AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लग्नाला 2 वर्ष झाली होती, एका अपघातानं कल्पनाचा संसार उद्ध्वस्त!

'तुझ्या नवऱ्याचा अपघातात मृत्यू झालाय' हे शब्द ऐकताच कल्पना जागेवर कोसळली

लग्नाला 2 वर्ष झाली होती, एका अपघातानं कल्पनाचा संसार उद्ध्वस्त!
दुर्दैवी अपघात.. आणि तरुणाचा जागीच मृत्यूImage Credit source: TV9 Marathi
सिद्धेश सावंत
सिद्धेश सावंत | Updated on: Dec 01, 2022 | 2:13 PM
Share

कल्पना आणि विपिन याचं लग्न होऊन दोनच वर्ष झाली होती. विपीन मूळचा गुजरातचा. त्याचे वडील एका मंदिरात पूजा-अर्चा करायचे. त्यांचं नाव अरुण शुक्ला. मोठ्या उत्साहात त्यांनी मुलाचं लग्न लावलं होतं. पण बुधवारी सकाळी अनर्थ घडला. बस आणि ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात विपीन शुक्ला या 25 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. त्याची पत्नी कल्पना ही पतीच्या मृत्यूची बातमी कळल्यानंतर जागीच कोसळली. अजूनही ती पतीच्या मृत्यूच्या धक्क्यातून पूर्णपणे सावरु शकलेली नाही. तर विपीनच्या आईच्या मनावर मोठा आघात झालाय. आपला मुलगा आता जिवंत नाही, यावर त्यांचा विश्वासच बसत नाहीये. त्या दोघीही पूर्णपणे कोलमडल्यात. कल्पनाचा संसार एका अपघातानं उद्ध्वस्त केलाय. उत्तर प्रदेशच्या बहराईच इथं झालेल्या ट्रक आणि बसच्या भीषण अपघातानं कल्पनाच्या कपाळावरचं कुंकू पुसलं गेलंय.

पतीच्या मृत्यूबाबत कळल्यापासून कल्पना शुक्ला यांच्या डोळ्यातील अश्रू थांबायचं नाव घेत नाही आहे. लग्नानंतरच्या दोन वर्षांच्या पतीसोबतच्या आठवणींनी कल्पना अस्वस्थ झाली आहे. यापुढचं आयुष्य पतीशिवाय कसं घालवायचं, या विचारांनी तिच्या मनात काहूर माजलंय.

या आणि अशाच काळीज पिळवटून टाकणाऱ्या एकापेक्षा एक हृदयद्रावर किस्से आता समोर येत आहे. हा अपघात घडला उत्तर प्रदेशातील बहराईच जिल्ह्यातील जरवलरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत. एक प्रवासी बस आणि ट्रक यांच्या जबरदस्त धडक बसली. पहाटे 4-4.30 वाजण्याच्या सुमारास झालेल्या या अपघातावेळी कानठळ्या बसतील इतका जबरदस्त आवाज झाला.

लोकं साखरझोपेत होते. काही कळायच्या आतच 6 प्रवाशांचा जागीच जीव गेला. नेमकं काय घडलंय, हे जेव्हा प्रवाशांना कळलं, तेव्हा सगळेच बिथरले होते.

जयपूर येथून निघालेली प्रवासी बस 35 ते 40 प्रवाशांना घेऊन रुपईडीहा इथं निघाली होती. पण बहराईच-लखनौ हायवेवर या बसचा भीषण अपघात झाला होता. हायवेवर झालेल्या या अपघातानंतर बसमधील सर्व प्रवाशांची भंबेरी उडाली होती.

जेव्हा अपघातानंतर लोकांचे डोळे उघडले, तेव्हा बस रस्त्याच्या एका बाजूला कलंडली होती. तर लोकांचे मृतदेह रस्त्यावर फेकले गेले होते. ते दृष्य हादरवणारं होतं, असं बसमधून प्रवास करणाऱ्याच काही प्रवाशांनी सांगितलंय. या अपघातात 15 जण गंभीररीत्या जखमी झाले. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे.

Follow Us
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट...