AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लग्नाला 2 वर्ष झाली होती, एका अपघातानं कल्पनाचा संसार उद्ध्वस्त!

'तुझ्या नवऱ्याचा अपघातात मृत्यू झालाय' हे शब्द ऐकताच कल्पना जागेवर कोसळली

लग्नाला 2 वर्ष झाली होती, एका अपघातानं कल्पनाचा संसार उद्ध्वस्त!
दुर्दैवी अपघात.. आणि तरुणाचा जागीच मृत्यूImage Credit source: TV9 Marathi
| Updated on: Dec 01, 2022 | 2:13 PM
Share

कल्पना आणि विपिन याचं लग्न होऊन दोनच वर्ष झाली होती. विपीन मूळचा गुजरातचा. त्याचे वडील एका मंदिरात पूजा-अर्चा करायचे. त्यांचं नाव अरुण शुक्ला. मोठ्या उत्साहात त्यांनी मुलाचं लग्न लावलं होतं. पण बुधवारी सकाळी अनर्थ घडला. बस आणि ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात विपीन शुक्ला या 25 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. त्याची पत्नी कल्पना ही पतीच्या मृत्यूची बातमी कळल्यानंतर जागीच कोसळली. अजूनही ती पतीच्या मृत्यूच्या धक्क्यातून पूर्णपणे सावरु शकलेली नाही. तर विपीनच्या आईच्या मनावर मोठा आघात झालाय. आपला मुलगा आता जिवंत नाही, यावर त्यांचा विश्वासच बसत नाहीये. त्या दोघीही पूर्णपणे कोलमडल्यात. कल्पनाचा संसार एका अपघातानं उद्ध्वस्त केलाय. उत्तर प्रदेशच्या बहराईच इथं झालेल्या ट्रक आणि बसच्या भीषण अपघातानं कल्पनाच्या कपाळावरचं कुंकू पुसलं गेलंय.

पतीच्या मृत्यूबाबत कळल्यापासून कल्पना शुक्ला यांच्या डोळ्यातील अश्रू थांबायचं नाव घेत नाही आहे. लग्नानंतरच्या दोन वर्षांच्या पतीसोबतच्या आठवणींनी कल्पना अस्वस्थ झाली आहे. यापुढचं आयुष्य पतीशिवाय कसं घालवायचं, या विचारांनी तिच्या मनात काहूर माजलंय.

या आणि अशाच काळीज पिळवटून टाकणाऱ्या एकापेक्षा एक हृदयद्रावर किस्से आता समोर येत आहे. हा अपघात घडला उत्तर प्रदेशातील बहराईच जिल्ह्यातील जरवलरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत. एक प्रवासी बस आणि ट्रक यांच्या जबरदस्त धडक बसली. पहाटे 4-4.30 वाजण्याच्या सुमारास झालेल्या या अपघातावेळी कानठळ्या बसतील इतका जबरदस्त आवाज झाला.

लोकं साखरझोपेत होते. काही कळायच्या आतच 6 प्रवाशांचा जागीच जीव गेला. नेमकं काय घडलंय, हे जेव्हा प्रवाशांना कळलं, तेव्हा सगळेच बिथरले होते.

जयपूर येथून निघालेली प्रवासी बस 35 ते 40 प्रवाशांना घेऊन रुपईडीहा इथं निघाली होती. पण बहराईच-लखनौ हायवेवर या बसचा भीषण अपघात झाला होता. हायवेवर झालेल्या या अपघातानंतर बसमधील सर्व प्रवाशांची भंबेरी उडाली होती.

जेव्हा अपघातानंतर लोकांचे डोळे उघडले, तेव्हा बस रस्त्याच्या एका बाजूला कलंडली होती. तर लोकांचे मृतदेह रस्त्यावर फेकले गेले होते. ते दृष्य हादरवणारं होतं, असं बसमधून प्रवास करणाऱ्याच काही प्रवाशांनी सांगितलंय. या अपघातात 15 जण गंभीररीत्या जखमी झाले. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.