका तरुणाची रात्रीच्या वेळी वाट अडवली. त्यानंतर त्याच्याकडे दारुची मागणी केली. तरुणाने दारु देण्यास नकार करताच या आरोपींनी त्याच्यासोबत बाचाबाची सुरु केली. हा वाद इतका विकोपाला गेला की रात्रीच्या वेळी रस्त्यावर हाणामारी सुरु झाली. दोन तरुणांनी मिळून एका तरुणाला मरेपर्यंत मारलं. या घटनेने संपूर्ण कल्याण शहर हादरलं आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी या प्रकरणी आरोपींना मोठ्या शिताफीने बेड्या ठोकल्या आहेत.

नेमकं प्रकरण काय?

दारु न दिल्याने दोघांनी एका तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना कल्याण पश्चिमेतील अहिल्याबाई चौकात घडली होती. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाला. या प्रकरणी कल्याण बाजारपेठ पोलिसांनी दोघा आरोपीना गजाआड केलं आहे. सुनील चौधरी, लुटो महलहार अशी या आरोपींची नावे आहेत. या दोघा आरोपींना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दारु न दिल्याने झालेल्या हत्येच्या घटनेमुळे कल्याणमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

घटनेचा थरार

कल्याण पश्चिमेकडील अहिल्याबाई चौकात अजय रावत पायी जात असताना त्याला सुनील चौधरी, लुटो महलहार या दोघांनी हटकले. दोघांनी अजय जवळ दारुची मागणी केली. अजयने दारु देण्यास नकार दिला. यावेळी संतापलेल्या सुनील आणि लुटो दोघांनी अजयला लाथा-बुक्क्यांनी, तीक्ष्ण हत्याराने बेदम मारहाण केली. या मारहाणीत अजय गंभीर जखमी झाला. अजयला मुंबई येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

पोलिसांना आरोपींच्या मुसक्या कशा आवळल्या?

याप्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत आरोपींचा शोध सुरु केला. बाजारपेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम पीआय राजेंद्र आहेर, पोलीस अधिकारी प्रमोद सानप यांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला. खबरींनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी एका बांधकाम साईटवर सापळा रचला. त्यानंतर अवघ्या 48 तासात पोलिसांनी आरोपी सुनील चौधरी आणि लुटू मल्हार  या दोघांना अटक केली. या दोन्ही आरोपींना कल्याण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे

उल्हासनगरात दिवसाढवळ्या एका तरुणाची हत्या

उल्हासनगरच्या नेताजी चौक बंगलो परिसरात एका तरुणाची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली. सुशांत उर्फ गुड्या गायकवाड असं मृतकाचं नाव आहे. तलवार, चॉपर घेऊन 10 ते 15 जणांनी मिळून सुशांतवर हल्ला केला. या घटनेची माहिती मिळताच हिललाईन पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पण तोपर्यंत उशिर झाला होता. सुशांत रक्तबंबाळ अवस्थेत जमिनीवर कोसळला होता. पोलिसांनी जखमी अवस्थेत सुशांत याला रुग्णालयात नेलं. मात्र वाटेतच त्याचा मृत्यू झाला.

हेही वाचा :

खदानीत झाडावर आढळला लटकता मृतदेह, आठ दिवसांपासून बेपत्ता कामगाराचा शोध लागला, हत्या की आत्महत्या?

पळून गेलेल्या जोडप्याला मुलीच्या नातेवाईकांनी दिल्लीत शोधलं, ग्वालियरमध्ये नेलं, मुलाचं लिंग कापत हत्या, मुलीचा गळा चिरला

Follow Us
केंद्रात मंत्रिपद देतो, 20 कोटी द्या, भाजपाच्या नेत्यावरच टाकलं जाळं;
केंद्रात मंत्रिपद देतो, 20 कोटी द्या, भाजपाच्या नेत्यावरच टाकलं जाळं;.
एकच खळबळ! 700 कर्मचारी असलेल्या पुण्यातील IT कंपनीला रातोरात टाळे
एकच खळबळ! 700 कर्मचारी असलेल्या पुण्यातील IT कंपनीला रातोरात टाळे.
लाडकी बहीण योजनेबाबत स्वतः एकनाथ शिंदे यांनीच केली मोठी घोषणा, थेट म्ह
लाडकी बहीण योजनेबाबत स्वतः एकनाथ शिंदे यांनीच केली मोठी घोषणा, थेट म्ह.
मद्यधुंद नशेतील महिलेचा पोलिस ठाण्यातच धिंगाणा, थेट शिवीगाळ करत...
मद्यधुंद नशेतील महिलेचा पोलिस ठाण्यातच धिंगाणा, थेट शिवीगाळ करत....
मुंबईत खळबळ, वर्दळीच्या ठिकाणी आढळली बेवारस बॅग
मुंबईत खळबळ, वर्दळीच्या ठिकाणी आढळली बेवारस बॅग.
बीड पुन्हा हादरलं! सासरच्यांनी आधी तिला उपाशी ठेवलं नंतर...पाच जणांवर
बीड पुन्हा हादरलं! सासरच्यांनी आधी तिला उपाशी ठेवलं नंतर...पाच जणांवर.
ज्याची भीती तेच घडलं! या करणामुळे पुन्हा 80 लाख लाडक्या बहिणी अपात्र,
ज्याची भीती तेच घडलं! या करणामुळे पुन्हा 80 लाख लाडक्या बहिणी अपात्र,.
मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं, मग आता... त्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांचं
मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं, मग आता... त्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांचं.
परळीवाल्याला तर आता... मनोज जरांगेंनी काढला त्या घातपाताचा विषय अन्
परळीवाल्याला तर आता... मनोज जरांगेंनी काढला त्या घातपाताचा विषय अन्.
सरकारने आश्वासन पाळलं नाही तर... मनोज जरांगे पाटलांचे हॉस्पिटलमधून
सरकारने आश्वासन पाळलं नाही तर... मनोज जरांगे पाटलांचे हॉस्पिटलमधून.