AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लग्नाला 2 वर्ष झाली होती, एका अपघातानं कल्पनाचा संसार उद्ध्वस्त!

'तुझ्या नवऱ्याचा अपघातात मृत्यू झालाय' हे शब्द ऐकताच कल्पना जागेवर कोसळली

लग्नाला 2 वर्ष झाली होती, एका अपघातानं कल्पनाचा संसार उद्ध्वस्त!
दुर्दैवी अपघात.. आणि तरुणाचा जागीच मृत्यूImage Credit source: TV9 Marathi
सिद्धेश सावंत
सिद्धेश सावंत | Updated on: Dec 01, 2022 | 2:13 PM
Share

कल्पना आणि विपिन याचं लग्न होऊन दोनच वर्ष झाली होती. विपीन मूळचा गुजरातचा. त्याचे वडील एका मंदिरात पूजा-अर्चा करायचे. त्यांचं नाव अरुण शुक्ला. मोठ्या उत्साहात त्यांनी मुलाचं लग्न लावलं होतं. पण बुधवारी सकाळी अनर्थ घडला. बस आणि ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात विपीन शुक्ला या 25 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. त्याची पत्नी कल्पना ही पतीच्या मृत्यूची बातमी कळल्यानंतर जागीच कोसळली. अजूनही ती पतीच्या मृत्यूच्या धक्क्यातून पूर्णपणे सावरु शकलेली नाही. तर विपीनच्या आईच्या मनावर मोठा आघात झालाय. आपला मुलगा आता जिवंत नाही, यावर त्यांचा विश्वासच बसत नाहीये. त्या दोघीही पूर्णपणे कोलमडल्यात. कल्पनाचा संसार एका अपघातानं उद्ध्वस्त केलाय. उत्तर प्रदेशच्या बहराईच इथं झालेल्या ट्रक आणि बसच्या भीषण अपघातानं कल्पनाच्या कपाळावरचं कुंकू पुसलं गेलंय.

पतीच्या मृत्यूबाबत कळल्यापासून कल्पना शुक्ला यांच्या डोळ्यातील अश्रू थांबायचं नाव घेत नाही आहे. लग्नानंतरच्या दोन वर्षांच्या पतीसोबतच्या आठवणींनी कल्पना अस्वस्थ झाली आहे. यापुढचं आयुष्य पतीशिवाय कसं घालवायचं, या विचारांनी तिच्या मनात काहूर माजलंय.

या आणि अशाच काळीज पिळवटून टाकणाऱ्या एकापेक्षा एक हृदयद्रावर किस्से आता समोर येत आहे. हा अपघात घडला उत्तर प्रदेशातील बहराईच जिल्ह्यातील जरवलरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत. एक प्रवासी बस आणि ट्रक यांच्या जबरदस्त धडक बसली. पहाटे 4-4.30 वाजण्याच्या सुमारास झालेल्या या अपघातावेळी कानठळ्या बसतील इतका जबरदस्त आवाज झाला.

लोकं साखरझोपेत होते. काही कळायच्या आतच 6 प्रवाशांचा जागीच जीव गेला. नेमकं काय घडलंय, हे जेव्हा प्रवाशांना कळलं, तेव्हा सगळेच बिथरले होते.

जयपूर येथून निघालेली प्रवासी बस 35 ते 40 प्रवाशांना घेऊन रुपईडीहा इथं निघाली होती. पण बहराईच-लखनौ हायवेवर या बसचा भीषण अपघात झाला होता. हायवेवर झालेल्या या अपघातानंतर बसमधील सर्व प्रवाशांची भंबेरी उडाली होती.

जेव्हा अपघातानंतर लोकांचे डोळे उघडले, तेव्हा बस रस्त्याच्या एका बाजूला कलंडली होती. तर लोकांचे मृतदेह रस्त्यावर फेकले गेले होते. ते दृष्य हादरवणारं होतं, असं बसमधून प्रवास करणाऱ्याच काही प्रवाशांनी सांगितलंय. या अपघातात 15 जण गंभीररीत्या जखमी झाले. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे.

Follow Us
MNS शहराध्यक्षांच्या गाडीची तोडफोड: मनसेचा भाजपवर आरोप
अंबरनाथमधील भाजप-मनसे राड्यावरुन मनसे नेते आक्रमक, गाडी तोडफोड करणाऱ्यांवर कारवाईची मागणी
चाकणच्या 20 कंपन्या स्थलांतराच्या तयारीत? 2 हजार रोजगारांचा प्रश्न
Sharad Pawar | चाकणच्या 20 कंपन्या स्थलांतराच्या तयारीत? 2 हजार रोजगारांचा प्रश्न; शरद पवार यांचा दावा
आमदार अपात्रता निर्णयावर राहुल नार्वेकरांचं मोठं वक्तव्य...
Rahul Narwekar | आमदार अपात्रता निर्णयावर राहुल नार्वेकरांचं मोठं वक्तव्य; सुप्रीम कोर्टात निर्णय....
फडणवीसांच्या निर्देशाने महा-आयडी; नागरिकांना मिळणार एकच डिजिटल ओळख
मुख्यमंत्री फडणवीसांच्या निर्देशाने महा-आयडी; नागरिकांना मिळणार एकच डिजिटल ओळख
पाकिस्तानचे PM शाहबाज शरीफ यांची पुन्हा भारताला धमकी
‘सिंधूचं पाणी आमची रेड लाईन’; पाकिस्तानचे PM शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
‘गावातील शाळांना सुविधा मिळेपर्यंत स्वातंत्र्याचं स्वप्न अपूर्ण'-दिपके
‘गावातील शाळांना सुविधा मिळेपर्यंत स्वातंत्र्याचं स्वप्न अपूर्ण'- अभिजीत दिपके
जमिनीच्या वादात अडकलेल्यांसाठी मोठी बातमी! सरकारचा मेगा प्लॅन
Chandrashekhar Bawankule | जमिनीच्या वादात अडकलेल्यांसाठी मोठी बातमी! सरकारचा मेगा प्लॅन; चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली घोषणा, म्हणाले...
जरांगेंच्या टीकेनंतर बावनकुळे भावुक; लाड म्हणाले, ‘वैयक्तिक टीक नको’
जरांगेंच्या टीकेनंतर बावनकुळे भावुक; प्रसाद लाड म्हणाले, ‘वैयक्तिक टीका नको’
मनिषा कायंदे यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल : "शिंदेंच्या जीवावर खासदार
मनिषा कायंदे यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल :
राजकीय उद्योग सोडून उद्योजकांकडे लक्ष द्यावे: सामंतांवर हल्लाबोल
राजकीय उद्योग सोडून उद्योजकांकडे लक्ष द्यावे: रोहित पवारांचा उद्योगमंत्री सामंतांवर हल्लाबोल