AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

500 रुपयांच्या उधारीवरुन वादावादी, वर्ध्यात चाकूने सपासप वार करत तरुणाची हत्या

रुपेश खिल्लारे (रा. इतवारा) असे मयत तरुणाचे नाव आहे. रुपेशने आरोपी निलेश वालमांढरे याच्याकडून उसनवारीने पैसे घेतले होते. मात्र पैशाची परतफेड न केल्याने निलेशने रुपेशकडे धोशा लावला होता. यातून दोघांमध्ये वादावादी झाली.

500 रुपयांच्या उधारीवरुन वादावादी, वर्ध्यात चाकूने सपासप वार करत तरुणाची हत्या
अवघ्या 17 दिवसांपूर्वीच लग्न, डोळ्यात संसाराची स्वप्न अन् संशयास्पद मृत्यू
| Edited By: Anish Bendre | Updated on: Oct 19, 2021 | 4:09 PM
Share

वर्धा : उसनवारीने दिलेले पैसे परत न दिल्याने युवकाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. ही घटना वर्धा जिल्ह्यातील इत्वारा बाजार भागातील मच्छी मार्केट परिसरात सोमवारी रात्रीच्या सुमारास घडली. वर्धा शहर पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले असून चाकू जप्त केल्याची माहिती दिली. ही हत्या अवघ्या 500 रुपयांसाठी झाली असल्याची माहिती आहे.

काय आहे प्रकरण?

रुपेश खिल्लारे (रा. इतवारा) असे मयत तरुणाचे नाव आहे. रुपेशने आरोपी निलेश वालमांढरे याच्याकडून उसनवारीने पैसे घेतले होते. मात्र पैशाची परतफेड न केल्याने निलेशने रुपेशकडे धोशा लावला होता. यातून दोघांमध्ये वादावादी झाली.

पोटावर चाकूने सपासप वार

भांडण इतकं वाढलं की निलेशने रुपेशच्या पोटावर चाकूने सपासप वार करुन हत्या केली. निलेशला शहर पोलिसांनी अटक केल्याची विश्वसनीय माहिती असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

आरोपी गुन्हेगारी प्रवृत्तीचा

आरोपी निलेश वालमांढरे याच्यावर शहर पोलीस ठाण्यात दारूविक्री सह विविध गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. तसेच मृत रुपेश हा देखील त्याच पार्शवभूमीचा असल्याचे समजते.

कोल्हापुरात एकाची हत्या, सहा जण जेरबंद

दुसरीकडे, धारदार शस्त्राने संतोष श्रीकांत जाधव (वय 42 वर्ष, रा. जवाहरनगर) यांचा निर्घृण खून करणाऱ्या टोळीला पोलिसांनी ताब्यात घेतले. टोळीतील सहा जण कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज परिसरात सापडल्याची माहिती पोलीस उपाधीक्षक बाबुराब महामुनी यांनी दिली. शनिवारी रात्री सशस्त्र हल्ला करुन संतोष जाधवांची हत्या करण्यात आली होती.

कोणाकोणाला अटक

शुभम बाळासो काणे (वय 24 वर्ष), निखिल चंद्रकांत माने (वय 21 वर्ष), विपुल आप्पासो नाईक (वय 20 वर्ष), अभिषेक राजू आसाल (वय 21 वर्ष) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून दोन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अटक केलेल्या चौघा जणांना न्यायालयाने 25 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

संबंधित बातम्या :

पोलीस चौकीपासून हाकेच्या अंतरावर चाकूहल्ला, भररस्त्यात हत्याकांड, नाशकात चाललंय काय?

वसईत पोलिसांची दादागिरी; दुकानात शिरुन दुकानदाराला मारहाण, घटना सीसीटीव्हीत कैद

पत्नीसह दोघांची हत्या, जन्मठेप भोगणारा वृद्ध पॅरोलवर बाहेर, पुन्हा एकाचा धारदार शस्त्राने खून

Follow Us
थलपती विजय यांचं सरकार पाडण्याचा कट? 15 आमदारांना कोट्यवधींचं आमिष!
Vijay Thalapathy | थलपती विजय यांचं सरकार पाडण्याचा कट? 15 आमदारांना कोट्यवधींचं आमिष!
मुंबई हळहळली! महिला ट्रेनखाली चिरडली गेली अगदी... धो धो पावसादरम्यान
मुंबई हळहळली! महिला ट्रेनखाली चिरडली गेली अगदी... धो धो पावसादरम्यान धक्कादायक घटना
पावसाचा कहर! पहिल्या आठवड्यातच झाले नागरिकांचे हाल! प्रभादेवी रेल्वे
पावसाचा कहर! पहिल्या आठवड्यातच झाले नागरिकांचे हाल! प्रभादेवी रेल्वे स्थानकाबाहेर थेट...
एकच खळबळ! शिंदे सेनेत प्रवेशानंतर बंडखोर खासदाराचा थेट पोलखोल करण्याचा
एकच खळबळ! शिंदे सेनेत प्रवेशानंतर बंडखोर खासदाराचा थेट पोलखोल करण्याचा इशारा; तुमच्या नसानसात...
पुन्हा 'मविआ'मध्ये मिठाचा खडा पडणार? शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील
पुन्हा 'मविआ'मध्ये मिठाचा खडा पडणार? शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील बडा नेता हे काय बोलून गेला? थेट मुख्यमंत्री...
Latest Rain Update | प्रवाशांनो काळजी घ्या! मुंबई लोकल मंदावली; थेट
Latest Rain Update | प्रवाशांनो काळजी घ्या! मुंबई लोकल मंदावली; थेट रेल्वे रुळावरच... पहा व्हिडीओ
शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
नवी मुंबईत थरार! शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या...
Mumbai -Nashik Highway | भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन्...
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन् संभाजीनगरात... बोलता बोलता सुषमा अंधारे हे काय म्हणाल्या?
बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज... फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
मोठी बातमी! बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज, AI शेती... मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला प्लॅन!