AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इयत्ता बारावीत 100 पैकी 100 मार्क, संभाजीनगरच्या तनिषाने सांगितला फ्युचर प्लान; तुम्हीही घेऊ शकता आदर्श

नुकताच बारावीच्या निकालाची घोषणा करण्यात आलीये. विशेष म्हणजे या निकालात मुलींनी बाजी मारलीये. राज्यातूनही छत्रपती संभाजी नगरची मुलगी पहिली आलीये. हेच नाही तर तिला शंभरपैकी शंभर टक्के मिळाले आहेत. यंदा बारावीच्या निकालाच्या टक्क्यामध्ये मोठी वाढ झालीये.

इयत्ता बारावीत 100 पैकी 100 मार्क, संभाजीनगरच्या तनिषाने सांगितला फ्युचर प्लान; तुम्हीही घेऊ शकता आदर्श
Tanisha Sagar Boramanikar
| Updated on: May 21, 2024 | 4:16 PM
Share

नुकताच महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीच्या निकालाची घोषणा करण्यात आलीये. आज (21 मे 2024 ) रोजी बारावीचा निकाल हा जाहीर करण्यात आलाय. 21 फेब्रुवारी ते 19 मार्च 2024 दरम्यान राज्यात परीक्षा पार पडल्या. गेल्या कित्येक दिवसांपासून विद्यार्थी हे बारावीच्या निकालाची वाट पाहताना दिसले. शेवटी आज बारावीचा निकाल लागलाय. सकाळी 11 वाजता बोर्डाकडून पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यानंतर दुपारी 1 वाजता ऑनलाईन पद्धतीने बारावीचा निकाल हा जाहीर करण्यात आलाय.

विशेष म्हणजे यंदा बारावीच्या निकालाच्या टक्क्यात मोठी वाढ झालीये. सर्वच शाखेचे निकाल जबरदस्त लागले आहेत. बारावीच्या निकालात कोकण विभाग अव्वल ठरलाय. सर्वात कमी निकाल हा मुंबई बोर्डाचा लागला आहे. विशेष म्हणजे बारावीच्या निकालात यंदा मुलींनीच बाजी मारली आहे. छत्रपती संभाजी नगरची विद्यार्थीनी राज्यात पहिली आली आहे.

विशेष म्हणजे या विद्यार्थीनीला शंभर टक्क्यांपैकी शंभर टक्के पडले आहेत. तनीषा सागर बोरामणीकर असे या विद्यार्थीनीचे नाव असून ती छत्रपची संभाजी नगरच्या देवगिरी महाविद्यालयाची विद्यार्थीनी आहे. तनीषा सागर बोरामणीकर ही राज्यातून पहिली आलीये. आता तनीषा बोरामणीकर हिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसतोय.

तनीषा सागर बोरामणीकर म्हणाली की, मला खूप छान वाटत आहे, मी फक्त 95 टक्के अपेक्षित धरले होते. मात्र मला 100 टक्के मार्क मिळाले आहेत. राज्यात प्रथम आले हे माझ्यासाठी खूप छान आहे. यामध्ये माझे आई वडील कुटुंब आणि शिक्षक यांचे श्रेय आहे. त्यांनीही माझ्यासाठी खूप मेहतन घेतल्याचे तनीषा सागर बोरामणीकर हिने म्हटले.

पुढे तनीषा बोरामणीकर म्हणाली, मला भविष्यात यूपीएससी क्रॅक करायची आहे. मी आता लगेच सीएची परीक्षा देणार आहे. यंदा छत्रपती संभाजी नगर विभागाचा निकाल चांगलाच लागलाय. मुलांपेक्षा मुलींनी तब्बल 3.27 टक्के अधिक मिळवले आहेत. संपूर्ण राज्यात कॉपीमुक्त परीक्षा पार पडली. भरारी पथकांच्या संख्येतही मोठी वाढ करण्यात आली होती. आता दहावीच्या निकालाची वाट विद्यार्थ्यांकडून बघितले जातंय.

Follow Us
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?.
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह..
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह...
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी.
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला.
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?.
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?.
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप.
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?.
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले.
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा.