AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फिरायला बाहेर पडला, एअर बॅगमुळे 6 वर्षांचा चिमुकला जीवानिशी गेला

वाढत्या अपघातांची संख्या लक्षात घेऊन वाहतूक विभागाकडूनही नियम कठोर करण्यात आले असून कारमधील एअर बॅगच्या नियमांचाही त्यात समावेश आहे. एखाद्या गाडीचा अपघात झाला तर एअर बॅग ही जीव वाचवणारी, जीवदान देणारी ठरते, असं म्हटलं जातं.

फिरायला बाहेर पडला, एअर बॅगमुळे 6 वर्षांचा चिमुकला जीवानिशी गेला
Image Credit source: प्रातिनिधिक फोटो
| Updated on: Dec 25, 2024 | 8:54 AM
Share

सध्या देशभरात अपघातांची संख्या प्रचंड वाढली असून त्यामुळे असंख्य लोकांना जीव गमवावा लागत आहे. वाढत्या अपघातांची संख्या लक्षात घेऊन वाहतूक विभागाकडूनही नियम कठोर करण्यात आले असून कारमधील एअर बॅगच्या नियमांचाही त्यात समावेश आहे. एखाद्या गाडीचा अपघात झाला तर एअर बॅग ही जीव वाचवणारी, जीवदान देणारी ठरते, असं म्हटलं जातं. पण नवी मुंबईमध्ये कारमधील हीच एअर बॅग जीव वाचवणारी नव्हे तर काळ ठरल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एअर बगमुळे अवघ्या 6 वर्षांच्या चिमुकल्या मुलाला जीव गमवावा लागल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार हर्ष असे त्या 6 वर्षांच्या चिमुकल्या मुलाचे नाव असून वाशीमध्ये हा दुर्दैवी प्रकार घडला आहे. अपघात झाल्यावर जी एअर बॅग आयुष्य वाचवते, त्याच एअर बॅमगुळे चिमुकल्याचा जीव गेला. चिमुकला हर्ष हा वडिलांसोबत बाहेर गेला होता. त्याचे वडील कार चालवत होते, तर तो वडिलांच्या शेजारीच फ्रंट सीटवर बसला होता. मात्र अचानक त्यांची गाडी एका डिव्हायडरवर आदळली आणि विचित्र अपघात झाला.

या अपघातामुळे कारमधील एअर बॅग्स उघडल्या गेल्या, मात्र त्यांचा जोर अतिशय जास्त असल्यामुळे समोरच बसलेल्या चिमुकल्या हर्षच्या गळ्याला मार लागला. आणि दुर्दैवाने त्याचा गुदमरून मृत्यू झाला. त्यामुळे मोठी खळबळ माजली. वाशी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे. हर्षचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. एवढ्या छोट्या मुलाच्या अशा दुर्दैवी मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत असून त्याच्या कुटुंबावर तर दु:खाचा मोठा डोंगरच कोसळला आहे.

Follow Us
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.
जैन समाजासाठी सिलेंडरची सोय, भाजपचा सर्वात मोठा नेता वादाच्या भोवऱ्यात
जैन समाजासाठी सिलेंडरची सोय, भाजपचा सर्वात मोठा नेता वादाच्या भोवऱ्यात.
माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद नको, सुनील तटकरेंना कोणी केला फोन?
माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद नको, सुनील तटकरेंना कोणी केला फोन?.
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.