AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रक्तरंजित नदी… ‘त्या’ सात जणांना बेशुद्ध करण्यापूर्वी काय केलं? घरचाच भेदी बनला काळ; पुण्याच्या हत्याकांडातील काळीबाजू काय?

पुण्यातील यवत गावाच्या बाहेरच्या परिसरात भीमा नदीवर परगाव पूलाजवळ सोमवारी 4 आणि मंगळवारी 3 जणांचे मृतदेह सापडले होते. सर्व मृतदेह एकमेकांच्या 200 ते 300 मीटरच्या अंतरावर सापडले होते.

रक्तरंजित नदी... 'त्या' सात जणांना बेशुद्ध करण्यापूर्वी काय केलं? घरचाच भेदी बनला काळ; पुण्याच्या हत्याकांडातील काळीबाजू काय?
policeImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jan 25, 2023 | 1:18 PM
Share

पुणे: आजची सकाळ पुणेकरांसाठी अत्यंत धक्कादायक आणि हादरवून टाकणारी ठरली. एकाच कुटुंबातील सात जणांची हत्या झाली. सुरुवातीला ही आत्महत्या असल्याचं वाटत होतं. पोलिसांनीही तसा दावा केला होता. पण नंतर पोलिसांनी अवघ्या काही तासात या प्रकरणाचं सत्य बाहेर आणलं. त्या रक्तरंजित नदीत सात लोकांनी आत्महत्या केली नाही तर त्यांची हत्या करण्यात आली. घरच्याच भेदीने हे कृष्णकृत्य केलं. चुलत भावानेच जुन्या वैरातून सात जणांची हत्या घडवून आणली आणि आत्महत्येचा बनाव केला.

पुण्याच्या दौंड तालुक्यातील भीमा नदीत एक आठवड्यापूर्वी एकाच कुटुंबातील सात जणांचे मृतदेह आढळून आले होते. पोलिसांनी सुरुवातीला तपास करून ही आत्महत्या असल्याचं सांगितलं. या कुटुंबातील मुलीचे गावातील मुलाशी प्रेम होते. त्यामुळे दोघेही गायब झाले होते. त्यामुळेच या कुटुंबातील सात जणांनी आत्महत्या केली असल्याचं पोलिसांचं म्हणणं होतं.

पराकोटीच्या द्वेषातून…

परंतु पोलिसांनी जसजसा या प्रकरणाचा खोलवर तपास केला. तस तसं त्यांना नवी माहिती मिळाली. या सात जणांनी आत्महत्या केली नसून त्यांची हत्या झाल्याचं पोलिसांनी आढळून आलं. पराकोटीच्या द्वेषामुळे ही हत्या करण्यात आल्याचं सांगण्यात आलं. चुलत भावानेच या सातही हत्या केल्याचं तपासात उघड झालं.

महिलेलाही अटक

या हत्या घडवून आणणाऱ्या चुलत भावाला काल रात्री पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यासोबत एका महिलेलाही अटक करणअयात आली आहे. काही ओळखीच्या लोकांनी आणि नातेवाईकांनी आधी या सात जणांना काही तरी खायला दिलं. त्यामुळे हे सातजण बेशुद्ध पडले. त्यानंतर त्यांना बेशुद्धावस्थेतच नदीत फेकून देण्यात आल्याचं एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं.

फॉरेन्सिक रिपोर्ट यायचा बाकी

या सातही मृतांच्या अंगावर मार लागल्याच्या कोणत्याच जखमा नव्हत्या. त्यामुळे पोलीस फॉरेन्सिक रिपोर्टची वाट पाहत आहेत. या प्रकरणात आतापर्यंत सहा लोकांना अटक करण्यात आली आहे. एक आरोपी अजूनही फरार आहे.

काय आहे प्रकरण?

पुण्यातील यवत गावाच्या बाहेरच्या परिसरात भीमा नदीवर परगाव पूलाजवळ सोमवारी 4 आणि मंगळवारी 3 जणांचे मृतदेह सापडले होते. सर्व मृतदेह एकमेकांच्या 200 ते 300 मीटरच्या अंतरावर सापडले होते. मोहन पवार, पत्नी संगिता मोहन पवार, मुलगी राणी फलवरे, जावई श्याम पंडित फलवरे आदी मृतांची नावे आहेत. मृतांमध्ये तीन लहान मुलांचाही समावेश आहे.

Follow Us
दिल्ली आंदोलनातील तरुणींवर कंगना रणौत यांची जहरी टीका; गटर जनरेशन...
दिल्ली आंदोलनातील तरुणींवर कंगना रणौत यांची जहरी टीका; गटर जनरेशन म्हणत केलं वादग्रस्त वक्तव्य!
दिलीप वळसे पाटील- शरद पवार भेट, आणखी कोण कोण होतं उपस्थित? Inside...
दिलीप वळसे पाटील- शरद पवार भेट, आणखी कोण कोण होतं उपस्थित? Inside Story समोर
हेच विद्यार्थी सरकार बदलतील; घरी परतताच दीपकेचा मोदी सरकारला थेट इशारा
Abhijeet Dipke | हेच विद्यार्थी सरकार बदलतील; घरी परतताच अभिजीत दीपकेचा मोदी सरकारला थेट इशारा
मोठी बातमी! NDA मध्ये येताच सुप्रिया सुळेंना मिळणार मोठं गिफ्ट?दावा...
मोठी बातमी! NDA मध्ये येताच सुप्रिया सुळेंना मिळणार मोठं गिफ्ट? दिल्लीतील हालचालीमागे... बड्या व्यक्तीच्या दाव्याने खळबळ
तो सुखरूप घरी परतला हे आमच्यासाठी... दीपकेंच्या वडिलांची प्रतिक्रिया
तो सुखरूप घरी परतला हे आमच्यासाठी... अभिजीत दीपकेंच्या वडिलांची प्रतिक्रिया चर्चेत
मोठी बातमी! दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला, पुण्यात...
मोठी बातमी! दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला, पुण्यात घडामोडींना वेग
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! कर्जमाफी योजनेची पहिली यादी जाहीर
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! कर्जमाफी योजनेची पहिली यादी जाहीर; लाखो शेतकऱ्यांना फायदा
जात प्रमाणपत्र मागितलं की मिळतं; जरांगेंच्या आंदोलनाच्या घोषणेनंतर...
Devendra Fadnavis | जात प्रमाणपत्र मागितलं की मिळतं!; मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या घोषणेनंतर फडणवीसांचं मोठं विधान
अखेर परीक्षा सुधारणा विधेयक मंजूर... लोकसभेत प्रचंड गदारोळ
अखेर परीक्षा सुधारणा विधेयक मंजूर... लोकसभेत प्रचंड गदारोळ
दिल्लीत मोठ्या घडामोडी! किरण रिजिजू थेट अमित शाहांच्या भेटीला
दिल्लीत मोठ्या घडामोडी! किरण रिजिजू थेट अमित शाहांच्या भेटीला; नेमकं काय शिजतंय?