AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भावाच्या अपघाती मृत्यूला जबाबदार धरत कुटुंबाला संपवलं, पाच भावंडांनी एकाच कुटंबातील सात जणांचा काटा काढला !

आरोपी अशोक पवार याचा भाऊ धनंजय पवार यांचा अपघातात मृत्यू झाला होता. मात्र धनंजयच्या अपघाताला हे पवार कुटुंब कारणीभूत होतं, असा समज आरोपींचा होता. याच रागातून आोरपींनी ही हत्या केली.

भावाच्या अपघाती मृत्यूला जबाबदार धरत कुटुंबाला संपवलं, पाच भावंडांनी एकाच कुटंबातील सात जणांचा काटा काढला !
दौंडमधील कुटुंबाच्या मृत्यूप्रकरणी धक्कादायक खुलासाImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Jan 25, 2023 | 3:27 PM
Share

पुणे : पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्राला हादरवून सोडणारी घटना दौंडमधील पारगावमध्ये उघडकीस आली होती. भीमा नदीत एकाच कुटुंबातील सात जणांचे मृतदेह टप्प्याटप्प्याने आढळून आले होते. या सात जणांच्या मृत्यूचे रहस्य उलगडण्यास अखेर पोलिसांना यश आले आहे. पूर्ववैमनस्यातून या सात जणांची नात्यातील लोकांनीच हत्या केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. हत्येप्रकरणी पाचही आरोपींना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेले पाचही आरोपी सख्खी भावंडे आहेत. आरोपींमध्ये चार पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. आरोपी आणि पीडित एकाच गावातील रहिवासी आहेत.

अशोक कल्याण पवार, शाम कल्याण पवार, शंकर कल्याण पवार, प्रकश कल्याण पवार आणि कांताबाई सर्जेराव जाधव (बहीण) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. सर्व आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेण्यात आलं आहे.

टप्प्याटप्प्याने आढळले होते सात मृतदेह

दौंड तालुक्यातील पारगाव येथे भीमा नदीत 18 जानेवारी ते 24 जानेवारी दरम्यान टप्प्याटप्प्याने सात जणांचे मृतदेह आढळले होते. मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी तात्काळ तपास सुरु करत मृतदेहांची ओळख पटवली.

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी या घटनेचा तपास करण्यासाठी अनेक पथके तयार केली होती. तपासादरम्यान पोलिसांना काही पुरावे हाती लागले. यावरुन घातपात करुन कुटुंबाची हत्या करण्यात आल्याचे निष्पन्न झाले.

हत्याकांडामागील कारण काय?

आरोपी अशोक पवार याचा भाऊ धनंजय पवार यांचा अपघातात मृत्यू झाला होता. मात्र धनंजयच्या अपघाताला हे पवार कुटुंब कारणीभूत होतं, असा समज आरोपींचा होता. याच रागातून आोरपींनी ही हत्या केली.

करणी किंवा काळू जादू यातून हे मृत्यू झाल्याचा अंदाज आधी वर्तवण्यात आला होता. मात्र पोलीस तपासात हा अंदाज खोटा ठरला असून, ठरवून केलेले हत्याकांड असल्याचे उघड झाले आहे.

Follow Us
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!.
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!.
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं.
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच.
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.