AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निर्भया प्रकरण : आरोपी पवन गुप्ताची दया याचिका राष्ट्रपतींनी फेटाळली, आता नव्या डेथ वॉरंटची प्रतीक्षा

निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपी पवन गुप्ता याची दया याचिका (Mercy petition) राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी फेटाळून लावली

निर्भया प्रकरण : आरोपी पवन गुप्ताची दया याचिका राष्ट्रपतींनी फेटाळली, आता नव्या डेथ वॉरंटची प्रतीक्षा
Nupur Chilkulwar
Nupur Chilkulwar | Updated on: Mar 04, 2020 | 5:12 PM
Share

नवी दिल्ली : निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपी पवन गुप्ता याची दया याचिका (Mercy petition) राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ram Nath Kovind) यांनी फेटाळून लावली. त्यामुळे तुरुंग प्रशासन आज (4 मार्च) न्यायालयाला याबाबत माहिती देऊन नवीन डेथ वॉरंट जारी करण्याची विनंती करणार असल्याचं तिहार तुरुंगाच्या पोलीस महासंचालकांनी सांगितलं.

निर्भया बलात्कार प्रकरणातील (Nirbhaya Gang Rape Case) आरोपी पवन कुमार गुप्ता याची दया याचिका (Mercy petition) मंगळवारी (3 मार्च) सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली होती. पवन कुमारच्या याचिकेवर न्यायमूर्ती एन.वी. रमना, अरुण मिश्रा, आरएफ नारिमन, आर भानुमती आणि अशोक भूषण यांनी हा निर्णय दिला.

हेही वाचा : निर्भया बलात्कार प्रकरण : नराधमांची फाशी तिसऱ्यांदा टळली

पवन कुमार गुप्ताने शुक्रवारी (28 फेब्रुवारी) सर्वोच्च न्यायालयात दया याचिका दाखल केली होती. त्यानंतर शनिवारी (29 फेब्रुवारी) या दया याचिकेच्या आधारे त्याने पटियाला हाऊस न्यायालयात अर्ज देत 3 मार्चला होणारी फाशी रद्द करण्याची मागणी केली. पटियाला हाऊस न्यायालयाने या याचिकेवर तिहार प्रशासनाकडून उत्तर मागवलं होतं.

हेही वाचा : निर्भया बलात्कार प्रकरण : अखेर दोषींच्या फाशीची नवी तारीख ठरली

पवनव्यतिरिक्त इतर तीन आरोपी मुकेश, अक्षय आणि विनय यांचे न्यायालयीन पर्याय संपले आहेत. या तिघांचीही दया याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. त्यानंतर राष्ट्रपतींनीही यांची दया याचिका फेटाळून लावली.

2012 मध्ये निर्भयावर गँगरेप

दिल्लीत 16 डिसेंबरच्या रात्री फिजिओथेरपीची 23 वर्षीय विद्यार्थिनीवर चालत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. त्यानंतर 15 दिवसात उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली होती. मात्र, आरोपी राम सिंहने प्रकरणाची सुनावणी सुरु झाल्यानंतर तिहार तुरुंगात आत्महत्या केली. तर आरोपी किशोरला तीन वर्ष सुधारगृहात (Mercy petition) ठेवल्यानंतर 2015 मध्ये त्याला सोडण्यात आलं.

हेही वाचा : निर्भया प्रकरण : भिंतीवर डोकं आपटून दोषी विनय जखमी, पुन्हा फाशी टळण्याची भीती

Follow Us
प्रताप सरनाईकांच्या दाव्यानंतर कैलास पाटलांची मोठी प्रतिक्रिया, थेट...
प्रताप सरनाईकांच्या दाव्यानंतर कैलास पाटलांची मोठी प्रतिक्रिया, थेट... धारशिवमध्ये राजकीय समीकरण पुन्हा बदलणार?
तुटलेल्या खिडक्यांवर उपमुख्यमंत्र्यांचे बॅनर अन्... अभिजीत दीपके आता..
तुटलेल्या खिडक्यांवर उपमुख्यमंत्र्यांचे बॅनर अन्... अभिजीत दीपके आता अगामी मोर्च्यावर
आता ओमराजेंचे निकटवर्तीय... राजकीय हालचाली वाढल्या? ऑपरेशन टायगरबाबत..
आता ओमराजेंचे निकटवर्तीय... राजकीय हालचाली वाढल्या? ऑपरेशन टायगरबाबत बड्या मंत्र्याचं मोठं विधान
पुन्हा ठाकरेंचे आमदार...फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण होणाऱ्या सोहळ्यात
पुन्हा ठाकरेंच्या आमदारांची चर्चा! फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण होणाऱ्या कार्यक्रमात ठाकरेंच्या आमदाराची हजेरी
तुम्ही गुपचूप सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांना भेटून... मोठी खळबळ
तुम्ही गुपचूप सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांना भेटून... शिवसेना निकालाआधीच बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
मोठी बातमी! CJI सुर्यकांत यांचे पुन्हा 'कॉक्रोच'बाबतच्या वक्तव्यावर...
मोठी बातमी! CJI सुर्यकांत यांचं पुन्हा 'कॉक्रोच'बाबतच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण, अखेर म्हणाले...
विकसित भारताच्या वाटचालीत महाराष्ट्र ठरणार गेमचेंजर; स्वातंत्र्यदिन...
विकसित भारताच्या वाटचालीत महाराष्ट्र ठरणार गेमचेंजर; स्वातंत्र्यदिनाच्या भाषणादरम्यान CM नेमकं काय म्हणाले?
पंतप्रधानांचं नागरिकांना मोठं आवाहन! जागतिक स्तरावर निर्यात वाढीसाठी..
पंतप्रधानांचं नागरिकांना मोठं आवाहन! जागतिक स्तरावर निर्यात वाढीसाठी...
लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा! तरुणांसाठी...
लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा! तरुणांसाठी... 'या' क्षेत्रात होणार बदल
पंतप्रधान मोदींकडून राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण
Independence Day 2026 | पंतप्रधान मोदींकडून राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण